शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याचा पारा ४४.८ अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 22:10 IST

हवामान खात्याने पुढील चार दिवस जिल्ह्यातील तापमानात वाढ होण्याचा इशारा दिला आहे. २५ मे पासून नवतपाला सुरूवात झाल्याने तापमानात वाढ झाली आहे. शनिवारी गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक तापमान ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हे या हंगामातील सर्वाधिक तापमान होय. त्यानंतर सोमवारी (दि.२७) ४४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तापमानात वाढ होत असल्याने जिल्हावासीय चांगलेच हैराण झाले आहे.

ठळक मुद्देगेल्या तीन दिवसांपासून तापमानात वाढ : नवतपाचाही परिणाम, दैनदिन कामावर होतोय परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : हवामान खात्याने पुढील चार दिवस जिल्ह्यातील तापमानात वाढ होण्याचा इशारा दिला आहे. २५ मे पासून नवतपाला सुरूवात झाल्याने तापमानात वाढ झाली आहे. शनिवारी गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक तापमान ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हे या हंगामातील सर्वाधिक तापमान होय. त्यानंतर सोमवारी (दि.२७) ४४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तापमानात वाढ होत असल्याने जिल्हावासीय चांगलेच हैराण झाले आहे.नवतपा सुरू झाल्यानंतर तापमानात सरासरी दोन तीन अंश सेल्सिअसने वाढ होत असते. त्यामुळे नवतपा सुरू झाल्यानंतर नागरिक दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळतात. परिणामी या कालावधी दुपारच्या वेळेत शहरातील रस्ते सामसुम असतात. हीच स्थिती यंदा देखील असून यंदा तामनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे.गोंदिया जिल्ह्याचा तापमानाचा इतिहास पाहता मागील पंधरा ते वीस वर्षांत यंदा प्रथमच ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. यापूर्वी ४३.३ अंश सेल्सिअस तापमानाचा रेकार्ड होतो. मात्र यंदा मे महिन्यात हे सर्व रेकार्ड मोडले असून तापमान ४४ अंशावरच आहे. जिल्ह्यात तापमानात मागील गुरूवारपासून सातत्याने वाढ होत असून शनिवारी (दि.२६) सर्वाधिक ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर रविवारी आणि सोमवारी पारा पुन्हा ४४.८ अंशावर पोहचला होता.वाढत्त्या तापमानामुळे उष्माघाताच्या रुग्णांच्या संख्येत सुध्दा वाढ होत आहे. तापमानातील वाढ लक्षात घेता नागरिकांनी सुध्दा त्यानुसार आपले वेळापत्रक तयार केले आहे. सध्या शेतकरी खरीप हंगामपूर्व तयारीच्या कामात व्यस्त आहे. मृग नक्षत्राला सुरूवात होताच शेतकरी पेरणीच्या कामाला सुरूवात करतात. त्यापूर्वी शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. मात्र त्यांना सुध्दा वाढत्या तापमानाचा फटका बसत आहे. त्यामुळे पहाटे ६ वाजतापासून शेतात पोहचून १० वाजेपर्यंत कामे आटोपून शेतकरी घराकडे परतत असल्याचे चित्र आहे. वाढत्या तापमानापासून गारवा मिळण्यासाठी नागरिक शितपेयाच्या दुकानांमध्ये गर्दी करीत असल्याचे चित्र आहे.