शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

बँंडच्या तालात लग्नाचा मुहूर्त हरवला

By admin | Updated: May 7, 2015 00:37 IST

लग्न समारंभाने केवळ दोन परिवारांचे नातेसंबंध जुळत नाही तर नातलगांसोबत मित्र, मैत्रिणींच्या भेटीगाठी तसेच ओळखी ...

वऱ्हाड्यांची होरपळ : सकाळचे लग्न लागते दुपारी, दीर्घकाळ नृत्य होतेय प्रतिष्ठेचे लक्षणगोंदिया : लग्न समारंभाने केवळ दोन परिवारांचे नातेसंबंध जुळत नाही तर नातलगांसोबत मित्र, मैत्रिणींच्या भेटीगाठी तसेच ओळखी वाढतात. त्यामुळेच याला माध्यमही मानले जाते. बँडच्या तालावर उन्हाचे चटके खात नाचणे हा तरूणाईची हौस भागविण्याचा मुख्य भाग झाला आहे. मात्र या वातावरणात लग्नाच्या मुहूर्ताचा विसर पडत जात आहे. सकाळचे लग्न दुपारी तर सायंकाळचे लग्न रात्री उशिरा लागत आहेत. तरूणाईच्या मनमौजी कारभारमुळे लग्नातील वडीलधारे नातलग मात्र हताश होत असल्याचे चित्र सर्वत्र जिल्ह्यात सर्वत्र पहायला मिळत आहे.हिंदू विवाह पध्दतीमध्ये लग्नाच्या मुहूर्ताला अतिशय महत्त्व आहे. लग्न जुळविण्यासाठी ज्या प्रकारे वर, वधूंचे लग्न जुळविण्यासाठी कुंडली मिळवणे महत्त्वाचे आहे. तसेच लग्नाच्या मुहूर्ताला देखील तितकेच महत्त्व आहे. मात्र लग्नात नाचत- गाजत वराची मिरवणूक काढण्याच्या नादात मुहूर्ताची आठवण वरांकडील तरूणांना राहत नाही. नातलग, मित्रांचे लग्न म्हणजे जवळच्या मित्रमंडळीकरिता मौजमजा व भेटीगाठी करण्याचे प्रमुख माध्यम असल्याचे मानले जाते.लग्नात वयोवृद्ध नातलग यावेळी नाराजी व्यक्त करतात. मात्र तरूणाईसमोर त्याचा नाईलाज असतो. लग्नाच्या मुहूतार्चा विसर प्रत्येकाला पडलेला आहे. २०-२५ वर्षांपूर्वी विविध समाजात बैलबंडीद्वारे वरात नेत असत. त्यासाठी पहाटेपासूनच तयारी केली जायची. परंतु आता वेळेवर वाहनांनी जाण्याची सवय लागली आहे. समाजातील लग्न मुहूर्तहीन झाले आहे. ‘लग्न एकदाच होते’ या समजामुळे तरूणाईचे लक्ष लग्नात केवळ मौजमजा करण्याकडे लागलेले असते. लग्न समारंभाच्या दिवशी सकाळच्या लग्नाला नियोजनानुसार वराकडील मंडळींनी लवकर यायला पाहिजे. मात्र लग्न मुहूर्ताच्यावेळी वराकडील मंडळी लग्नस्थळी येतात. त्यातच लग्नाचा मुहूर्त हरवला आहे. मात्र लग्नातील वऱ्हाड्यांना वर-वधूकडील पाहूणे मंडळीचा चांगलाच मन:स्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे लग्न मुहूर्ताची कुणालाही फिकीर नाही. यात वधुपक्षाकडील मंडळींना मात्र नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. (वार्ताहर)