शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
2
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
3
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
4
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
5
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
6
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
7
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
10
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
11
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
12
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
13
Astro Tips: कुंडलीत 'ही' ग्रहस्थिती दर्शवते जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध; वाढतो जीवाला धोका!
14
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
15
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
16
‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं
17
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
18
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
19
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
20
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल

कुटूंब अर्थसहाय्य योजनेचा निधी त्वरित उपलब्ध करून द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 22:28 IST

कुटूंबातील कर्त्या पुरुषाच्या मृत्यू झाल्यास मृतकाच्या कुटूंबीयांना आर्थिक मदत देण्यासाठी शासनातर्फे कुटूंब अर्थसहाय्य योजना राबविली जात आहे. यातंर्गत जवळपास दीडशेच्यावर प्रस्ताव मागील सहा महिन्यांपासून तिरोडा तहसील कार्यालयात प्रलंबित आहेत. या योजनेसाठी शासनाकडून ३० लाख रुपयांचा निधी न मिळाले या योजनेचे प्रस्ताव प्रलंबित असल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देदीडशे प्रस्ताव प्रलंबित : ३० लाखांच्या निधीची गरज

लोकमत न्यूज नेटवर्ककाचेवानी : कुटूंबातील कर्त्या पुरुषाच्या मृत्यू झाल्यास मृतकाच्या कुटूंबीयांना आर्थिक मदत देण्यासाठी शासनातर्फे कुटूंब अर्थसहाय्य योजना राबविली जात आहे. यातंर्गत जवळपास दीडशेच्यावर प्रस्ताव मागील सहा महिन्यांपासून तिरोडा तहसील कार्यालयात प्रलंबित आहेत. या योजनेसाठी शासनाकडून ३० लाख रुपयांचा निधी न मिळाले या योजनेचे प्रस्ताव प्रलंबित असल्याची माहिती आहे.तर इंदिरा गांधी, संजय गांधी आणि श्रावण बाळ योजनेचे अर्थसहाय्य तालुक्यातील लाभार्थ्यांना देण्यात आले नाही. त्यामुळे लाभार्थ्यांची परवड होत आहे. कुटूंबातील कुटूंब प्रमुख व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कुटुंब अर्थसहाय योजनेतंर्गत पत्नी व अथवा कुटुंबीयांना २० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य केले जाते. यातंर्गत तालुक्यातील दीडशे लाभार्थ्याचे प्रस्ताव मागील सहा महिन्यांपासून तहसील कार्यालयात प्रलंबित आहे. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी ८ लाख २० हजार रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिल्याने ४१ प्रकरणे निकाली काढण्यात आली. अन्यथा यात पुन्हा वाढ झाली असती.घरातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर संकट कोसळते. अशा स्थितीत त्यांना मदत करण्यासाठी म्हणून ही योजना सुरू करण्यात आली. मात्र शासन यासाठी वेळेत निधी उपलब्ध करुन देत नसल्याने या योजनेच्या लाभार्थ्यांची परवड होत आहे. शासनातर्फे विविध नवीन योजना सुरू करुन त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. मात्र जुन्याच योजनांची अंमलबजावणी योग्य तऱ्हेने करीत नसल्याचे चित्र आहे.अतिरिक्त निधीची तरतूद कराकुटूंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत योजनेच्या सुरूवातीला तहसील कार्यालयात अतिरीक्त निधी उपलब्ध करुन दिला जात होता. परिणामी प्रस्ताव तहसील कार्यालयात सादर होताच आठ दिवसात लाभार्थ्याना अर्थसहाय्य दिले जात होते. मात्र गेल्या ३ ते ४ वर्षापासून या योजनेच्या निधीत कपात करण्यात आली. तसेच अतिरिक्त निधी सुध्दा उपलब्ध करुन दिला जात नाही. त्यामुळे प्रलंबित अर्जाच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे पूर्वीसारखाच अतिरिक्त निधीची तरतूद करण्याची मागणी केली जात आहे.निराधार मानधनापासून वंचिततिरोडा तालुक्यात इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजनेचे ३१०७, विधवा २९५ आणि २५ दिव्यांग लाभार्थी आहेत. संजय गांधी योजनेचे २७५७ लाभार्थी आहे.या लाभार्थ्यांना मागील तीन महिन्यापासून मानधन देण्यात आले नाही. त्यामुळे योजनेच्या लाभार्थ्यांची तहसील कार्यालयात पायपीट सुरू आहे. पण अद्यापही जिल्हा प्रशासनाने याची दखल घेतली नाही.या सर्व योजनेच्या लाभार्थ्यांच्या मानधनाची यादी दर महिन्याला जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविले जाते. त्यानंतर निधी उपलब्ध होताच त्याचे लाभार्थ्यांना वाटप केले जाते.- संजय रामटेके, तहसीलदार, तिरोडा.