शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
4
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
5
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
6
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
7
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
8
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
9
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
10
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
11
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
12
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
13
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
14
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
15
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
16
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
17
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
18
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
19
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
20
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!

जिल्ह्याचा पारा ४४.८ अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 22:10 IST

हवामान खात्याने पुढील चार दिवस जिल्ह्यातील तापमानात वाढ होण्याचा इशारा दिला आहे. २५ मे पासून नवतपाला सुरूवात झाल्याने तापमानात वाढ झाली आहे. शनिवारी गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक तापमान ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हे या हंगामातील सर्वाधिक तापमान होय. त्यानंतर सोमवारी (दि.२७) ४४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तापमानात वाढ होत असल्याने जिल्हावासीय चांगलेच हैराण झाले आहे.

ठळक मुद्देगेल्या तीन दिवसांपासून तापमानात वाढ : नवतपाचाही परिणाम, दैनदिन कामावर होतोय परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : हवामान खात्याने पुढील चार दिवस जिल्ह्यातील तापमानात वाढ होण्याचा इशारा दिला आहे. २५ मे पासून नवतपाला सुरूवात झाल्याने तापमानात वाढ झाली आहे. शनिवारी गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक तापमान ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हे या हंगामातील सर्वाधिक तापमान होय. त्यानंतर सोमवारी (दि.२७) ४४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तापमानात वाढ होत असल्याने जिल्हावासीय चांगलेच हैराण झाले आहे.नवतपा सुरू झाल्यानंतर तापमानात सरासरी दोन तीन अंश सेल्सिअसने वाढ होत असते. त्यामुळे नवतपा सुरू झाल्यानंतर नागरिक दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळतात. परिणामी या कालावधी दुपारच्या वेळेत शहरातील रस्ते सामसुम असतात. हीच स्थिती यंदा देखील असून यंदा तामनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे.गोंदिया जिल्ह्याचा तापमानाचा इतिहास पाहता मागील पंधरा ते वीस वर्षांत यंदा प्रथमच ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. यापूर्वी ४३.३ अंश सेल्सिअस तापमानाचा रेकार्ड होतो. मात्र यंदा मे महिन्यात हे सर्व रेकार्ड मोडले असून तापमान ४४ अंशावरच आहे. जिल्ह्यात तापमानात मागील गुरूवारपासून सातत्याने वाढ होत असून शनिवारी (दि.२६) सर्वाधिक ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर रविवारी आणि सोमवारी पारा पुन्हा ४४.८ अंशावर पोहचला होता.वाढत्त्या तापमानामुळे उष्माघाताच्या रुग्णांच्या संख्येत सुध्दा वाढ होत आहे. तापमानातील वाढ लक्षात घेता नागरिकांनी सुध्दा त्यानुसार आपले वेळापत्रक तयार केले आहे. सध्या शेतकरी खरीप हंगामपूर्व तयारीच्या कामात व्यस्त आहे. मृग नक्षत्राला सुरूवात होताच शेतकरी पेरणीच्या कामाला सुरूवात करतात. त्यापूर्वी शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. मात्र त्यांना सुध्दा वाढत्या तापमानाचा फटका बसत आहे. त्यामुळे पहाटे ६ वाजतापासून शेतात पोहचून १० वाजेपर्यंत कामे आटोपून शेतकरी घराकडे परतत असल्याचे चित्र आहे. वाढत्या तापमानापासून गारवा मिळण्यासाठी नागरिक शितपेयाच्या दुकानांमध्ये गर्दी करीत असल्याचे चित्र आहे.