शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दिंडीतून दिला ‘जल बचाव’चा संदेश

By admin | Updated: March 27, 2016 01:57 IST

मानवाचे जीवन फुलविण्यासाठी जल व जंगल वाचविण्याची गरज आहे. जल आणि जंगल या दोघांवर संकट ओढावल्याने ग्लोबल वार्र्मींगचा फटका मानवाला सहन करावा लागत आहे.

आमगाव : मानवाचे जीवन फुलविण्यासाठी जल व जंगल वाचविण्याची गरज आहे. जल आणि जंगल या दोघांवर संकट ओढावल्याने ग्लोबल वार्र्मींगचा फटका मानवाला सहन करावा लागत आहे. यावर बचाव म्हणून झाडे लावा झाडे जगवा संदेश देत जलबाचाव चा नारा लावत पदमपूर येथे यशोदा बहुउद्देशिय विकास संस्था व उडाण बहुउद्देशिय विकास संस्था पदमपूर तर्फे आज (दि. २६) रोजी जलदिंडी काढण्यात आली.या दिंडीची सुरूवात सकाळी भवभूती महाविद्यालयाच्या प्रांगणातून सुरूवात करण्यात आली. आमगाव येथील सामाजिक कार्यकर्ता गोविंद तिराले, बनगावचे माजी सरपंच जमील पाठण, भवभूती महाविद्यालयाचे प्रा. सुधीर घुसे, प्रा. विजय फुंडे, प्रा. रमेश बावनथडे, प्रा. शध्दोधन शहारे, कांताप्रसाद मिश्रा यांच्याहस्ते जलहंडीचे पूजन करून दिंडीला सुरूवात करण्यात आली. जलदिंडीत सहभागी झालेल्या तरूणांनी जल वाचवा, वृक्ष वाचवा, पाण्याचा अपव्यय टाळा अश्या विविध घोषणा देत नागरिकांना जागृत केले. आज पाणी वाया जाईल तर उद्या तहान जीव घेईल असे सांगत ग्रामीण जनतेला पाण्याचे महत्व पटवून देण्यात आले. दिंडी सुरू असतांना गावातील चौकाचौकात थांबून तरूणांनी पथनाट्य सादर करून पाणी व वृक्षांचे महत्व सांगण्यात आले. यावेळी अतिथींनी मार्गदर्शन केले.यशोदा बहुउद्देशिय विकास संस्था व उडाण बहुउद्देशिय विकास संस्था पदमपूर यांच्या पुढाकाराने काढलेल्या दिंडीत नागरिकही सहभागी झाले. गावभ्रमण केल्यानंतर या दिंडीचा समारोप करण्यात आला. सदर दिंडीत नरेश बोहरे, यशोदा बहुइद्देशीय संथेचे अध्यक्ष हरिष भुते, उडाणचे अध्यक्ष आशिष तलमले, रवि मेंढे, राजेश वाढई, दिनेश गिऱ्हेपुंजे, नंदकुमार भेदे, शैलेश अरकरा, कमलेश रहिले, गोपाल भांडारकर, कृष्णा भेदे, ललीत मेश्राम, राकेश गुरव, संदीप विठ्ठले, मुकेश शिवणकर, डिलेश्वर वंजारी, रोहीत खोटेले, प्रमोद भेदे, प्रीनल वंजारी, रामेश्वर चोपकर, प्रकाश रहिले, कार्तिक बिसेन, सुरेश चुटे, राजेश जांभूळकर, चंद्रकुमार देशकर, मंगेश सोनकनवरे, भुमेश्वर बागडे, विवेक थेर, राकेश शिवणकर, प्रतिक करंडे, जितेंद्र फुंडे, रोहीत फुंडे, उज्वल वंजारी, वतन भौतीक यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे संचालन नरेश रहिले व आभार अतुल फुंडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यशोदा बहुउद्देशिय विकास संस्था व उडाण बहुउद्देशिय विकास संस्था पदमपूरच्या पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)तरूणांनी केला संकल्पआपल्या परिसरात होत असलेला पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आपण पुढाकार घेऊन त्या व्यक्तींमध्ये जनजागृती करण्याचा संकल्प दिंडीत सहभागी झालेल्या तरूणांनी घेतला आहे. पाणी हेच जीवन आहे त्याला विनासापासून थांबविण्याची गरज असल्याची समज प्रत्येकाला देऊ असे रॅलीत सहभागी झालेल्या तरूणांचे म्हणणे आहे.