शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
3
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
6
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
7
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
8
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
9
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
10
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
11
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
12
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
13
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
14
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
15
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
16
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
17
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
18
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
19
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
20
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा

संरक्षण भिंत व वर्गखोल्या बनवा

By admin | Updated: December 17, 2015 01:52 IST

नगर परिषदेद्वारे स्थापन करण्यात आलेल्या लोधीनगर (तिरोडा) येथील अमर शहीद राणी अवंतीबाई ..

नागरिकांची मागणी : अमर शहीद राणी अवंतीबाई न.प. शाळातिरोडा : नगर परिषदेद्वारे स्थापन करण्यात आलेल्या लोधीनगर (तिरोडा) येथील अमर शहीद राणी अवंतीबाई न.प. शाळेला संरक्षण भिंत व दोन वर्गखोल्या तयार करण्याची मागणी नागरिकांनी नगर प्रशासनाकडे केली आहे.नगर परिषदेची स्थापना सन १९५६ ला झाली. तेव्हापासून तत्कालीन वॉर्ड डॉ. राजेंद्रप्रसाद लोधीनगरमध्ये नगर परिषदेद्वारे डॉ. राजेंद्रप्रसाद न.प. प्राथमिक शाळा सन १९७० पर्यंत वर्ग पहिली ते चौथीपर्यंत सुरू होती. यानंतर या शाळेतील वर्ग तिसरी व चौथी हळूहळू बंद ककरण्यात आले व याच नावाची शाळा जुनीवस्ती तिरोडा येथे सुरू करून लोधीनगर गावात फक्त पहिली व दुसरी वर्ग ठेवण्यात आले. ही शाळा भाड्याच्या घरात सुरू होती.सन १९५६ पासून स्थापित शाळेची स्वत:ची इमारत न बनविता सन १९७० पासून सुरू झालेल्या शाळेची पक्की इमारत न.प. द्वारे बनविण्यात आली होती. सन १९८५ मध्ये निवडून आलेले तत्कालीन न.प. सदस्य राधेशाम नागपुरे यांनी शाळेची पूर्ण माहिती गोळा केली. तेव्हा त्यांना माहिती मिळाली की डॉ. राजेंद्र प्रसाद न.प. शाळेच्या नावाने जुनीवस्ती इथे इमारतीसाठी न.प.ला युडी-६ अंतर्गत कर्ज मिळाले असून आता याच नावाने इतर ठिकाणी इमारत बनविण्यासाठी कर्ज दिले जाणार नाही.यानंतर सन १९८७ ला लोधीनगर येथे नवीन शाळा अमर शहीद रानी अवंतीबाई न.प. प्राथमिक शाळा स्थापन करुन उपसंचालक नगर पालिका प्रशासनाकडून मंजुरी प्राप्त करण्यात आली. ही शाळा आजपावेतो वर्ग एक ते चारपर्यंत सुरू आहे. या शाळेची नवीन इमारत बनविण्यासाठी न.प. ने ०.५० डिसमिल जागा सन २००६ मध्ये घेतली व सन २००७ मध्ये शाळेत दोन खोल्या व एक कार्यालय सर्वशिक्षा अभियानांतर्गत बनविण्यात आले. तिरोडा शहरातील नाला जुनीवस्तीपासूनच्या शेतामधून वाहात असून शाळेजवळ असलेल्या नाल्यामधून वाहून गावाला व शाळेला लागूृन असलेल्या मोठ्या नाल्यास मिळतो. पावसाळ्यात पाणी नालीतून वाहतो आणि नाली कच्ची असल्यामुळे शाळेतील मुलांना या पाण्यापासून नेहमी धोका पत्करावा लागतो. शाळेला संरक्षणभिंत नसल्यामुळे मोकाट जनावरेही शाळेच्या आवारात येतात. याचाही धोका असतो. यासाठी संरक्षण भिंत व पक्की नाली बनवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)दोन वर्गांसाठी दोन खोल्यांची गरजया शाळेत वर्ग १ ते ४ या वर्गाचे विद्यार्थी शिकतात. पण शाळेत दोन खोल्या असल्याने एका खोली वर्ग पहिली व दुसऱ्या खोलीत वर्ग दोनचे विद्यार्थी बसून अध्ययन करतात. हे विद्यार्थी कसे शिकत असतील व शिक्षकही कसे शिकवत असतील, याची प्रचिती या प्रकारावरून येते. शिक्षणाचा खालचा पायाच कमजोर असेल तर वर मजबुती कशी राहणार. चार वर्गांसाठी चार खोल्यांची अत्यंत गरज असतानाही प्रशासन या समस्येकडे का बरे लक्ष देत नाही, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. तसेच मोकाट जनावरांच्या बंदोबस्तासाठी संरक्षण भिंतीचीही आवश्यकता आहे. यासाठी माजी नगरसेवक राधेशाम नागपुरे यांनी शाळेत संरक्षण भिंत व दोन खोल्या शाळेत बनविण्याची नगर परिषद प्रशासनास मागणी केली आहे.