शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

अनेक गाड्यांच्या थांब्यांपासून स्थानके वंचित

By admin | Updated: February 26, 2016 02:01 IST

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या मार्गावरून धावणाऱ्या अनेक रेल्वेगाड्यांचे थांबे गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील अनेक स्थानकांवर नाही.

सावत्र व्यवहार : मानवरहीत रेल्वे क्रॉसिंगकडे दुर्लक्षचदेवानंद शहारे गोंदियादक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या मार्गावरून धावणाऱ्या अनेक रेल्वेगाड्यांचे थांबे गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील अनेक स्थानकांवर नाही. अनेक दिवसांची प्रवाशांची तशी मागणी असतानाही रेल्वे प्रशासन दुर्लक्षच करीत आहे. लोकप्रतिनिधीसुद्धा त्यासाठी फारसे प्रयत्न करताना दिसून येत नाही.तिरोडा, भंडारा रोड, गोंदिया, आमगाव, सालेकसा, वडसा, सौंदड, तुमसर आदी स्थानकांना स्टॉपेजची प्रतीक्षा आहे. प्रवासी, व्यापारी लोकप्रतिनिधींकडे जावून निवेदने देतात. परंतु रेल्वे प्रशासन महाराष्ट्रातील विशेषकरून विदर्भातील लोकप्रतिनिधींची ऐकूण घेत नसल्यासारखी स्थिती असल्याचे दिसून येते. तिरोडा येथे विदर्भ एक्सप्रेसचा थांबा, गोंदियात पूरी-दुरंतो आदी गाड्यांचा थांबा मिळणे गरजेचे आहे. पूजा स्पेशल व समर स्पेशल गाड्यांमध्ये गोंदियाचा थांबाच दिसून येत नाही. बिलासपूर झोनमध्ये नागपूर विभागात सर्वाधिक उत्पन्न देणारा स्थानक आहे. (नागपूर स्टेशन मध्य रेल्वेचा आहे) असे असतानाही गोंदिया जिल्ह्यात मोडणारी स्थानके थांब्यांपासून व विकासापासून वंचित आहेत. दपूम रेल्वेचे मुख्यालय बिलासपूर (छ.ग) मध्ये आहे. विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली तसेच चंद्रपूर व नागपूर जिल्ह्यातील काही भाग या अंतर्गत मोडते. नवीन गाड्यांचा शुभारंभ असो, स्टॉपेज देणे असो, प्रवासी गाड्यांचे टर्मिनस असो, तिसरी लाईन घालणे असो किंवा इतर विकास कामे असो, छत्तीसगडला प्राधान्य दिले जाते व विदर्भातील जिल्ह्यांशी सावत्र व्यवहार केला जातो. छत्तीसगडच्या बिलासपूरवरून दररोज २१ जोडी गाड्या सुटतात, रायपूर व दुर्गवरून २३ जोडी गाड्या सुटतात. मात्र गोंदियातून केवळ मुख्य मार्गावर मागील वर्षी बरोनी एक्सप्रेस ही एकच गाडी सुरू करण्यात आली, तेही राजकीय दबावाने. २० वर्षापासून बनलेल्या या झोनने गोंदिया, भंडारा, ईतवारी, चांदाफोर्टवरून प्रवासी गाडी सुरू करण्याचे प्रयत्न केले नसल्याचे रेल्वे प्रवाशी संघठनेचे म्हणणे आहे.दुसरीकडे मानवरहीत रेल्वे क्रॉसिंगची समस्या आवासून उभी आहे. अशा मार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात घडून जीवितहानी व वित्तहानी होते. गोंदिया-चांदाफोर्ट व गोंदिया-बालाघाट मार्गावर मोठ्या प्रमाणात मानवरहीत रेल्वे क्रॉसिंग आहेत. अनेकदा अपघात घडल्याचे वृत्त येते. मात्र रेल्वे प्रशासनाने अद्यापही ही समस्या सोडविली नाही. सध्याच्या अर्थसंकल्पात मानवरहीत रेल्वे क्रासिंगवर रेडिओव्हेवजच्या सहाय्याने सूचना देण्यासाठी आयआयटी कानपूरसोबत करार करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र त्यामुळे मानवरहीत रेल्वे क्रॉसिंगची समस्या कायमची संपुष्ठात येणे शक्य नसल्याची प्रतिक्रिया गोंदियावासीय देत आहेत. मनुष्यबळालाही प्राधान्य देणे गरजेचे आहे.