शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नियोजन करा, अपघात टाळा

By admin | Updated: January 13, 2017 01:04 IST

जिल्ह्यात मागील वर्षी रस्ता अपघातात जेवढे मृत्यू झाले ते प्रमाण ७५ टक्क्यांपेक्षा कमी करावयाचे आहे.

अभिमन्यू काळे : २८ वा रस्ता सुरक्षा अभियानाचे थाटात उद्घाटन गोंदिया : जिल्ह्यात मागील वर्षी रस्ता अपघातात जेवढे मृत्यू झाले ते प्रमाण ७५ टक्क्यांपेक्षा कमी करावयाचे आहे. रस्ता अपघातास कारणीभुत घटकांचा शोध घ्यावा लागणार आहे. अपघात टाळण्यासाठी ज्या सूचना देण्यात आल्या आहेत, त्यांचे पालन होणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी आतापासूनच योग्य नियोजन करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले.उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या २८ व्या रस्ता सुरक्षा अभियानाचे उदघाटक म्हणून काळे बोलत होते.याप्रसंगी प्रामुख्याने जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, सहायक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संगीता भिसे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी चव्हाण उपस्थित होते. हे अभियान दरवर्षी राबविण्यात येत असल्याचे सांगून जिल्हाधिकारी काळे पुढे म्हणाले, यावर्षी अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी काही उपक्रम हाती घेतले आहेत. या उपक्र मात पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, तसेच इतर यंत्रणासह विद्यार्थ्यांचा सहभाग महत्वाचा राहणार आहे. यावर्षी जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय बांधून जिल्हा हागणदारीमुक्त करावयाचा आहे. जिल्ह्यातील माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी देखील उपक्र म राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.डॉ. पुलकुंडवार म्हणाले, केवळ अभियानाचे आयोजन करून सुरक्षीतता मिळणार नाही. रस्त्यावर प्रत्येक जण सुरक्षीत कसा राहील, हे महत्वाचे आहे. अपघात होण्याचे कारण शोधून ते टाळण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. चालक हा चांगला प्रशिक्षित असला पाहिजे. चालकाची मानिसकता तपासणे देखील महत्वाचे आहे. वाहतूक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केली पाहिजे. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी तातडीने धावून गेले पाहिजे. १०८ क्र मांकाच्या रु ग्णवाहिका सेवेची माहिती प्रत्येकाला झाली तर अशाप्रसंगी अपघातग्रस्तांना वेळीच वैद्यकीय सुविधा पुरविता येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी सोनाली चव्हाण व डॉ.संगीता भिसे यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविकातून उप प्रादेशिक परिवहन अधिकारी चव्हाण यांनी राज्यातील अपघाताची स्थिती व रस्ता सुरक्षा अभियानाबाबत माहिती दिली. कार्यक्रमाला शहरातील अनेक शाळांतील विद्यार्थी, ड्रायव्हींग स्कूलचे संचालक, तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी सहायक मोटर वाहन निरीक्षक संदीप पवार, प्रभाकर पेन्सीलवार, अनिरूध्द देवधर, कर्मचारी प्रशांत मांडवेकर, राहुल कुरतोडवार, राठोड, गुल्हाणे, विग्रे, मोहोड, वानखेडे, करु णा बसवनाथे, सविता राजुरकर यांनी सहकार्य केले. संचालन सुजाता बहेकार यांनी केले. आभार संदीप पवार यांनी मानले. (प्रतिनिधी)