शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
2
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
3
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
4
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
5
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
6
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
7
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
8
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
9
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
10
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
11
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
12
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
13
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
14
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
15
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
16
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
17
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
18
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
19
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
20
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...

जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने फिरणारा तो संदेश ‘फेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:48 IST

गोंदिया : जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर विविध निर्बंधांबाबतचा संदेश व्हायरल होत आहे. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी कुठलेही नवे ...

गोंदिया : जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर विविध निर्बंधांबाबतचा संदेश व्हायरल होत आहे. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी कुठलेही नवे निर्देश जारी केले नसून, त्यांच्या नावाने फिरणारा संदेश खोटा असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनीच स्पष्ट केले आहे. वृत्तपत्र वापरापासून काहीही धोका नसून, अशा चुकीच्या पोस्ट टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा संदर्भ देऊन ‘जिल्हाधिकारी यांच्याकडून सूचना’ या मथळ्याखाली काही सूचनांचा संदेश व्हॉट्‌सॲपवर टाकण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून हा संदेश विविध सोशल मीडियावर, प्लॅटफॉर्म्सवर फिरत आहे. या संदेशानुसार कुणीही बेकरी सामान, ब्रेड, पाव घेऊ नये. वृत्तपत्रे दुसऱ्या दिवशी वाचावीत, १५ दिवसांची भाजी-धान्य घरी भरून ठेवावे, ऑनलाईन फूड डिलिव्हरी पूर्णत: बंद करा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, असे कुठलेही निर्देश जारी झालेले नसून हा गैरसमज व भीती पसरविण्याचा प्रकार आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. अशा प्रकारचे कोणतेही वृत्त जिल्हा माहिती कार्यालयाकडून प्रसारित करण्यात आलेले नाही. राज्य शासनाच्या व जिल्हा प्रशासनाच्या कोविड प्रोटोकॉल सूचनेशिवाय जिल्हा माहिती कार्यालयाकडून असे कोणतेही वृत्त प्रकाशित केले जात नाही. या वृत्ताचा जिल्हा माहिती कार्यालयाशी संबंध नाही, असे जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र गिते यांनी सांगितले.

बॉक्स.....

सायबर सेलकडून तपास

संबंधित पोस्ट कोणी प्रसारित केली याबाबत सदर प्रकरण सायबर सेलकडे तपासणीसाठी देण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना संक्रमण काळात लोकांमध्ये भीती व गैरसमज पसरविणाऱ्या अन्य पोस्टवरही नजर ठेवण्याची सूचना सायबर सेलला केली आहे.

.......

अफवांवर विश्वास नको

वृत्तपत्र वाचल्यामुळे कोरोनाचा संसर्ग होत नाही. वृत्तपत्र ही पूर्णपणे सुरक्षित आहे. छपाईदरम्यान सॅनिटायझेशनची प्रक्रियाही पूर्ण केली जाते. तसेच वृत्तपत्र वाचल्यामुळे कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आजपर्यंत ऐकिवात नाही. जागतिक आरोग्य संघटनेनेही वृत्तपत्रांमुळे कोरोना होत नसल्याचे आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नये.

- दीपक कुमार मीना, जिल्हाधिकारी