शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

मजीप्राने केले १० दलघमी पाण्याचे आरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:18 IST

कपिल केकत (लोकमत विशेष) गोंदिया : उन्हाळ्यात गोंदिया शहरातील पाणीटंचाई बघता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सन २०१७-१८ पासून पुजारीटोला प्रकल्पातून ...

कपिल केकत (लोकमत विशेष)

गोंदिया : उन्हाळ्यात गोंदिया शहरातील पाणीटंचाई बघता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सन २०१७-१८ पासून पुजारीटोला प्रकल्पातून आणी आणण्याचा प्रयोग करीत आहे. त्यानुसार, यंदाचा उन्हाळा लक्षात घेत महराष्ट्र जीवन प्राधिकरणने आतापासूनच पुजारीटोला प्रकल्पातील १० दलघमी पाण्याचे आरक्षण करून ठेवले आहे. उन्हाळ्यात गोंदिया शहराला पाणीटंचाई भासल्यास पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून हे आरक्षण करण्यात आले आहे.

मागील वर्षी पावसाने चांगलीच साथ दिल्याने स्थिती जास्त कठीण झाली नसून यंदा प्रकल्पात चांगला पाणीसाठा आहे. प्रकल्पात पुरेपूर पाणीसाठा असल्यामुळे यंदा रबीसाठी सिंचनाची सोयही पाटबंधारे विभागाकडून करण्यात आली आहे. मात्र, सन २०१७-१८ व २०१८-१९ मध्ये पाऊस कमी प्रमाणात पडल्यामुळे परिस्थिती कठीण झाली होती. या काळात जिल्ह्याला दुष्काळी परिस्थितीशी सामना करावा लागला होता. त्यातही कधी न घडलेली घटना याकाळात घडली होती व ती अशी की, गोंदिया शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी डांगोरली येथील वैनगंगा नदीत पाणी उरले नव्हते. यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून पुजारीटोला प्रकल्पातून डांगोरली येथील वैनगंगा नदीत पाणी सोडण्यात आले होते. हा प्रयोग सन २०१७-१८ व २०१८-१९ मध्ये करण्यात आला.

तेव्हापासून आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून दरवर्षी गोंदिया शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पुजारीटोला प्रकल्पातील पाण्याचे आरक्षण करून घेतले जाते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने २ वर्षे अशाप्रकारे पुजारीटोला प्रकल्पातील पाणी घेत गोंदिया शहरातील पाणीटंचाईवर मात केली होती. सन २०१९-२० मध्येही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने पाण्याचे आरक्षण करून ठेवले होते. मात्र, सुदैवाने मागील वर्षी पुजारीटोलाचे पाणी आणण्याची गरज भासली नाही. मात्र, हलगर्जीपणा नको म्हणून यंदाही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने आतापासूनच पुजारीटोला प्रकल्पात १० दलघमी पाण्याचे आरक्षण गोंदिया शहरासाठी करून घेतले आहे.

--------------------------

जिल्ह्यातील प्रकल्पांत पुरेपूर पाणीसाठा

मागील वर्षी जिल्ह्यात चांगलाच पाऊस बरसला. अतिपावसामुळे जिल्ह्याला पुराचाही सामना करावा लागला होता. यामुळे चांगलेच नुकसान झाले असतानाच प्रकल्पांत लबालब पाणी झाले होते व ते आता कामी येत आहे. यंदा प्रकल्पांत चांगले पाणी असल्यामुळे रबीसाठीही पाणी दिले जाणार आहे. सध्या जिल्ह्यातील प्रकल्पांत पुरेपूर पाणीसाठा असून रविवारची स्थिती पाहिल्यास इटियाडोह प्रकल्पात ६४.८२ टक्के, सिरपूर प्रकल्पात ७२.६७ टक्के, पुजारीटोला प्रकल्पात ५२.५९ टक्के तर कालीसरार प्रकल्पात २६.४० टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यात इटियाडोह व पुजारीटोला प्रकल्पातून पाणी दिले जाते.