शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

जिल्ह्याचा पारा पुन्हा ४३ अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 21:36 IST

उन्हाळा आता खऱ्या अर्थाने आपल्या रंगात आला असून दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. मध्यंतरी तापमनात काही प्रमाणात घट झाली होती. मात्र गुरूवारी (दि.१६) पुन्हा जिल्ह्यात ४३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

ठळक मुद्देरखरखत्या उन्हाने जीव कासावीस : वाढत्या तापमानाचा दैनदिन कामावर परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : उन्हाळा आता खऱ्या अर्थाने आपल्या रंगात आला असून दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. मध्यंतरी तापमनात काही प्रमाणात घट झाली होती. मात्र गुरूवारी (दि.१६) पुन्हा जिल्ह्यात ४३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यामुळे जिल्ह्याच्या तापमानात पुन्हा वाढ झाली असून त्याचा दैनदिन कामांवर सुध्दा परिणाम होत आहे. दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे.एप्रिल महिन्यातच तापमान चांगले भडकल्याचे दिसले.मात्र उन्हाळ््याचा खरा रंग मे महिन्यात चढत आहे. त्यानुसार, सूर्यदेव चांगलेच भडकले असून उन्हाची तिव्रता वाढतच आहे.मध्यंतरीचे काही दिवस तापमानात घट दिसून आली होती. अशात गुरूवारी (दि.१६) पुन्हा तापमान ४३.५ अंश सेल्सिअस नोंदल्या गेले. रखरखत्या उन्हामुळे सकाळी ८-९ वाजतापासूनच अंगाला चटके लागत आहे. त्यामुळे शहरवासीयांचे घराबाहेर निघणे कठीण झाले आहे. मे महिना आता अर्ध्यात आला असून पुढचा जून महिनाही उरलेला असल्याने उन्हाची तिव्रता बघून भल्याभल्यांना धडकी भरली आहे.पारा चढतच जात असल्याने उरलेले दिवस कसे जातील याचा विचार करूनच घाम फुटत आहे.उन्हाच्या तिव्रतेमुळे लोकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर निघणे टाळल्याने रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आहे.दुपारची कामे नागरिकांकडून टाळली जात असून सायंकाळी ते घराबाहेर निघत आहेत. मात्र लग्नसराई असल्यामुळे मन मारून घराबाहेर निघणारेच दिसत आहेत.आणखी १५ दिवस राहणार होरपळउन्हाने जिल्ह्याला चांगलेच होरपळून सोडले असतानाच आणखी १५ दिवस तरी या उष्ण लहरींपासून सुटका नसल्याचे दिसत आहे. हवामान विभागाने विदर्भात १५ दिवस होरपळ राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे पूर्ण मे महिनाच जिल्हावासीयांना आगीच्या भट्टीत काढावा लागणार असल्याचे दिसते. असह्य झालेल्या या उन्हापासून कधी सुटका मिळते याचीच सर्व वाट बघत आहेत.लग्न सराईलाही उन्हाचे चटकेउन्हाचा पारा चढत चालला असताना लग्नसराई मात्र कमी होत असल्याचे दिसत नाही. सकाळपासूनच लग्नाची वाजंत्री वाजत असून रात्रीही मोठ्या प्रमाणात लग्न आटोपले जात आहेत. यात मात्र दिवसाच्या लग्नात वºहाडी व नागरिकांची फजीती होत आहे. रखरखत्या उन्हामुळे घामाघूम होत लग्न आटोपले जात आहेत. रात्रीही तेच हाल असून उपाय नसल्याने, आहे त्या स्थितीत लग्न सोहळे सुरूच आहेत. यात मात्र वृद्ध व लहानग्यांची चांगलीच फजीती होत आहे. 

टॅग्स :Temperatureतापमान