शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

दिंडीतून दिला ‘जल बचाव’चा संदेश

By admin | Updated: March 27, 2016 01:57 IST

मानवाचे जीवन फुलविण्यासाठी जल व जंगल वाचविण्याची गरज आहे. जल आणि जंगल या दोघांवर संकट ओढावल्याने ग्लोबल वार्र्मींगचा फटका मानवाला सहन करावा लागत आहे.

आमगाव : मानवाचे जीवन फुलविण्यासाठी जल व जंगल वाचविण्याची गरज आहे. जल आणि जंगल या दोघांवर संकट ओढावल्याने ग्लोबल वार्र्मींगचा फटका मानवाला सहन करावा लागत आहे. यावर बचाव म्हणून झाडे लावा झाडे जगवा संदेश देत जलबाचाव चा नारा लावत पदमपूर येथे यशोदा बहुउद्देशिय विकास संस्था व उडाण बहुउद्देशिय विकास संस्था पदमपूर तर्फे आज (दि. २६) रोजी जलदिंडी काढण्यात आली.या दिंडीची सुरूवात सकाळी भवभूती महाविद्यालयाच्या प्रांगणातून सुरूवात करण्यात आली. आमगाव येथील सामाजिक कार्यकर्ता गोविंद तिराले, बनगावचे माजी सरपंच जमील पाठण, भवभूती महाविद्यालयाचे प्रा. सुधीर घुसे, प्रा. विजय फुंडे, प्रा. रमेश बावनथडे, प्रा. शध्दोधन शहारे, कांताप्रसाद मिश्रा यांच्याहस्ते जलहंडीचे पूजन करून दिंडीला सुरूवात करण्यात आली. जलदिंडीत सहभागी झालेल्या तरूणांनी जल वाचवा, वृक्ष वाचवा, पाण्याचा अपव्यय टाळा अश्या विविध घोषणा देत नागरिकांना जागृत केले. आज पाणी वाया जाईल तर उद्या तहान जीव घेईल असे सांगत ग्रामीण जनतेला पाण्याचे महत्व पटवून देण्यात आले. दिंडी सुरू असतांना गावातील चौकाचौकात थांबून तरूणांनी पथनाट्य सादर करून पाणी व वृक्षांचे महत्व सांगण्यात आले. यावेळी अतिथींनी मार्गदर्शन केले.यशोदा बहुउद्देशिय विकास संस्था व उडाण बहुउद्देशिय विकास संस्था पदमपूर यांच्या पुढाकाराने काढलेल्या दिंडीत नागरिकही सहभागी झाले. गावभ्रमण केल्यानंतर या दिंडीचा समारोप करण्यात आला. सदर दिंडीत नरेश बोहरे, यशोदा बहुइद्देशीय संथेचे अध्यक्ष हरिष भुते, उडाणचे अध्यक्ष आशिष तलमले, रवि मेंढे, राजेश वाढई, दिनेश गिऱ्हेपुंजे, नंदकुमार भेदे, शैलेश अरकरा, कमलेश रहिले, गोपाल भांडारकर, कृष्णा भेदे, ललीत मेश्राम, राकेश गुरव, संदीप विठ्ठले, मुकेश शिवणकर, डिलेश्वर वंजारी, रोहीत खोटेले, प्रमोद भेदे, प्रीनल वंजारी, रामेश्वर चोपकर, प्रकाश रहिले, कार्तिक बिसेन, सुरेश चुटे, राजेश जांभूळकर, चंद्रकुमार देशकर, मंगेश सोनकनवरे, भुमेश्वर बागडे, विवेक थेर, राकेश शिवणकर, प्रतिक करंडे, जितेंद्र फुंडे, रोहीत फुंडे, उज्वल वंजारी, वतन भौतीक यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे संचालन नरेश रहिले व आभार अतुल फुंडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यशोदा बहुउद्देशिय विकास संस्था व उडाण बहुउद्देशिय विकास संस्था पदमपूरच्या पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)तरूणांनी केला संकल्पआपल्या परिसरात होत असलेला पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आपण पुढाकार घेऊन त्या व्यक्तींमध्ये जनजागृती करण्याचा संकल्प दिंडीत सहभागी झालेल्या तरूणांनी घेतला आहे. पाणी हेच जीवन आहे त्याला विनासापासून थांबविण्याची गरज असल्याची समज प्रत्येकाला देऊ असे रॅलीत सहभागी झालेल्या तरूणांचे म्हणणे आहे.