शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

रेल्वे स्थानक परिसरात अनेक समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 20:54 IST

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मंडळातील सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारे स्थानक म्हणून गोंदिया रेल्वे स्थानक ओळखले जाते. मात्र या रेल्वे स्थानकाला विविध समस्यांनी ग्रासले असून त्याचा फटका प्रवाशांना बसत असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देउपाय योजनांकडे दुर्लक्ष : प्रवासी हैराण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मंडळातील सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारे स्थानक म्हणून गोंदिया रेल्वे स्थानक ओळखले जाते. मात्र या रेल्वे स्थानकाला विविध समस्यांनी ग्रासले असून त्याचा फटका प्रवाशांना बसत असल्याचे चित्र आहे.रेल्वे स्थानकाच्या दक्षिण भागात मुख्य गोंदिया शहर वसलेले आहे. स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी तीन मुख्य मार्ग आहेत. यापैकी सर्वाधिक उपयोगी ठरणारा मार्ग पूर्व दिशेकडून येतो हाच मार्ग सर्वाधिक त्रासदायी ठरत आहे.सदर मार्ग उखडलेला असून याच मार्गावर एका ठिकाणी मोठा खड्डा तयार झाला आहे. लहान रस्त्यावरून स्थानकापर्यंत पोहोचणे शक्य नाही. याच मार्गाने रिक्शा व आॅटो सुद्धा ये-जा करतात. इतर वाहन चालकसुद्धा याच मार्गाने आत येतात. येथेच फुटपाथ व्यावसायीक बसतात. जेव्हा एखादी ट्रेन येते तेव्हा प्रवाशांच्या गर्दीमुळे अरुंद रस्त्यामुळे फलाटापर्यंत पोहचण्यास अडचण निर्माण होते. पावसाळ्याच्या दिवसात या रस्त्यावर गुडघाभर पाणी असते त्यातूनच प्रवाशांना मार्ग शोधावा लागतो. ही समस्या मार्गी लावण्यासाठी रेल्वे विभाग किंवा स्थानिक नगर परिषदेने कुठलेच प्रयत्न केले नाही. गोंदिया रेल्वे स्थानक परिसरात अस्तव्यस्त लागलेले आॅटो, सायकल रिक्शा व चारचाकी वाहनांच्या रांगा याचा देखील प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. काही महिन्यांपूर्वी सायकल स्टॅण्डसाठी रेल्वे विभागाने रेल्वे स्थानकाच्या परिसरातील अर्धी जागा उपलब्ध करून दिली होती. उर्वरित अर्ध्यापेक्षा कमी जागेवर रिक्शा, आॅटो, कार पार्किंगची व्यवस्था केली होती. मात्र या व्यवस्थेत अद्यापही सुधारणा झालेली नाही.अधिकाऱ्यांची मनमर्जीरेल्वे विभागाने कोट्यवधी रूपये खर्चून शॉपिंग कॉम्प्लेक्सचे बांधकाम केले. आता या शॉपिंग कॉम्प्लेक्सची अवस्था फार बिकट आहे. या कॉम्प्लेक्समध्ये अद्यापही एकही दुकान सुरू करण्यात आले नाही. रेल्वेने अनेकदा लिलावाचा प्रयत्न केला. या ठिकाणावरून केवळ थोड्याच अंतरावर मार्केट आहे. त्यामुळेच येथे कुणी व्यावसायीक दुकान लावण्यास इच्छुक नाही. येथे जवळच रेल्वे सुरक्षा दलाने एक पोलीस चौक बनविली आहे.सुरक्षाविषयक सुविधांकडे दुर्लक्षरेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशव्दारालगत पार्सल विभागाचे कार्यालय आहे. या कार्यालयातूनच प्रवाशी ये-जा करतात. त्यामुळे येथे केव्हाही एखादी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.