आमगाव : मानवाचे जीवन फुलविण्यासाठी जल व जंगल वाचविण्याची गरज आहे. जल आणि जंगल या दोघांवर संकट ओढावल्याने ग्लोबल वार्र्मींगचा फटका मानवाला सहन करावा लागत आहे. यावर बचाव म्हणून झाडे लावा झाडे जगवा संदेश देत जलबाचाव चा नारा लावत पदमपूर येथे यशोदा बहुउद्देशिय विकास संस्था व उडाण बहुउद्देशिय विकास संस्था पदमपूर तर्फे आज (दि. २६) रोजी जलदिंडी काढण्यात आली.या दिंडीची सुरूवात सकाळी भवभूती महाविद्यालयाच्या प्रांगणातून सुरूवात करण्यात आली. आमगाव येथील सामाजिक कार्यकर्ता गोविंद तिराले, बनगावचे माजी सरपंच जमील पाठण, भवभूती महाविद्यालयाचे प्रा. सुधीर घुसे, प्रा. विजय फुंडे, प्रा. रमेश बावनथडे, प्रा. शध्दोधन शहारे, कांताप्रसाद मिश्रा यांच्याहस्ते जलहंडीचे पूजन करून दिंडीला सुरूवात करण्यात आली. जलदिंडीत सहभागी झालेल्या तरूणांनी जल वाचवा, वृक्ष वाचवा, पाण्याचा अपव्यय टाळा अश्या विविध घोषणा देत नागरिकांना जागृत केले. आज पाणी वाया जाईल तर उद्या तहान जीव घेईल असे सांगत ग्रामीण जनतेला पाण्याचे महत्व पटवून देण्यात आले. दिंडी सुरू असतांना गावातील चौकाचौकात थांबून तरूणांनी पथनाट्य सादर करून पाणी व वृक्षांचे महत्व सांगण्यात आले. यावेळी अतिथींनी मार्गदर्शन केले.यशोदा बहुउद्देशिय विकास संस्था व उडाण बहुउद्देशिय विकास संस्था पदमपूर यांच्या पुढाकाराने काढलेल्या दिंडीत नागरिकही सहभागी झाले. गावभ्रमण केल्यानंतर या दिंडीचा समारोप करण्यात आला. सदर दिंडीत नरेश बोहरे, यशोदा बहुइद्देशीय संथेचे अध्यक्ष हरिष भुते, उडाणचे अध्यक्ष आशिष तलमले, रवि मेंढे, राजेश वाढई, दिनेश गिऱ्हेपुंजे, नंदकुमार भेदे, शैलेश अरकरा, कमलेश रहिले, गोपाल भांडारकर, कृष्णा भेदे, ललीत मेश्राम, राकेश गुरव, संदीप विठ्ठले, मुकेश शिवणकर, डिलेश्वर वंजारी, रोहीत खोटेले, प्रमोद भेदे, प्रीनल वंजारी, रामेश्वर चोपकर, प्रकाश रहिले, कार्तिक बिसेन, सुरेश चुटे, राजेश जांभूळकर, चंद्रकुमार देशकर, मंगेश सोनकनवरे, भुमेश्वर बागडे, विवेक थेर, राकेश शिवणकर, प्रतिक करंडे, जितेंद्र फुंडे, रोहीत फुंडे, उज्वल वंजारी, वतन भौतीक यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे संचालन नरेश रहिले व आभार अतुल फुंडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यशोदा बहुउद्देशिय विकास संस्था व उडाण बहुउद्देशिय विकास संस्था पदमपूरच्या पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)तरूणांनी केला संकल्पआपल्या परिसरात होत असलेला पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आपण पुढाकार घेऊन त्या व्यक्तींमध्ये जनजागृती करण्याचा संकल्प दिंडीत सहभागी झालेल्या तरूणांनी घेतला आहे. पाणी हेच जीवन आहे त्याला विनासापासून थांबविण्याची गरज असल्याची समज प्रत्येकाला देऊ असे रॅलीत सहभागी झालेल्या तरूणांचे म्हणणे आहे.
दिंडीतून दिला ‘जल बचाव’चा संदेश
By admin | Updated: March 27, 2016 01:57 IST