शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा मार्गांना राज्यमार्ग बनवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 00:31 IST

मुंडीपार ते गोंडमोहाळी व गंगाझरी ते धापेवाडा हे सध्या इतर जिल्हा मार्ग आहेत. या मार्गांवर घनदाट लोकवस्तीची गावे असून रहदारी जास्त आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसफेऱ्या दिवसभर चालतात.

ठळक मुद्देनागरिकांची मागणी : गैरसोयींमुळे दळणवळण करण्यास अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मुंडीपार ते गोंडमोहाळी व गंगाझरी ते धापेवाडा हे सध्या इतर जिल्हा मार्ग आहेत. या मार्गांवर घनदाट लोकवस्तीची गावे असून रहदारी जास्त आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसफेऱ्या दिवसभर चालतात. या मार्गावरील गावांना मुख्य शहरांसह जोडण्यासाठी हेच एकमेव मार्ग असल्यामुळे सदर मार्गांना राज्यमार्गांमध्ये परिवर्तीत करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.प्राप्त माहितीनुसार, मुंडीपार राज्यमार्ग-२४९ पासून भानपूर, खातीटोला, वळद, दवनीवाडा, बोदा, गोंडमोहाळी राज्य मार्गापर्यंत व गंगाझरी राज्य मार्गापासून खळबंदा, खातीटोला, वळद, दवनीवाडा, धापेवाडा राज्य मार्गापर्यंत सदर इतर जिल्हा मार्गांना परिवर्तीत करण्याबाबत लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात आले होते. लोकहितासाठी पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या सभेत सदर विषय मांडून ठराव पारित करून क्षेत्राच्या विकासासाठी शासनाला पाठविण्याची विनंती करण्यात आली आहे.सदर दोन्ही मार्गांवरून ४० वर्षांपासून एसटीच्या बसेस धावतात. तसेच दोन्ही मार्गांचीलांबी २० किमी व १५ किमी एवढी आहे. पहिला रस्ता दवनीवाडा-तिरोडा असा असून गोंदिया-गंगाझरी-तिरोडा या मार्गावर लोहमार्ग आडवा येतो.सदर मार्ग अनेकदा ब्लॉक होतो. त्यामुळे गोंदिया-मुंडीपार-दवनीवाडा-तिरोडा या मार्गाने दळणवळण केली जाते. दुसरा रस्ता गंगाझरी-दवनीवाडा-धापेवाडा असा आहे. धापेवाडा व इतर गावात वैनगंगा नदीचा पूर शिरतो. त्यामुळे नवेगाव, धापेवाडा, महालगाव, मुरदाडा, गोंडमोहाळी अंतर्गत असलेला मार्ग पुरात बुडून जातो. कधीकधी आठ-आठ दिवस पूर आपले रौद्र रूप धारण करतो. अशावेळी तिरोडा-गोंडमोहाळी-दवनीवाडा-मुंडीपार गोंदिया या मार्गाने दळणवळण सुरू असल्याने त्या काळात अनेक दुर्घटना होऊन अनेकांचे प्राण गेले आहेत. ही दरवर्षीची समस्या आहे. या प्रकारामुळे सदर दोन्ही मार्गांना राज्य मार्गामध्ये परिवर्तीत करून नागरिकांना सुविधा पुरविणे गरजेचे आहे.इतर क्षेत्रात वळविला जातो निधीदवनीवाडा अंतर्गत ६३ गावे मिळून दवनीवाडा तालुका व पंचायत समिती निर्माण करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधिन आहे. पं.स. गोंदिया येथे २८ सदस्य व पं.स. तिरोडा येथे १४ सदस्य आहेत. दोन्ही पंचायत समित्यांमध्ये दवनीवाडा क्षेत्रातून व लगतच्या क्षेत्रातून अर्ध्याधिक पं.स. सदस्य लोकसंख्येच्या प्रमाणात निवडून जातात. मात्र अशा प्रदेशातून जाणारे मार्ग शासनाने अति कनिष्ठ विभागात घातलेले आहेत. या क्षेत्राच्या विकासासाठी ज्या प्रमाणात निधी खर्च होणे अपेक्षित आहे, त्या प्रमाणात होत नाही. अधिकार व दबाव तंत्राचा वापर करून निधी इतर क्षेत्रात वळता केला जातो, असा आरोप आहे. या क्षेत्रातील जनता अन्न व दुष्काळामुळे त्रस्त नसून रस्त्यांच्या दयनिय अवस्थांमुळे त्रस्त आहेत. त्यामुळे या मार्गांना राज्यमार्ग बनविण्याची मागणी जोर धरत आहे.

टॅग्स :Travelप्रवास