शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

विविध स्पर्धांनी महिला मेळाव्याची सांगता

By admin | Updated: February 20, 2016 02:46 IST

तिरोडा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्राम बिहिरीया येथे पूर्व माध्यमिक शाळेच्या प्रांगणात सरपंच अनिता मराठे यांच्या अध्यक्षतेखाली महिला मेळाव्याचे आयोजन केले होते.

इंदोरा बुज : तिरोडा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्राम बिहिरीया येथे पूर्व माध्यमिक शाळेच्या प्रांगणात सरपंच अनिता मराठे यांच्या अध्यक्षतेखाली महिला मेळाव्याचे आयोजन केले होते. तिरोडा अदानी प्रकल्पाच्या समन्वयक जयश्री काळे यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी महिलांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या.या वेळी गावातील सुषमा कावळे, शीला टेंभरे, शिक्षिका कल्पना मेश्राम, सुनीता अंबुले, नीलिमा पानतावने, वंदना जमईवार, पुस्तकला परतेती, शीला चौरे, सरिता मेश्राम, बबिता मेश्राम, निशा मालाधारी, अंजिरा बोरकर आदी महिला उपस्थित होत्या.क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन दीप प्रज्वलन व माल्यार्पण करुन महिला मेळाव्याची सुरुवात करण्यात आली. शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सुनिता अंबुले यांनी उपस्थित महिला मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.प्रास्ताविकात महिला बचत गटाचे समन्वयक सुषमा कावळे यांनी महिलांच्या विविध समस्या मांडल्या. महिलांना समाजात कशा पद्धतीने कमी दर्जा दिला जातो, यावर त्यांनी अनेक उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले. शासनाच्या दरबारी महिलांना ५० टक्के आरक्षण असले तरी समाजात ते अपुरे आहे. याकडे महिलांनीच गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, असे मत शिक्षिका कल्पना मेश्राम यांनी व्यक्त केले.दारुबंदी, व्यसनमुक्ती व महिलांचे मुख्य कर्तव्य यावर मार्गदर्शन करताना अदानी फाऊंडेशनच्या समन्वयक जयश्री काळे म्हणाल्या, महिलांना ५० टक्के आरक्षण मिळाले असले तरी महिला याचा फायदा घेत नाही. याचे नेमके कारण काय, यावर महिलांनीच विचार करायला हवे. महिला पुरुषाबरोबर काम करते, तेव्हा महिलांना पुरुषापेक्षा कमी लेखू नये. महिला जर गावात सक्षम झाल्या तर गाव प्रगतिपथावर गेल्याशिवाय राहणार नाही. स्त्रीभू्रण हत्या, महिलांचा दर्जा, मुलगाच का हवा अशा अनेक विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले. यंत्रयुगाच्या काळात मुली मुलापेक्षा कुठे ही कमी नाहीत तर एक पाऊल पुढे असल्याचे त्यांनी सांगितले.गावात दारुबंदी झाल्यामुळे गावात शांतता असल्याचे मत सरपंच अनिता मराठे यांनी व्यक्त केले. महिलांनी गावात प्रत्येक कामात पुढे येण्याचे आवाहन केले. या वेळी अनेक महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाला महिलांसह पुरुषांचीसुद्धा उपस्थिती होती, हे विशेष.विविध स्पर्धामध्ये गीत गायन, उखाने स्पर्धा, संगीत खुर्ची, वादविवाद स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमही घेण्यात आले. संचालन प्रेरक तुलसी शुक्ला यांनी केले. आभार प्रेरक रिना सोनेवाने यांनी मानले. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक पुसाम, ढबाले, पटले, वैद्य, मेश्राम यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)