शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

कुटूंब अर्थसहाय्य योजनेचा निधी त्वरित उपलब्ध करून द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 22:28 IST

कुटूंबातील कर्त्या पुरुषाच्या मृत्यू झाल्यास मृतकाच्या कुटूंबीयांना आर्थिक मदत देण्यासाठी शासनातर्फे कुटूंब अर्थसहाय्य योजना राबविली जात आहे. यातंर्गत जवळपास दीडशेच्यावर प्रस्ताव मागील सहा महिन्यांपासून तिरोडा तहसील कार्यालयात प्रलंबित आहेत. या योजनेसाठी शासनाकडून ३० लाख रुपयांचा निधी न मिळाले या योजनेचे प्रस्ताव प्रलंबित असल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देदीडशे प्रस्ताव प्रलंबित : ३० लाखांच्या निधीची गरज

लोकमत न्यूज नेटवर्ककाचेवानी : कुटूंबातील कर्त्या पुरुषाच्या मृत्यू झाल्यास मृतकाच्या कुटूंबीयांना आर्थिक मदत देण्यासाठी शासनातर्फे कुटूंब अर्थसहाय्य योजना राबविली जात आहे. यातंर्गत जवळपास दीडशेच्यावर प्रस्ताव मागील सहा महिन्यांपासून तिरोडा तहसील कार्यालयात प्रलंबित आहेत. या योजनेसाठी शासनाकडून ३० लाख रुपयांचा निधी न मिळाले या योजनेचे प्रस्ताव प्रलंबित असल्याची माहिती आहे.तर इंदिरा गांधी, संजय गांधी आणि श्रावण बाळ योजनेचे अर्थसहाय्य तालुक्यातील लाभार्थ्यांना देण्यात आले नाही. त्यामुळे लाभार्थ्यांची परवड होत आहे. कुटूंबातील कुटूंब प्रमुख व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कुटुंब अर्थसहाय योजनेतंर्गत पत्नी व अथवा कुटुंबीयांना २० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य केले जाते. यातंर्गत तालुक्यातील दीडशे लाभार्थ्याचे प्रस्ताव मागील सहा महिन्यांपासून तहसील कार्यालयात प्रलंबित आहे. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी ८ लाख २० हजार रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिल्याने ४१ प्रकरणे निकाली काढण्यात आली. अन्यथा यात पुन्हा वाढ झाली असती.घरातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर संकट कोसळते. अशा स्थितीत त्यांना मदत करण्यासाठी म्हणून ही योजना सुरू करण्यात आली. मात्र शासन यासाठी वेळेत निधी उपलब्ध करुन देत नसल्याने या योजनेच्या लाभार्थ्यांची परवड होत आहे. शासनातर्फे विविध नवीन योजना सुरू करुन त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. मात्र जुन्याच योजनांची अंमलबजावणी योग्य तऱ्हेने करीत नसल्याचे चित्र आहे.अतिरिक्त निधीची तरतूद कराकुटूंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत योजनेच्या सुरूवातीला तहसील कार्यालयात अतिरीक्त निधी उपलब्ध करुन दिला जात होता. परिणामी प्रस्ताव तहसील कार्यालयात सादर होताच आठ दिवसात लाभार्थ्याना अर्थसहाय्य दिले जात होते. मात्र गेल्या ३ ते ४ वर्षापासून या योजनेच्या निधीत कपात करण्यात आली. तसेच अतिरिक्त निधी सुध्दा उपलब्ध करुन दिला जात नाही. त्यामुळे प्रलंबित अर्जाच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे पूर्वीसारखाच अतिरिक्त निधीची तरतूद करण्याची मागणी केली जात आहे.निराधार मानधनापासून वंचिततिरोडा तालुक्यात इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजनेचे ३१०७, विधवा २९५ आणि २५ दिव्यांग लाभार्थी आहेत. संजय गांधी योजनेचे २७५७ लाभार्थी आहे.या लाभार्थ्यांना मागील तीन महिन्यापासून मानधन देण्यात आले नाही. त्यामुळे योजनेच्या लाभार्थ्यांची तहसील कार्यालयात पायपीट सुरू आहे. पण अद्यापही जिल्हा प्रशासनाने याची दखल घेतली नाही.या सर्व योजनेच्या लाभार्थ्यांच्या मानधनाची यादी दर महिन्याला जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविले जाते. त्यानंतर निधी उपलब्ध होताच त्याचे लाभार्थ्यांना वाटप केले जाते.- संजय रामटेके, तहसीलदार, तिरोडा.