शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

अनेक शाळा अघोषित बंद

By admin | Updated: July 23, 2014 00:04 IST

संततधार पाऊस सुरू असल्याने जनजीवन विष्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील अनेक शाळा अघोषित बंद होेत्या. सकाळपाळीत असलेल्या शाळांमध्ये काही ठिकाणी विद्यार्थी आले होते.

अनेक शाळा पाण्याखाली : शहर झाले जलमयनरेश रहिले - गोंदियासंततधार पाऊस सुरू असल्याने जनजीवन विष्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील अनेक शाळा अघोषित बंद होेत्या. सकाळपाळीत असलेल्या शाळांमध्ये काही ठिकाणी विद्यार्थी आले होते. मात्र पूर परिस्थिीती पाहून अनेक शाळांनी सुटी दिली. जिल्ह्यातील बहुतांश शाळा मंगळवारी बंद होत्या.तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यात सगळीकडे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन दिवस पावसाची रिपरिप सुरू होती. सोमवारच्या रात्री पासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने जिल्ह्यातील नदी, नाले तुडूंब भरले. सर्वत्र पावसाच्या जोरदार सरी येत असल्याने जिल्ह्यातील अनेक घरांची हालत खस्ता झाली आहे. काही घरांना जबर धक्का बसला आहे. तर काही घरे अंशत: पडली आहेत. रात्री पासून होणाऱ्या जोरदार पावसामुळे सकाळ पर्यंत नदी, नाले दुथडी भरून वाहत होते. परंतु पावसाचा जोर कमी न झाल्यामुळे जिकडे तिकडे पुरपरिस्थीती होती. आठही तालुक्यातील अनेक शाळा बंद होत्या. ज्या शाळा सकाळ पाळीच्या होत्या. त्या ठिकाणी निम्या विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. परंतु पूर परिस्थिती लक्षात घेता शिक्षकांनी विद्यार्थ्यांना एका तासिकेनंतर सुट्टी देण्यात आली. ग्रामीण भागात असलेल्या शाळांमध्ये दूरदूरच्या विद्यार्थ्यांना जावे लागते. त्यांना नाले पार करून जावे लागत असल्याने अश्या पावसात विद्यार्थी पूरात अडकण्याची शक्यता असते. यामुळे विद्यार्थीच शाळेत जात नाही. ग्रामीण भागातील सर्व शाळा अघोषित बंद होत्या. शहरातीलही शाळांमध्ये विद्यार्थी नव्हते. काही ठिकाणी शिक्षकच होते. अनेक ठिकाणी कार्यरत असलेले शिक्षक शहराच्या ठिकाणावरून ये- जा करीत असल्याने पावसामुळे त्यांना शाळेत जाता आले नाही. आमगाव तालुक्याच्या शिवणी येथील शिक्षकांना किडंगीपार येथील पूलावरून जाता आले नाही. तसेच जवरी येथील शिक्षकांना शाळेत जाण्यासाठी मार्गच नव्हता. किंडगीपार येथील जवरी नाल्यावरऊन पाच फूट व शिवणी नाल्यावरून तीन फूट पाणी वाहात असल्याने शिक्षकांना शाळेत जाता आले नाही.गोंदिया शहरातील नगर परिषदेच्या काही शाया उघडल्या. मात्र शाळेत शिक्षक नाही व विद्यार्थी नाही अशी स्थिती शहरातील शाळांमध्ये होती. संततधार पावसामुळे शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी घुसले होते. थंड वाऱ्यासह घरात येणाऱ्या पाण्यात आपल्या घरातील साहित्य आंथरून, पांघरून वाया जाऊ नये यासाठी साहित्य वाचविण्यासाठी नागरिकांचा आटापिटा सुरू होता. शाळकरी मुलेही आपल्या घरातील साहित्य सुरक्षित स्थळी हलविण्याच्या प्रयत्नात होते. शहरातील शाळांमध्ये शिक्षक नाही, विद्यार्थी नाही ही परिस्थिती पाहून कर्मचाऱ्यांनी शाळा बंद करून आपापले घर गाठले. देवरी तालुक्यातील काही शाळा उघड्या होत्या. मात्र शाळेत विद्यार्थीच आले नसल्याने शिक्षकांना दिवसभर गप्पा मारत राहावे लागले. देवरीचे तहसील कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, विद्युत वितरण कार्यालय व ग्रामपंचायत या शासकीय कार्यालयात पाणी गळत असल्यामुळे येथील लोकांना गैरसोय झाली. देवरी येथील नाल्याला पूर असल्यामुळे नाल्याची थोप तहसील कार्यालयापर्यंत आली होती. जिकडे तिकडे पूर परिस्थती असल्यामुळे ग्रामीण भागाचा संपर्क तालुक्याशी तुटला होता.