शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
4
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
5
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
8
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
9
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
10
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
11
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
12
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
13
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
14
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
15
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
16
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
19
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
20
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ

जिल्ह्याचा पारा ४४.८ अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 22:10 IST

हवामान खात्याने पुढील चार दिवस जिल्ह्यातील तापमानात वाढ होण्याचा इशारा दिला आहे. २५ मे पासून नवतपाला सुरूवात झाल्याने तापमानात वाढ झाली आहे. शनिवारी गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक तापमान ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हे या हंगामातील सर्वाधिक तापमान होय. त्यानंतर सोमवारी (दि.२७) ४४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तापमानात वाढ होत असल्याने जिल्हावासीय चांगलेच हैराण झाले आहे.

ठळक मुद्देगेल्या तीन दिवसांपासून तापमानात वाढ : नवतपाचाही परिणाम, दैनदिन कामावर होतोय परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : हवामान खात्याने पुढील चार दिवस जिल्ह्यातील तापमानात वाढ होण्याचा इशारा दिला आहे. २५ मे पासून नवतपाला सुरूवात झाल्याने तापमानात वाढ झाली आहे. शनिवारी गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक तापमान ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हे या हंगामातील सर्वाधिक तापमान होय. त्यानंतर सोमवारी (दि.२७) ४४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तापमानात वाढ होत असल्याने जिल्हावासीय चांगलेच हैराण झाले आहे.नवतपा सुरू झाल्यानंतर तापमानात सरासरी दोन तीन अंश सेल्सिअसने वाढ होत असते. त्यामुळे नवतपा सुरू झाल्यानंतर नागरिक दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळतात. परिणामी या कालावधी दुपारच्या वेळेत शहरातील रस्ते सामसुम असतात. हीच स्थिती यंदा देखील असून यंदा तामनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे.गोंदिया जिल्ह्याचा तापमानाचा इतिहास पाहता मागील पंधरा ते वीस वर्षांत यंदा प्रथमच ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. यापूर्वी ४३.३ अंश सेल्सिअस तापमानाचा रेकार्ड होतो. मात्र यंदा मे महिन्यात हे सर्व रेकार्ड मोडले असून तापमान ४४ अंशावरच आहे. जिल्ह्यात तापमानात मागील गुरूवारपासून सातत्याने वाढ होत असून शनिवारी (दि.२६) सर्वाधिक ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर रविवारी आणि सोमवारी पारा पुन्हा ४४.८ अंशावर पोहचला होता.वाढत्त्या तापमानामुळे उष्माघाताच्या रुग्णांच्या संख्येत सुध्दा वाढ होत आहे. तापमानातील वाढ लक्षात घेता नागरिकांनी सुध्दा त्यानुसार आपले वेळापत्रक तयार केले आहे. सध्या शेतकरी खरीप हंगामपूर्व तयारीच्या कामात व्यस्त आहे. मृग नक्षत्राला सुरूवात होताच शेतकरी पेरणीच्या कामाला सुरूवात करतात. त्यापूर्वी शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. मात्र त्यांना सुध्दा वाढत्या तापमानाचा फटका बसत आहे. त्यामुळे पहाटे ६ वाजतापासून शेतात पोहचून १० वाजेपर्यंत कामे आटोपून शेतकरी घराकडे परतत असल्याचे चित्र आहे. वाढत्या तापमानापासून गारवा मिळण्यासाठी नागरिक शितपेयाच्या दुकानांमध्ये गर्दी करीत असल्याचे चित्र आहे.