शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

मातृ वंदन योजना ठरणार माता व अपत्यासाठी वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:29 IST

कपिल केकत गोंदिया : जिल्हा नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल असल्याने आजही जन्माला येणारी मुले कुपोषित असतात. गर्भवती मातांना सकस ...

कपिल केकत

गोंदिया : जिल्हा नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल असल्याने आजही जन्माला येणारी मुले कुपोषित असतात. गर्भवती मातांना सकस आहार मिळत नसल्याचे हे परिणाम असल्याने पुढे त्याचा माता व बाळांवर दुष्परिणाम जाणवतात. अशात माता गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करून त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी व जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचेही आरोग्य सुधारावे. परिणामी माता मृत्यू व बालमृत्यू दरात घट होऊन ती नियंत्रित राहावी, यासाठी केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना संपूर्ण देशात लागू केली आहे.

महाराष्ट्रात २१ नोव्हेंबर २०१७ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रधानमंत्री मातृ वंदना योजना लागू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. योजना केंद्र व राज्य शासन यांच्या सहभागाने आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असून या योजनेत केंद्र शासनाचा ६० टक्के, तर राज्य शासनाचा ४० टक्के सहभाग असणार आहे. राज्यात १ जानेवारी २०१७ रोजी अथवा त्यानंतर कुटुंबातील पहिल्या अपत्यासाठी गरोदर असणाऱ्या सर्व पात्र गर्भवती महिला आणि स्तनदा माता या योजनेसाठी पात्र आहेत. योजनेंतर्गत पहिल्या अपत्यासाठी पाच हजार रुपये दिले जाणार असून लाभाची रक्कम लाभार्थी महिलेच्या आधार संलग्न बँक खात्यात किंवा पोस्ट ऑफिसमधील खात्यात तीन हप्त्यात जमा केली जाणार आहे.

--------------------------------

तीन टप्प्यात मिळणार पैसे

योजनेंतर्गत पहिला हप्ता एक हजार रुपयांचा असून हा मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून १५० दिवसात गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर, दुसरा हप्ता दोन हजार रुपयांचा असून किमान एकदा प्रसवपूर्व तपासणी केल्यास गर्भधारणेचे ६ महिने पूर्ण झाल्यानंतर व तिसरा हप्ता दोन हजार रुपयांचा असून प्रसूतीनंतर झालेल्या अपत्याची जन्मनोंदणी व बालकाचे प्राथमिक लसीकरण पूर्ण झाल्यावर लाभार्थी महिलेच्या खात्यात जमा केला जाईल.

पहिला टप्पा- १०००

दुसरा टप्पा- २०००

तिसरा टप्पा- २०००

-------------------------

पात्रतेचे निकष काय?

फक्त मानव विकास योजनेचा लाभ घेणाऱ्या तसेच शासकीय सेवेत असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. याशिवाय, योजनेचा लाभ कोणत्याही गटातील तसेच दारिद्र्यरेषेखालील व दारिद्र्यरेषेवरील महिला घेऊ शकते.

---------------------------

लाभासाठी कोठे करायचा संपर्क

ग्रामीण क्षेत्रात एएनएममार्फत पात्र लाभार्थींचा विहित नमुना प्रपत्र १ (अ)चा अर्ज तालुका अधिकाऱ्यांकडे, नगरपालिका क्षेत्रात एएनएममार्फत परिपूर्ण अर्ज वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्याधिकाऱ्यांकडे पाठविला जातो.

----------------------------

महिलांनी लाभ घ्यावा

माता व बाळांसाठी अत्यंत लाभदायी अशी ही मातृ वंदन योजना आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलेला आरोग्य व औषधांसाठी पाच हजार रुपयांची मदत दिली जाते. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा.

- डॉ. वेदप्रकाश चौरागडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी