शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
2
Bomb Threat: "बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीत दुपारी ३ वाजता बॉम्ब स्फोट होणार" धमकीचा ईमेल!
3
'तिला न्याय देण्याऐवजी भाजपच्या व्यवस्थेने आरोपींना वाचवले'; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र
4
कुतुहलापोटी रेल्वे इंजिन बघायला वर चढला, पण हाय पॉवर केबलचा करंट जीवावर बेतला; १६ वर्षीय मुलाचा मृत्यू
5
दोन महिलांपुढे पायलटनेही हात टेकले; विमानात जोरजोरात भांडत बसल्या अन् पुढे असे घडले...
6
DMR Stock Price: ५ वर ८ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरची किंमत २०० रुपयांपेक्षाही कमी, स्टॉकमध्ये १४ टक्क्यांपेक्षाही अधिक तेजी
7
टेस्लाची पहिली कार मॉडल Y लाँच, किंमत २३ लाख नाही, तुमचा आमचा श्वास रोखणारी... EMI किती?
8
सोने सांभाळण्याची भीती वाटते? ऑनलाईन पर्यायातून मिळेल जास्त नफा, कशी करायची गुंतवणूक?
9
अल्पसंख्याक अन् एससी-एसटींविरुद्ध भेदभाव केल्यास होणार तुरुंगवास; काँग्रेसच्या 'रोहित वेमुला' विधेयकात काय?
10
वाहन उद्योग क्षेत्रासाठी आजचा दिवस महत्त्वाचा; एकाचवेळी दोन दिग्गज कंपन्या भारतात एन्ट्री करणार
11
निमिषा प्रियाचा जीव वाचवण्यासाठी आणखी एक आशेचा किरण! येमेनच्या बंद खोलीत चर्चा सुरू
12
...नाहीतर भारत-पाकिस्तानमध्ये अण्वस्त्र युद्ध झालं असतं; डोनाल्ड ट्रम्प यांचा स्फोटक दावा
13
Video: प्रतीक्षा संपली, इलॉन मस्क यांची भारतात एन्ट्री! असं आहे Tesla चं मुंबईतील पहिलं शोरुम
14
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
15
Stock Market Today: २० अंकांनी घसरुन उघडला सेन्सेक्स; फार्मा आणि मेटल क्षेत्रात खरेदी, थोड्याच वेळात का आली तेजी?
16
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
17
क्रूरतेचा कळस! सैनिकाचे पोट फाडून त्यात ठेवला बॉम्ब; नक्षलवादी योगेंद्र कसा पकडला गेला?
18
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
19
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
20
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी

एका पाण्याने जाणार धानपीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 21:21 IST

यंदा सप्टेंबर महिना संपत येत असला तरी जिल्ह्यात दमदार पाऊस झाला नाही. परिणामी जिल्ह्यातील सर्वच पिके धोक्यात आली आहेत. येत्या सात आठ दिवसांत पाऊस न झाल्यास एका पाण्याने पिके गमाविण्याचे संकट शेतकºयांवर ओढवले आहे.

ठळक मुद्देजलाशयातील पाण्यावर भिस्त : सिंचन विभागाच्या भूमिकेकडे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यंदा सप्टेंबर महिना संपत येत असला तरी जिल्ह्यात दमदार पाऊस झाला नाही. परिणामी जिल्ह्यातील सर्वच पिके धोक्यात आली आहेत. येत्या सात आठ दिवसांत पाऊस न झाल्यास एका पाण्याने पिके गमाविण्याचे संकट शेतकºयांवर ओढवले आहे. परिणामी शेतकरी चिंतातूर असल्याचे चित्र आहे.यावर्षी जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत फारच कमी प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास ७० हजार हेक्टर जमीन पडीक राहिली. यानंतरही ज्या शेतकºयांनी शेतात पीक लावले आणि सिंचन विभागाची मदत झाली. त्यांना देखील आता पावसाअभावी पश्चाताप करण्याची वेळ आली आहे. धानाला आता पाण्याची अंत्यत गरज आहे. मात्र वाघ व इटियाडोह विभागाच्या अधिकाºयांनी त्यांना पाणी देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे शेतकºयांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे.गोंदिया, आमगाव व सालेकसा तालुक्यांच्या शेतकºयांना कालव्यांद्वारे पाणी उपलब्ध करून दिले जाते. तर मध्यप्रदेशच्या शेतकºयांनाही तेवढेच पाणी द्यावे लागेल. ही सर्वाधिक त्रासदायक बाब आहे. दुसरीकडे पांढराबोडी परिसर टेल वर आहे. या परिसरातील गावांच्या शेतकºयांना पाणी पोहोचविणे चांगलेच कठीण झाले आहे. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात देखील मोजकाच पाणीसाठा आहे. त्यामुळे जलाशयांमध्ये शिल्लक असलेले पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याकरिता शासन आणि प्रशासनाचा भर आहे. त्यासंबंधीचे निर्देश सुध्दा शासनाने दिल्याची माहिती आहे.मामा तलावांची स्थिती नाजूकजुन्या मालगुजारी तलावांची संख्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहे. यापैकी बोपाबोडी, काटी, नांदलपार येथे एक टक्कासुद्धा पाणी नाही. चिरचाडी ६.५८, कोसबीबाकी ३.०४, ककोडी ११.२४, माहुली १२.४५, मेंढा ८.८१, पळसगाव सौंदड ९.४४, तेढा १०.३० टक्के जलसाठा आहे. केवळ गंगाझरी, मोरगाव, माहुकुडा येथील तलाव शंभर टक्के पाणी भरले आहे. मामा तलावांमध्ये एकूण ४१.७९ टक्के जलसाठा आहे. मागील वर्षी ७४.५३ टक्के जलसाठा होता. मध्यम, लघु व जुन्या मालगुजारी तलावांपैकी एकूण ६५ तलावांमध्ये सध्या ३१.१० टक्के जलसाठा झाला आहे.मागील वर्षीचा आकडा गाठणे कठीणजिल्ह्यातील २७ तलाव-जलाशये मागील वर्षी १०० टक्के भरले होते. या जलाशयांमध्ये मानागड, रेंगेपार, कटंगी, कलपाथरी, गुमडोह, कालीमाटी, पिपरिया, पांगडी, राजोली, सोनेगाव, उमरझरी, ओवारा, बेवारटोला, भानपूर, फुलचूर, गंगेझरी, खमारी, कोकणा, मालीजुंगा, मुंडीपार, मेंढा, माहुरकुडा, पळसगाव सौंदड, पालडोंगरी, सौंदड, तेढा यांचा समावेश आहे. यावर्षी केवळ तीन तलाव भरले आहेत. मात्र अधिकतर तलाव रिक्त असल्याने शेतकºयांना सिंचनाचा लाभ मिळत नाही.जलाशयात अपुरा पाणीसाठाजलाशयात शिल्लक असलेल्या पाणीसाठा पाहिल्यास तो देखील मोजक्याच प्रमाणात आहे. इटियाडोह ४१.९३ टक्के, शिरपूर २४.९७ टक्के, पुजारीटोला १७.९८ टक्के, कालीसरार जलाशयात ३३.१८ टक्के पाणीसाठा आहे. धापेवाडा प्रकल्पात ५८.५३ टक्के जलसाठा आहे. सध्या शेतकºयांची पाण्याची गरज लक्षात घेता धापेवाडा जलाशयाचे पाणी सोडले जात आहे.तलाव देखील कोरडीचजिल्ह्यातील मुख्य ७२ तलाव-जलाशयांपैकी केवळ तीन तलाव शंभर टक्के भरले आहेत. उर्वरित ६९ तलावांची स्थिती चिंताजनक आहे. काही जलाशयांमध्ये तर एक टक्कासुद्धा पाणी नाही. मध्यम प्रकल्पाच्या चोरखमारा जलाशयात केवळ ४.९७ टक्के पाणी आहे. कलपाथरीमध्ये ९.८० टक्के जलसाठा झाला. विशेष म्हणजे मध्यम प्रकल्पाच्या ९ तलावांपैकी एकसुद्धा ५० टक्के भरलेला नाही. मागील वर्षी याच कालावधीत या तलावांमध्ये ७६.८२ टक्के जलसाठा होता. तर यंदा लघु प्रकल्पाच्या गुमडोह येथे ४.६०, रिसाला येथे २.२२, ओवारा येथे ३.७६ टक्के जलसाठा आहे. लघू प्रकल्पाच्या २२ तलावांमध्ये केवळ ३१.७० टक्के पाणीसाठा झाला आहे.