शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

बँंडच्या तालात लग्नाचा मुहूर्त हरवला

By admin | Updated: May 7, 2015 00:37 IST

लग्न समारंभाने केवळ दोन परिवारांचे नातेसंबंध जुळत नाही तर नातलगांसोबत मित्र, मैत्रिणींच्या भेटीगाठी तसेच ओळखी ...

वऱ्हाड्यांची होरपळ : सकाळचे लग्न लागते दुपारी, दीर्घकाळ नृत्य होतेय प्रतिष्ठेचे लक्षणगोंदिया : लग्न समारंभाने केवळ दोन परिवारांचे नातेसंबंध जुळत नाही तर नातलगांसोबत मित्र, मैत्रिणींच्या भेटीगाठी तसेच ओळखी वाढतात. त्यामुळेच याला माध्यमही मानले जाते. बँडच्या तालावर उन्हाचे चटके खात नाचणे हा तरूणाईची हौस भागविण्याचा मुख्य भाग झाला आहे. मात्र या वातावरणात लग्नाच्या मुहूर्ताचा विसर पडत जात आहे. सकाळचे लग्न दुपारी तर सायंकाळचे लग्न रात्री उशिरा लागत आहेत. तरूणाईच्या मनमौजी कारभारमुळे लग्नातील वडीलधारे नातलग मात्र हताश होत असल्याचे चित्र सर्वत्र जिल्ह्यात सर्वत्र पहायला मिळत आहे.हिंदू विवाह पध्दतीमध्ये लग्नाच्या मुहूर्ताला अतिशय महत्त्व आहे. लग्न जुळविण्यासाठी ज्या प्रकारे वर, वधूंचे लग्न जुळविण्यासाठी कुंडली मिळवणे महत्त्वाचे आहे. तसेच लग्नाच्या मुहूर्ताला देखील तितकेच महत्त्व आहे. मात्र लग्नात नाचत- गाजत वराची मिरवणूक काढण्याच्या नादात मुहूर्ताची आठवण वरांकडील तरूणांना राहत नाही. नातलग, मित्रांचे लग्न म्हणजे जवळच्या मित्रमंडळीकरिता मौजमजा व भेटीगाठी करण्याचे प्रमुख माध्यम असल्याचे मानले जाते.लग्नात वयोवृद्ध नातलग यावेळी नाराजी व्यक्त करतात. मात्र तरूणाईसमोर त्याचा नाईलाज असतो. लग्नाच्या मुहूतार्चा विसर प्रत्येकाला पडलेला आहे. २०-२५ वर्षांपूर्वी विविध समाजात बैलबंडीद्वारे वरात नेत असत. त्यासाठी पहाटेपासूनच तयारी केली जायची. परंतु आता वेळेवर वाहनांनी जाण्याची सवय लागली आहे. समाजातील लग्न मुहूर्तहीन झाले आहे. ‘लग्न एकदाच होते’ या समजामुळे तरूणाईचे लक्ष लग्नात केवळ मौजमजा करण्याकडे लागलेले असते. लग्न समारंभाच्या दिवशी सकाळच्या लग्नाला नियोजनानुसार वराकडील मंडळींनी लवकर यायला पाहिजे. मात्र लग्न मुहूर्ताच्यावेळी वराकडील मंडळी लग्नस्थळी येतात. त्यातच लग्नाचा मुहूर्त हरवला आहे. मात्र लग्नातील वऱ्हाड्यांना वर-वधूकडील पाहूणे मंडळीचा चांगलाच मन:स्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे लग्न मुहूर्ताची कुणालाही फिकीर नाही. यात वधुपक्षाकडील मंडळींना मात्र नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. (वार्ताहर)