शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

घाटाची लिलाव प्रकिया रखडल्याने मालसुतो अभियान झाले सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 05:00 IST

अवैधरित्या रेती वाहून नेणारे व्यावसायिक प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याचे खिसे गरम करून राजरोसपणे अवैध रेतीची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी परिसरातून गाढवी नदी वाहत असल्याने रेतीची उपलब्धता फार मोठी आहे. परंतु यावर्षी कोणत्याच रेती घाटाचे लिलाव झाले नाहीत. लिलाव प्रक्रिया गेल्या एक वर्षीपासून रखडली आहे.

ठळक मुद्देरेती माफीयांना आले सुगीचे दिवस : शासनाचा महसूल पाण्यात

लोकमत न्यूज नेटवर्ककेशोरी : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी परिसरातील रेती घाटांची लिलाव प्रक्रिया रखडल्यामुळे शासनाचा महसूल बुडाला आहे. मात्र, अवैधरित्या रेती वाहून नेणाऱ्या व्यावसायिकांवर आळा घालण्यासाठी ज्या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तेच मूग गिळून गप्प बसल्याचे चित्र आहे. या संधीचा फायदा घेऊन काही जणांनी मालसुतो अभियान सुरू केल्याची माहिती आहे. अवैधरित्या रेती वाहून नेणारे व्यावसायिक प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याचे खिसे गरम करून राजरोसपणे अवैध रेतीची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी परिसरातून गाढवी नदी वाहत असल्याने रेतीची उपलब्धता फार मोठी आहे. परंतु यावर्षी कोणत्याच रेती घाटाचे लिलाव झाले नाहीत. लिलाव प्रक्रिया गेल्या एक वर्षीपासून रखडली आहे. वास्तविक पाहता शासन प्रत्येक गावात घरकुल योजना राबवून मोठ्या प्रमाणात सिमेंट काँक्रटीची  घरे बांधून देत आहे. त्यासाठी आवश्यक असलेला प्रमुख घटक रेती आहे. रेतीशिवाय घर बांधणी शक्य नाही. त्यामुळे रेती घाटांचे लिलाव होणे अत्यंत महत्त्वाचे होते. मात्र, अजूनही या परिसरातील कोणत्याही रेती घाटाचे लिलाव झाले नाही. त्यामुळे अवैधरित्या रेती चोरीचे प्रमाण वाढले आहे. हे रेती चोरीचे प्रमाण रोखण्यासाठी ज्या विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अधिकारी व कर्मचारी योग्य प्रकारे आपली जबाबदारी पार पाडीत नसतील तर अवैध  रेती वाहतुकीवर आळा कोण लावेल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अवैध रेती वाहतूक करणारे व्यावसायिक अधिकारी व कर्मचाऱ्यांना चूप बसविण्यासाठी खिसे गरम करीत चर्चा आहे. रेती घाट लिलाव न झाल्यामुळे अनधिकृत पैसे कमावण्याची संधी संबंधीत विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्राप्त झाली आहे.  

कुंपणच शेत खात असेल तर...- अवैध रेती वाहून नेणाऱ्या व्यावसायिकांना रोखण्यासाठी शासनाने कितीही जबरदस्त उपाययोजना राबविल्या तरी त्या अपयशी ठरल्याशिवाय राहणार नाहीत. त्यासाठी कर्तव्यनिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नितांत गरज आहे. त्याशिवाय अवैध रेती वाहून नेणाऱ्या व्यावसायिकांवर चाप लागणार नाही तसेच बरोबर रेती घाटांचे लिलाव होणे अपेक्षित आहे. त्याशिवाय अवैधरित्या रेती चोरीचे प्रमाण कमी होणार नाही.

 

टॅग्स :sandवाळूmafiaमाफिया