शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
"ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

जिल्हा मार्गांना राज्यमार्ग बनवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 00:31 IST

मुंडीपार ते गोंडमोहाळी व गंगाझरी ते धापेवाडा हे सध्या इतर जिल्हा मार्ग आहेत. या मार्गांवर घनदाट लोकवस्तीची गावे असून रहदारी जास्त आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसफेऱ्या दिवसभर चालतात.

ठळक मुद्देनागरिकांची मागणी : गैरसोयींमुळे दळणवळण करण्यास अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मुंडीपार ते गोंडमोहाळी व गंगाझरी ते धापेवाडा हे सध्या इतर जिल्हा मार्ग आहेत. या मार्गांवर घनदाट लोकवस्तीची गावे असून रहदारी जास्त आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसफेऱ्या दिवसभर चालतात. या मार्गावरील गावांना मुख्य शहरांसह जोडण्यासाठी हेच एकमेव मार्ग असल्यामुळे सदर मार्गांना राज्यमार्गांमध्ये परिवर्तीत करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.प्राप्त माहितीनुसार, मुंडीपार राज्यमार्ग-२४९ पासून भानपूर, खातीटोला, वळद, दवनीवाडा, बोदा, गोंडमोहाळी राज्य मार्गापर्यंत व गंगाझरी राज्य मार्गापासून खळबंदा, खातीटोला, वळद, दवनीवाडा, धापेवाडा राज्य मार्गापर्यंत सदर इतर जिल्हा मार्गांना परिवर्तीत करण्याबाबत लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात आले होते. लोकहितासाठी पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या सभेत सदर विषय मांडून ठराव पारित करून क्षेत्राच्या विकासासाठी शासनाला पाठविण्याची विनंती करण्यात आली आहे.सदर दोन्ही मार्गांवरून ४० वर्षांपासून एसटीच्या बसेस धावतात. तसेच दोन्ही मार्गांचीलांबी २० किमी व १५ किमी एवढी आहे. पहिला रस्ता दवनीवाडा-तिरोडा असा असून गोंदिया-गंगाझरी-तिरोडा या मार्गावर लोहमार्ग आडवा येतो.सदर मार्ग अनेकदा ब्लॉक होतो. त्यामुळे गोंदिया-मुंडीपार-दवनीवाडा-तिरोडा या मार्गाने दळणवळण केली जाते. दुसरा रस्ता गंगाझरी-दवनीवाडा-धापेवाडा असा आहे. धापेवाडा व इतर गावात वैनगंगा नदीचा पूर शिरतो. त्यामुळे नवेगाव, धापेवाडा, महालगाव, मुरदाडा, गोंडमोहाळी अंतर्गत असलेला मार्ग पुरात बुडून जातो. कधीकधी आठ-आठ दिवस पूर आपले रौद्र रूप धारण करतो. अशावेळी तिरोडा-गोंडमोहाळी-दवनीवाडा-मुंडीपार गोंदिया या मार्गाने दळणवळण सुरू असल्याने त्या काळात अनेक दुर्घटना होऊन अनेकांचे प्राण गेले आहेत. ही दरवर्षीची समस्या आहे. या प्रकारामुळे सदर दोन्ही मार्गांना राज्य मार्गामध्ये परिवर्तीत करून नागरिकांना सुविधा पुरविणे गरजेचे आहे.इतर क्षेत्रात वळविला जातो निधीदवनीवाडा अंतर्गत ६३ गावे मिळून दवनीवाडा तालुका व पंचायत समिती निर्माण करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधिन आहे. पं.स. गोंदिया येथे २८ सदस्य व पं.स. तिरोडा येथे १४ सदस्य आहेत. दोन्ही पंचायत समित्यांमध्ये दवनीवाडा क्षेत्रातून व लगतच्या क्षेत्रातून अर्ध्याधिक पं.स. सदस्य लोकसंख्येच्या प्रमाणात निवडून जातात. मात्र अशा प्रदेशातून जाणारे मार्ग शासनाने अति कनिष्ठ विभागात घातलेले आहेत. या क्षेत्राच्या विकासासाठी ज्या प्रमाणात निधी खर्च होणे अपेक्षित आहे, त्या प्रमाणात होत नाही. अधिकार व दबाव तंत्राचा वापर करून निधी इतर क्षेत्रात वळता केला जातो, असा आरोप आहे. या क्षेत्रातील जनता अन्न व दुष्काळामुळे त्रस्त नसून रस्त्यांच्या दयनिय अवस्थांमुळे त्रस्त आहेत. त्यामुळे या मार्गांना राज्यमार्ग बनविण्याची मागणी जोर धरत आहे.

टॅग्स :Travelप्रवास