शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

जिल्हा मार्गांना राज्यमार्ग बनवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 00:31 IST

मुंडीपार ते गोंडमोहाळी व गंगाझरी ते धापेवाडा हे सध्या इतर जिल्हा मार्ग आहेत. या मार्गांवर घनदाट लोकवस्तीची गावे असून रहदारी जास्त आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसफेऱ्या दिवसभर चालतात.

ठळक मुद्देनागरिकांची मागणी : गैरसोयींमुळे दळणवळण करण्यास अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मुंडीपार ते गोंडमोहाळी व गंगाझरी ते धापेवाडा हे सध्या इतर जिल्हा मार्ग आहेत. या मार्गांवर घनदाट लोकवस्तीची गावे असून रहदारी जास्त आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसफेऱ्या दिवसभर चालतात. या मार्गावरील गावांना मुख्य शहरांसह जोडण्यासाठी हेच एकमेव मार्ग असल्यामुळे सदर मार्गांना राज्यमार्गांमध्ये परिवर्तीत करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.प्राप्त माहितीनुसार, मुंडीपार राज्यमार्ग-२४९ पासून भानपूर, खातीटोला, वळद, दवनीवाडा, बोदा, गोंडमोहाळी राज्य मार्गापर्यंत व गंगाझरी राज्य मार्गापासून खळबंदा, खातीटोला, वळद, दवनीवाडा, धापेवाडा राज्य मार्गापर्यंत सदर इतर जिल्हा मार्गांना परिवर्तीत करण्याबाबत लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात आले होते. लोकहितासाठी पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या सभेत सदर विषय मांडून ठराव पारित करून क्षेत्राच्या विकासासाठी शासनाला पाठविण्याची विनंती करण्यात आली आहे.सदर दोन्ही मार्गांवरून ४० वर्षांपासून एसटीच्या बसेस धावतात. तसेच दोन्ही मार्गांचीलांबी २० किमी व १५ किमी एवढी आहे. पहिला रस्ता दवनीवाडा-तिरोडा असा असून गोंदिया-गंगाझरी-तिरोडा या मार्गावर लोहमार्ग आडवा येतो.सदर मार्ग अनेकदा ब्लॉक होतो. त्यामुळे गोंदिया-मुंडीपार-दवनीवाडा-तिरोडा या मार्गाने दळणवळण केली जाते. दुसरा रस्ता गंगाझरी-दवनीवाडा-धापेवाडा असा आहे. धापेवाडा व इतर गावात वैनगंगा नदीचा पूर शिरतो. त्यामुळे नवेगाव, धापेवाडा, महालगाव, मुरदाडा, गोंडमोहाळी अंतर्गत असलेला मार्ग पुरात बुडून जातो. कधीकधी आठ-आठ दिवस पूर आपले रौद्र रूप धारण करतो. अशावेळी तिरोडा-गोंडमोहाळी-दवनीवाडा-मुंडीपार गोंदिया या मार्गाने दळणवळण सुरू असल्याने त्या काळात अनेक दुर्घटना होऊन अनेकांचे प्राण गेले आहेत. ही दरवर्षीची समस्या आहे. या प्रकारामुळे सदर दोन्ही मार्गांना राज्य मार्गामध्ये परिवर्तीत करून नागरिकांना सुविधा पुरविणे गरजेचे आहे.इतर क्षेत्रात वळविला जातो निधीदवनीवाडा अंतर्गत ६३ गावे मिळून दवनीवाडा तालुका व पंचायत समिती निर्माण करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधिन आहे. पं.स. गोंदिया येथे २८ सदस्य व पं.स. तिरोडा येथे १४ सदस्य आहेत. दोन्ही पंचायत समित्यांमध्ये दवनीवाडा क्षेत्रातून व लगतच्या क्षेत्रातून अर्ध्याधिक पं.स. सदस्य लोकसंख्येच्या प्रमाणात निवडून जातात. मात्र अशा प्रदेशातून जाणारे मार्ग शासनाने अति कनिष्ठ विभागात घातलेले आहेत. या क्षेत्राच्या विकासासाठी ज्या प्रमाणात निधी खर्च होणे अपेक्षित आहे, त्या प्रमाणात होत नाही. अधिकार व दबाव तंत्राचा वापर करून निधी इतर क्षेत्रात वळता केला जातो, असा आरोप आहे. या क्षेत्रातील जनता अन्न व दुष्काळामुळे त्रस्त नसून रस्त्यांच्या दयनिय अवस्थांमुळे त्रस्त आहेत. त्यामुळे या मार्गांना राज्यमार्ग बनविण्याची मागणी जोर धरत आहे.

टॅग्स :Travelप्रवास