शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

६६० उमेदवारांचे भाग्य होणार यंत्रबद्ध

By admin | Updated: June 30, 2015 02:31 IST

मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि आठही पंचाय समित्यांच्या निवडणुकीसाठी मंगळवारी

आज मतदान : ६३१३ अधिकारी-कर्मचारी मतदान प्रक्रियेच्या कामात, मतपेट्यांसह केंद्रांवर रवाना

गोंदिया : मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि आठही पंचाय समित्यांच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.३०) ११०५ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यात जिल्हा परिषदेच्या ५३ जागांसाठी रिंगणात असलेल्या २३७ आणि तर पंचायत समित्यांच्या १०६ जागांसाठी ४२३ उमेदवारांचे भाग्य मतदान यंत्रात बंद होणार आहे.मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाची निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. ४ लाख १४ हजार ३०२ पुरूष आणि ४ लाख ९ हजार १३१ महिला मतदार असे एकूण ८ लाख २३ हजार ४३४ मतदार या निवडणुकीत मतदान करणार आहेत. त्यासाठी गोंदिया तालुक्यात २६६ मतदान केंद्र, आमगाव तालुक्यात १३५, देवरी १०९, गोरेगाव ११६, तिरोडा १५०, सडक-अर्जुनी १०९, अर्जुनी मोरगाव १३२ तर सालेकसा तालुक्यात ८८ मतदान केंद्र राहणार आहेत. यात ११६४ मतदान केंद्राध्यक्ष, ३ हजार ४९२ मतदान अधिकारी तर बंदोबस्तासाठी एक हजार ६५७ पोलिसांचा बंदोबस्त लावला आहे. तालुकानिहाय असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये गोंदिया तालुक्यात २६६ मतदान केंद्राध्यक्ष, ७९८ मतदान अधिकारी, २१ बस, ५० खासगी वाहने तर ५३२ पोलिसांचा बंदोबस्त लावला आहे. आमगाव तालुक्यात १४९ मतदान केंद्राध्यक्ष, ४४७ मतदान अधिकारी, १३ बस, १७ खासगी वाहने तर १४७ पोलिसांचा बंदोबस्त लावला आहे. सालेकसा तालुक्यात ८८ मतदान केंद्राध्यक्ष, २६४ मतदान अधिकारी, ९ बस, १३ खासगी वाहने तर ८८ पोलिसांचा बंदोबस्त लावला आहे. तिरोडा तालुक्यात १६५ मतदान केंद्राध्यक्ष, ४९५ मतदान अधिकारी, १६ बस, १५ खासगी वाहने तर १२१ पोलिसांचा बंदोबस्त लावला आहे. गोरेगाव तालुक्यात १२८ मतदान केंद्राध्यक्ष, ३८४ मतदान अधिकारी, ११ बस, २३ खासगी वाहने तर ११६ पोलिसांचा बंदोबस्त लावला आहे. देवरी तालुक्यात १०९ मतदान केंद्राध्यक्ष, ३२७ मतदान अधिकारी, ११ बस, १६ खासगी वाहने तर १०९ पोलिसांचा बंदोबस्त लावला आहे. सडक-अर्जुनी तालुक्यात १०९ मतदान केंद्राध्यक्ष, ३२७ मतदान अधिकारी, ८ बस, १६ खासगी वाहने तर २५९ पोलिसांचा बंदोबस्त लावला आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात १५० मतदान केंद्राध्यक्ष, ४५० मतदान अधिकारी, १३ बस, २१ खासगी वाहने तर २८५ पोलिसांचा बंदोबस्त लावला आहे. (जिल्हा/तालुका प्रतिनिधी)२९८ केंद्रांवर ३ पर्यंत मतदानजिल्हा नक्षलग्रस्त असल्याने २९८ मतदान केंद्रांवर सकाळी ७.३० पासून दुपारी ३ वाजतापर्यंत मतदान करण्यात येणार आहे. त्यात आमगाव, देवरी व सालेकसा या तिन्ही तालुक्यातील संपूर्ण मतदान केंद्रांचा समावेश आहे. याशिवाय अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील झाशीनगर, गोठणगाव, बाराभाटी, ताडगाव, महागाव, केशोरी, भरनोली, सडक-अर्जुनी तालुक्यातील चिखली, कोकणा जमी, शेंडा व बाम्हणी खडकी येथील मतदान केंद्रांवर दुपारी ३ पर्यंत मतदान सुरू राहणार आहे.पावसाच्या विश्रांतीने प्रशासनाला दिलासापावसाचे दिवस असल्यामुळे अतिवृष्टी होऊन नदी-नाल्यांचा पूर आल्यास मतदान यंत्रणेत अडथळे निर्माण होण्याची शक्यता होती. त्यासाठी प्रशासनाने सर्व प्रकारची तयारी केलेली असली तरी जास्त पाऊस आल्यास निवडणूक यंत्रणेचे टेन्शन वाढले असते. मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून जोरदार पाऊस नसल्यामुळे यंत्रणेला दिलासा मिळाला आहे. तरीही ईव्हीएम मशिन व कर्मचाऱ्यांना पोहोचविण्यासाठी आणि मतदानानंतर त्यांना पुन्हा सुरक्षितपणे परत आणण्यासाठी दुचाकी, ट्रॅक्टरसह बैलगाड्यांची व्यवस्था तयार ठेवण्यात आली आहे.चारही जिल्ह्यांच्या सीमेवर नाकाबंदी ४गोंदियासह लागून असलेल्या भंडारा, मध्यप्रदेशातील बालाघाट आणि छत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्ह्याच्या सीमेवर नाकेबंदी करण्यात आली आहे. अवैधपणे दारूची वाहतूक आणि इतर कोणत्याही अनैतिक गोष्टींना आळा घालण्यासाठी प्रशासनाने ही व्यवस्था केली आहे.