शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

कुटूंब अर्थसहाय्य योजनेचा निधी त्वरित उपलब्ध करून द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 22:28 IST

कुटूंबातील कर्त्या पुरुषाच्या मृत्यू झाल्यास मृतकाच्या कुटूंबीयांना आर्थिक मदत देण्यासाठी शासनातर्फे कुटूंब अर्थसहाय्य योजना राबविली जात आहे. यातंर्गत जवळपास दीडशेच्यावर प्रस्ताव मागील सहा महिन्यांपासून तिरोडा तहसील कार्यालयात प्रलंबित आहेत. या योजनेसाठी शासनाकडून ३० लाख रुपयांचा निधी न मिळाले या योजनेचे प्रस्ताव प्रलंबित असल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देदीडशे प्रस्ताव प्रलंबित : ३० लाखांच्या निधीची गरज

लोकमत न्यूज नेटवर्ककाचेवानी : कुटूंबातील कर्त्या पुरुषाच्या मृत्यू झाल्यास मृतकाच्या कुटूंबीयांना आर्थिक मदत देण्यासाठी शासनातर्फे कुटूंब अर्थसहाय्य योजना राबविली जात आहे. यातंर्गत जवळपास दीडशेच्यावर प्रस्ताव मागील सहा महिन्यांपासून तिरोडा तहसील कार्यालयात प्रलंबित आहेत. या योजनेसाठी शासनाकडून ३० लाख रुपयांचा निधी न मिळाले या योजनेचे प्रस्ताव प्रलंबित असल्याची माहिती आहे.तर इंदिरा गांधी, संजय गांधी आणि श्रावण बाळ योजनेचे अर्थसहाय्य तालुक्यातील लाभार्थ्यांना देण्यात आले नाही. त्यामुळे लाभार्थ्यांची परवड होत आहे. कुटूंबातील कुटूंब प्रमुख व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कुटुंब अर्थसहाय योजनेतंर्गत पत्नी व अथवा कुटुंबीयांना २० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य केले जाते. यातंर्गत तालुक्यातील दीडशे लाभार्थ्याचे प्रस्ताव मागील सहा महिन्यांपासून तहसील कार्यालयात प्रलंबित आहे. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी ८ लाख २० हजार रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिल्याने ४१ प्रकरणे निकाली काढण्यात आली. अन्यथा यात पुन्हा वाढ झाली असती.घरातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर संकट कोसळते. अशा स्थितीत त्यांना मदत करण्यासाठी म्हणून ही योजना सुरू करण्यात आली. मात्र शासन यासाठी वेळेत निधी उपलब्ध करुन देत नसल्याने या योजनेच्या लाभार्थ्यांची परवड होत आहे. शासनातर्फे विविध नवीन योजना सुरू करुन त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. मात्र जुन्याच योजनांची अंमलबजावणी योग्य तऱ्हेने करीत नसल्याचे चित्र आहे.अतिरिक्त निधीची तरतूद कराकुटूंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत योजनेच्या सुरूवातीला तहसील कार्यालयात अतिरीक्त निधी उपलब्ध करुन दिला जात होता. परिणामी प्रस्ताव तहसील कार्यालयात सादर होताच आठ दिवसात लाभार्थ्याना अर्थसहाय्य दिले जात होते. मात्र गेल्या ३ ते ४ वर्षापासून या योजनेच्या निधीत कपात करण्यात आली. तसेच अतिरिक्त निधी सुध्दा उपलब्ध करुन दिला जात नाही. त्यामुळे प्रलंबित अर्जाच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे पूर्वीसारखाच अतिरिक्त निधीची तरतूद करण्याची मागणी केली जात आहे.निराधार मानधनापासून वंचिततिरोडा तालुक्यात इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजनेचे ३१०७, विधवा २९५ आणि २५ दिव्यांग लाभार्थी आहेत. संजय गांधी योजनेचे २७५७ लाभार्थी आहे.या लाभार्थ्यांना मागील तीन महिन्यापासून मानधन देण्यात आले नाही. त्यामुळे योजनेच्या लाभार्थ्यांची तहसील कार्यालयात पायपीट सुरू आहे. पण अद्यापही जिल्हा प्रशासनाने याची दखल घेतली नाही.या सर्व योजनेच्या लाभार्थ्यांच्या मानधनाची यादी दर महिन्याला जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविले जाते. त्यानंतर निधी उपलब्ध होताच त्याचे लाभार्थ्यांना वाटप केले जाते.- संजय रामटेके, तहसीलदार, तिरोडा.