शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

बाजार विभागाचीही वसुली मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 23:56 IST

नगर परिषदेची मालमत्ता कर वसुलीसाठी धडपड सुरू असतानाच आता नगर परिषदेच्या बाजार विभागानेही वसुलीसाठी कं बर कसली आहे.

ठळक मुद्दे२.१० कोटींचे टार्गेट : दुकान भाडे व सेवा कर

ऑनलाईन लोकमतगोंदिया : नगर परिषदेची मालमत्ता कर वसुलीसाठी धडपड सुरू असतानाच आता नगर परिषदेच्या बाजार विभागानेही वसुलीसाठी कं बर कसली आहे. नगर परिषदेच्या मालकीच्या दुकान गाळ््यांचे भाडे व सेवा कर वसुलीसाठी विभागाने विशेष मोहीम सुरू केली आहे. बाजार विभागाला यंदा दोन कोटी १० लाख ४१ हजार ९८ रूपयांचे मागील थकबाकी व चालू मागणीचे टार्गेट आहे.मालमत्ता कर तसेच दुकान व इमारतींचे भाडे हे दोनच नगर परिषदेच्या सर्वाधीक उत्पन्नाचे स्त्रोत आहे. यामुळे दोन्ही विभागांची पुरेपूर वसुली होणे नगर परिषदेसाठी गरजेचे आहे. आतापर्यंत नगर परिषदेचे मालमत्ता कर वसुलीकडे लक्ष राहत होते. तर बाजार विभागाच्या या उत्पन्नाकडे तेवढे काही लक्ष दिले जात नव्हते असेच काही दिसत होते. यंदा मात्र नगर परिषदेचे उत्पन्न जास्तीत जास्त वाढावे यासाठी बाजार विभागानेही वसुलीसाठी कंबर कसली आहे.नगर परिषद बाजार विभागाला यंदा मागील थकबाकी व चालू मागणी असे एकूण दोन कोटी १० लाख ४१ हजार ९८ रूपये वसुलीचे टार्गेट आहे. यात आतापर्यंत फक्त ५२ लाख ८७ हजार ३१५ रूपयांची वसुली झाल्याची माहिती आहे. यंदा काहीही करून उरलेल्या २७ दिवसांत हे टार्गेट सर करण्यासाठी प्रभारी बाजार निरीक्षक मुकेश मिश्रा आपल्या सहकाºयांना घेऊन मैदानात उतरले आहेत. यासाठी त्यांनी १ मार्चपासून बाजार विभागाची विशेष वसुली मोहीम सुरू केली आहे.शहरात पालिकेच्या १०७५ मालमत्ताबाजार विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरात नगर परिषदेच्या मालकीचे १०७० दुकान गाळे, ४ इमारती व १ मोबाईल टॉवर आहे. या सर्वांचे भाडे व सेवा कर वसुलीची जबाबदारी बाजार विभागाकडे आहे. मात्र बाजार विभागाकडे वसुलीसाठी फक्त दोनच कर्मचारी असल्याने वसुलीचे काम पाहिजे तसे होत नव्हते. यासाठी यंदा बाजार विभागाने कंत्राटी तत्वावर चार माणसे घेतली असून त्यांच्यासह प्रभारी बाजार निरीक्षक मिश्रा व दोन वसुली कर्मचारी वसुलीसाठी फिरत आहेत.अन्यथा सिलींग व कायदेशीर कारवाईनगर परिषदेच्या वसुलीचे काऊंटडाऊन सुरू झाले असून येत्या ३१ तारखेपर्यंत पूर्ण वसुली करणे गरजेचे आहे. यामुळे बाजार विभाग जास्तीत जास्त वसुलीसाठी प्रयत्न करीत आहे. यासाठी शहरात मुनादी केली जात असून ३१ तारखेपर्यंत थकबाकीदारांनी त्यांच्याकडील थकबाकी व भाडे भरावे असे कळविले जात आहे. अन्यथा सिलींगची कारवाई केली जाणार असून त्यांचे दुकान व इमारतीचा लिलाव करून संबंधीतांचा कब्जा संपुष्टात आणला जाणार असल्याचे मिश्रा यांनी सांगीतले.