शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

अनेक विद्यार्थी राहणार प्रवेशांपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 22:40 IST

शासनाने एकही बालक शाळाबाह्य राहू नये, यासाठी शिक्षणाचा अधिकार कायदा लागू केला. मात्र याच कायद्यातील अट आता अडचणीची ठरत आहे. परिणामी अनेक बालकांना पहिल्या वर्गात प्रवेश घेण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. दरम्यान या अटीमुळे जि.प.शाळांच्या तुकड्या कमी होणार असून शिक्षक सुध्दा अतिरिक्त ठरणार आहेत. त्यामुळे ही अट रद्द करण्यासाठी शिक्षकांनीच पुढाकार घेतल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देशिक्षणाचा अधिकार कायदा : अट ठरतेय जाचक, शिक्षकही अडचणीत, अट रद्द करा, पालक व मुख्याध्यापकांची पदाधिकाऱ्यांकडे धाव

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासनाने एकही बालक शाळाबाह्य राहू नये, यासाठी शिक्षणाचा अधिकार कायदा लागू केला. मात्र याच कायद्यातील अट आता अडचणीची ठरत आहे. परिणामी अनेक बालकांना पहिल्या वर्गात प्रवेश घेण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. दरम्यान या अटीमुळे जि.प.शाळांच्या तुकड्या कमी होणार असून शिक्षक सुध्दा अतिरिक्त ठरणार आहेत. त्यामुळे ही अट रद्द करण्यासाठी शिक्षकांनीच पुढाकार घेतल्याचे चित्र आहे.शिक्षणाचा अधिकार कायदा अंतर्गत विद्यार्थ्यांना पहिल्या वर्गात प्रवेश देताना ३० सप्टेबर २०१९ पर्यंत त्याचे वय ६ वर्ष पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे. या पेक्षा एक दोन महिने वय कमी असलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देऊ नये,आदेश शिक्षण विभागाने काढले आहे. या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि इतरही शाळांना दिले आहे.त्यामुळे जेव्हा पालक आपल्या पाल्यांना घेवून जि.प.शाळेत इयत्ता पहिल्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी जात आहेत. तेव्हा त्यांना मुख्याध्यापक व शिक्षक आपल्या पाल्याचे वय ३० सप्टेंबरपर्यंत ६ वर्ष पूर्ण होत नसल्याने प्रवेश देता येणार नसल्याचे सांगत आहेत. परिणामी पालकांना आल्या पावलीच परत जावे लागत आहे. शिवाय या अटीमुळे बालकांना कुठल्याच शाळेत प्रवेश मिळणार नसल्याने त्यांचे वर्षे सुध्दा वाया जाणार आहे.एकीकडे शासनच एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहू नये यासाठी शिक्षणाचा अधिकार कायदा आणि शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोध मोहीम राबवित आहे. तर दुसरीकडे स्वत: जाचक नियम तयार करुन विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश मिळण्यापासून वंचित ठेवण्याचे काम करीत आहे.त्यामुळे पालकांमध्ये रोष व्याप्त आहे.तुकड्या कमी होणारखासगी शाळांमुळे आधीच जि.प.च्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे.त्यातच आता शिक्षण विभागाने पहिल्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या बालकाचे वय ३० सप्टेंबरपर्यंत ६ वर्ष पूर्ण असण्याची अट घातली आहे.परिणामी जि.प.शाळांच्या अनेक तुकड्या कमी होण्याची शक्यता असून मोठ्या प्रमाणात शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये सुध्दा चिंतेचे वातावरण आहे.पालकांसह शिक्षकांचे पदाधिकाऱ्यांना पत्रशासनाने इयत्ता पहिल्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लागू केलेली अट जाचक ठरत आहे.त्यामुळे ही अट रद्द करण्यात यावी असे पत्र सडक अर्जुनी, तिरोडा, गोंदिया तालुक्यातील अनेक पालक व शिक्षकांनी शिक्षण सभापती, जि.प.सदस्य आणि शिक्षणाधिकारी यांना दिले आहे.शिक्षण विभाग यावर काय निर्णय घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.पहिल्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याचे वय ३० सप्टेंबरपर्यंत ६ वर्ष पूर्ण असण्याची टाकलेली अट अन्यायकारक आहे. यामुळे जिल्ह्यातील हजारो बालकांचे वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे. तसेच तुकड्या कमी होणार असल्याने शिक्षक सुध्दा अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही अट रद्द करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करु.-गंगाधर परशुरामकरजि.प.सदस्य.