शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
3
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
4
SBI केवळ या नंबर्सवरुन करतं ग्राहकांना फोन; अन्य कोणत्याही क्रमांवरुन कॉल आल्यास व्हा सावध, काय आहे प्रकरण?
5
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
6
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
7
'किंग कोहली' परत येतोय... ऑस्ट्रेलियाची धुलाई करण्यासाठी विराटची 'लॉर्ड्स'वर नेट प्रॅक्टिस
8
२ शेअर्सवर मिळणार २५ मोफत! 'या' ८ कंपन्या देणार बोनस शेअर्स, वाचा रेकॉर्ड डेटची माहिती
9
Share Market Opening 25 August, 2025: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
10
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
11
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
12
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
13
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
15
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
16
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
17
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
18
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
19
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
20
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?

कुटूंब अर्थसहाय्य योजनेचा निधी त्वरित उपलब्ध करून द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 22:28 IST

कुटूंबातील कर्त्या पुरुषाच्या मृत्यू झाल्यास मृतकाच्या कुटूंबीयांना आर्थिक मदत देण्यासाठी शासनातर्फे कुटूंब अर्थसहाय्य योजना राबविली जात आहे. यातंर्गत जवळपास दीडशेच्यावर प्रस्ताव मागील सहा महिन्यांपासून तिरोडा तहसील कार्यालयात प्रलंबित आहेत. या योजनेसाठी शासनाकडून ३० लाख रुपयांचा निधी न मिळाले या योजनेचे प्रस्ताव प्रलंबित असल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देदीडशे प्रस्ताव प्रलंबित : ३० लाखांच्या निधीची गरज

लोकमत न्यूज नेटवर्ककाचेवानी : कुटूंबातील कर्त्या पुरुषाच्या मृत्यू झाल्यास मृतकाच्या कुटूंबीयांना आर्थिक मदत देण्यासाठी शासनातर्फे कुटूंब अर्थसहाय्य योजना राबविली जात आहे. यातंर्गत जवळपास दीडशेच्यावर प्रस्ताव मागील सहा महिन्यांपासून तिरोडा तहसील कार्यालयात प्रलंबित आहेत. या योजनेसाठी शासनाकडून ३० लाख रुपयांचा निधी न मिळाले या योजनेचे प्रस्ताव प्रलंबित असल्याची माहिती आहे.तर इंदिरा गांधी, संजय गांधी आणि श्रावण बाळ योजनेचे अर्थसहाय्य तालुक्यातील लाभार्थ्यांना देण्यात आले नाही. त्यामुळे लाभार्थ्यांची परवड होत आहे. कुटूंबातील कुटूंब प्रमुख व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कुटुंब अर्थसहाय योजनेतंर्गत पत्नी व अथवा कुटुंबीयांना २० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य केले जाते. यातंर्गत तालुक्यातील दीडशे लाभार्थ्याचे प्रस्ताव मागील सहा महिन्यांपासून तहसील कार्यालयात प्रलंबित आहे. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी ८ लाख २० हजार रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिल्याने ४१ प्रकरणे निकाली काढण्यात आली. अन्यथा यात पुन्हा वाढ झाली असती.घरातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर संकट कोसळते. अशा स्थितीत त्यांना मदत करण्यासाठी म्हणून ही योजना सुरू करण्यात आली. मात्र शासन यासाठी वेळेत निधी उपलब्ध करुन देत नसल्याने या योजनेच्या लाभार्थ्यांची परवड होत आहे. शासनातर्फे विविध नवीन योजना सुरू करुन त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. मात्र जुन्याच योजनांची अंमलबजावणी योग्य तऱ्हेने करीत नसल्याचे चित्र आहे.अतिरिक्त निधीची तरतूद कराकुटूंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत योजनेच्या सुरूवातीला तहसील कार्यालयात अतिरीक्त निधी उपलब्ध करुन दिला जात होता. परिणामी प्रस्ताव तहसील कार्यालयात सादर होताच आठ दिवसात लाभार्थ्याना अर्थसहाय्य दिले जात होते. मात्र गेल्या ३ ते ४ वर्षापासून या योजनेच्या निधीत कपात करण्यात आली. तसेच अतिरिक्त निधी सुध्दा उपलब्ध करुन दिला जात नाही. त्यामुळे प्रलंबित अर्जाच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे पूर्वीसारखाच अतिरिक्त निधीची तरतूद करण्याची मागणी केली जात आहे.निराधार मानधनापासून वंचिततिरोडा तालुक्यात इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजनेचे ३१०७, विधवा २९५ आणि २५ दिव्यांग लाभार्थी आहेत. संजय गांधी योजनेचे २७५७ लाभार्थी आहे.या लाभार्थ्यांना मागील तीन महिन्यापासून मानधन देण्यात आले नाही. त्यामुळे योजनेच्या लाभार्थ्यांची तहसील कार्यालयात पायपीट सुरू आहे. पण अद्यापही जिल्हा प्रशासनाने याची दखल घेतली नाही.या सर्व योजनेच्या लाभार्थ्यांच्या मानधनाची यादी दर महिन्याला जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविले जाते. त्यानंतर निधी उपलब्ध होताच त्याचे लाभार्थ्यांना वाटप केले जाते.- संजय रामटेके, तहसीलदार, तिरोडा.