शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
3
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
6
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
7
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
8
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
9
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
10
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
11
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
12
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
13
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
14
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
15
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
16
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
17
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
18
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
19
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
20
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा

अनेक समस्यांच्या विळख्यात सापडले मुंडीकोटा गाव

By admin | Updated: October 9, 2015 02:15 IST

हे गाव अनेक समस्यांचे माहेरघर झालेले आहे. उखडलेल्या रस्त्यांमुळे अपघात, बाजार चौकातील अतिक्रमण व व्यापारी संकुलाचे गाडे या नित्याच्या समस्या होवून गेल्या आहेत.

व्यापारी संकुलाचे गाडे कुणाचे? : स्मशानभूमीसाठी जागेचा अभावमुंडीकोटा : हे गाव अनेक समस्यांचे माहेरघर झालेले आहे. उखडलेल्या रस्त्यांमुळे अपघात, बाजार चौकातील अतिक्रमण व व्यापारी संकुलाचे गाडे या नित्याच्या समस्या होवून गेल्या आहेत. मात्र सदर समस्या सोडविण्याकडे संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांचे ठाम दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. मुंडीकोटा ते बस स्थानकाकडे हनुमान मंदिराजवळून जाणारा रस्ता संपूर्ण उखडलेला आहे. ठिकठिकाणी खड्डे पडलेले असून ते अपघाताला आमंत्रण देत आहेत. दोन वर्षांपूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र सद्यस्थितीत डांबर, गिट्टी व मुरूम कुठे गेला याचा पत्ताच लागत नाही. शिवाय या रस्त्यावरून नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे सदर रस्ता अपघाताला आमंत्रण देत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी सदर रस्त्याच्या दुरूस्तीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.घोगरा ते मुंडीकोटा रस्त्याच्या मागील भागात अनेक व्यक्तींनी अतिक्रमण केले आहे. तसेच या अतिक्रमणाच्या जागेत मोठ्या थाटात आपले व्यवसाय करीत आहेत. त्यामुळे सोमवारी भरणाऱ्या आठवडी बाजाराकरिता जागा कमी पडते. बाजार चौकातील हे अतिक्रमण हटविण्याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत असून हा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू आहे. मुंडीकोटा येथील भंभोडी रेहो पुलाजवळ स्मशान शेड तयार करण्यात आलेला होता. पण चोरट्यांनी या शेडमधील प्रेत जाळण्याची लोखंडी शिडी लंपास केली. त्यामुळे शेडमध्ये सध्या प्रेत जाळता येत नाही. भंभोडी नाल्याच्या पुलाजवळ उन्हाळ्यात व पावसाळ्यात मोकळ्या जागेत प्रेत जाळले जाते. पावसात अनेकांची चांगलीच फजिती होते. पावसात प्रेत जळला किंवा नाही याची वाट पाहत बसावे लागते. परंतु या ठिकाणी बसण्यासाठी तसेच प्रेत जाळण्यासाठी कोणत्याही प्रकारची सोय नाही, असा हा घाट आहे.मुंडीकोटा ते घोगरा रस्त्याजवळ महात्मा गांधी व्यापारी संकुलाचे ग्रामीण विकास यंत्रणेंतर्गत सन १९९७-९८ या वर्षी १९ गाडे तयार करण्यात आले होते. या योजनेंतर्गत ते गाळे दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींना वाटप करण्याची योजना होती. परंतु ते गाळे श्रीमंत व्यक्तींना देण्यात आले. या ठिकाणी श्रीमंत व्यक्तींचे व्यवसाय सुरू आहेत. दारिद्र्यरेषेखालील ज्या व्यक्तींना हे गाळे देण्यात आले, त्यांनी आपला व्यवसाय न करता दुसऱ्या व्यक्तींना अधिक पैसा घेवून भाडाने दिले आहेत. तर काहींनी आपले सामान ठेवण्याकरिता गोदाम तयार केले आहे. तर काही व्यक्तींनी गाळ्यांना कुलूप लावून ठेवलेले आहेत, असे अनेक गाळे बंद पडून आहेत. या गाळ्यांकडे अनेक महिन्यांपासून थकीत रक्कम बाकी आहे. पण कारवाई मात्र शून्य. गाळे कुणाचे व राहतो को? असा प्रश्न गावकऱ्यांसमोर उभा आहे. यावर मुंडीकोटा ग्रामपंचायत कार्यालयाने कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. एखाद्या व्यक्तीने हे गाळे रिकामे केले तर ग्रामपंचायतची विचारपूस न करता या गाळ्यांत कोणताही व्यक्ती शिरून व्यवसाय करीत असतो. पण याकडे कोणत्याही अधिकाऱ्याचे लक्ष नाही. (वार्ताहर)