शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

जिल्ह्याचा पारा पुन्हा ४३ अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 21:36 IST

उन्हाळा आता खऱ्या अर्थाने आपल्या रंगात आला असून दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. मध्यंतरी तापमनात काही प्रमाणात घट झाली होती. मात्र गुरूवारी (दि.१६) पुन्हा जिल्ह्यात ४३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

ठळक मुद्देरखरखत्या उन्हाने जीव कासावीस : वाढत्या तापमानाचा दैनदिन कामावर परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : उन्हाळा आता खऱ्या अर्थाने आपल्या रंगात आला असून दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. मध्यंतरी तापमनात काही प्रमाणात घट झाली होती. मात्र गुरूवारी (दि.१६) पुन्हा जिल्ह्यात ४३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यामुळे जिल्ह्याच्या तापमानात पुन्हा वाढ झाली असून त्याचा दैनदिन कामांवर सुध्दा परिणाम होत आहे. दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे.एप्रिल महिन्यातच तापमान चांगले भडकल्याचे दिसले.मात्र उन्हाळ््याचा खरा रंग मे महिन्यात चढत आहे. त्यानुसार, सूर्यदेव चांगलेच भडकले असून उन्हाची तिव्रता वाढतच आहे.मध्यंतरीचे काही दिवस तापमानात घट दिसून आली होती. अशात गुरूवारी (दि.१६) पुन्हा तापमान ४३.५ अंश सेल्सिअस नोंदल्या गेले. रखरखत्या उन्हामुळे सकाळी ८-९ वाजतापासूनच अंगाला चटके लागत आहे. त्यामुळे शहरवासीयांचे घराबाहेर निघणे कठीण झाले आहे. मे महिना आता अर्ध्यात आला असून पुढचा जून महिनाही उरलेला असल्याने उन्हाची तिव्रता बघून भल्याभल्यांना धडकी भरली आहे.पारा चढतच जात असल्याने उरलेले दिवस कसे जातील याचा विचार करूनच घाम फुटत आहे.उन्हाच्या तिव्रतेमुळे लोकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर निघणे टाळल्याने रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आहे.दुपारची कामे नागरिकांकडून टाळली जात असून सायंकाळी ते घराबाहेर निघत आहेत. मात्र लग्नसराई असल्यामुळे मन मारून घराबाहेर निघणारेच दिसत आहेत.आणखी १५ दिवस राहणार होरपळउन्हाने जिल्ह्याला चांगलेच होरपळून सोडले असतानाच आणखी १५ दिवस तरी या उष्ण लहरींपासून सुटका नसल्याचे दिसत आहे. हवामान विभागाने विदर्भात १५ दिवस होरपळ राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे पूर्ण मे महिनाच जिल्हावासीयांना आगीच्या भट्टीत काढावा लागणार असल्याचे दिसते. असह्य झालेल्या या उन्हापासून कधी सुटका मिळते याचीच सर्व वाट बघत आहेत.लग्न सराईलाही उन्हाचे चटकेउन्हाचा पारा चढत चालला असताना लग्नसराई मात्र कमी होत असल्याचे दिसत नाही. सकाळपासूनच लग्नाची वाजंत्री वाजत असून रात्रीही मोठ्या प्रमाणात लग्न आटोपले जात आहेत. यात मात्र दिवसाच्या लग्नात वºहाडी व नागरिकांची फजीती होत आहे. रखरखत्या उन्हामुळे घामाघूम होत लग्न आटोपले जात आहेत. रात्रीही तेच हाल असून उपाय नसल्याने, आहे त्या स्थितीत लग्न सोहळे सुरूच आहेत. यात मात्र वृद्ध व लहानग्यांची चांगलीच फजीती होत आहे. 

टॅग्स :Temperatureतापमान