शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

मजीप्राने केले १० दलघमी पाण्याचे आरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:18 IST

कपिल केकत (लोकमत विशेष) गोंदिया : उन्हाळ्यात गोंदिया शहरातील पाणीटंचाई बघता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सन २०१७-१८ पासून पुजारीटोला प्रकल्पातून ...

कपिल केकत (लोकमत विशेष)

गोंदिया : उन्हाळ्यात गोंदिया शहरातील पाणीटंचाई बघता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सन २०१७-१८ पासून पुजारीटोला प्रकल्पातून आणी आणण्याचा प्रयोग करीत आहे. त्यानुसार, यंदाचा उन्हाळा लक्षात घेत महराष्ट्र जीवन प्राधिकरणने आतापासूनच पुजारीटोला प्रकल्पातील १० दलघमी पाण्याचे आरक्षण करून ठेवले आहे. उन्हाळ्यात गोंदिया शहराला पाणीटंचाई भासल्यास पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून हे आरक्षण करण्यात आले आहे.

मागील वर्षी पावसाने चांगलीच साथ दिल्याने स्थिती जास्त कठीण झाली नसून यंदा प्रकल्पात चांगला पाणीसाठा आहे. प्रकल्पात पुरेपूर पाणीसाठा असल्यामुळे यंदा रबीसाठी सिंचनाची सोयही पाटबंधारे विभागाकडून करण्यात आली आहे. मात्र, सन २०१७-१८ व २०१८-१९ मध्ये पाऊस कमी प्रमाणात पडल्यामुळे परिस्थिती कठीण झाली होती. या काळात जिल्ह्याला दुष्काळी परिस्थितीशी सामना करावा लागला होता. त्यातही कधी न घडलेली घटना याकाळात घडली होती व ती अशी की, गोंदिया शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी डांगोरली येथील वैनगंगा नदीत पाणी उरले नव्हते. यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून पुजारीटोला प्रकल्पातून डांगोरली येथील वैनगंगा नदीत पाणी सोडण्यात आले होते. हा प्रयोग सन २०१७-१८ व २०१८-१९ मध्ये करण्यात आला.

तेव्हापासून आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून दरवर्षी गोंदिया शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पुजारीटोला प्रकल्पातील पाण्याचे आरक्षण करून घेतले जाते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने २ वर्षे अशाप्रकारे पुजारीटोला प्रकल्पातील पाणी घेत गोंदिया शहरातील पाणीटंचाईवर मात केली होती. सन २०१९-२० मध्येही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने पाण्याचे आरक्षण करून ठेवले होते. मात्र, सुदैवाने मागील वर्षी पुजारीटोलाचे पाणी आणण्याची गरज भासली नाही. मात्र, हलगर्जीपणा नको म्हणून यंदाही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने आतापासूनच पुजारीटोला प्रकल्पात १० दलघमी पाण्याचे आरक्षण गोंदिया शहरासाठी करून घेतले आहे.

--------------------------

जिल्ह्यातील प्रकल्पांत पुरेपूर पाणीसाठा

मागील वर्षी जिल्ह्यात चांगलाच पाऊस बरसला. अतिपावसामुळे जिल्ह्याला पुराचाही सामना करावा लागला होता. यामुळे चांगलेच नुकसान झाले असतानाच प्रकल्पांत लबालब पाणी झाले होते व ते आता कामी येत आहे. यंदा प्रकल्पांत चांगले पाणी असल्यामुळे रबीसाठीही पाणी दिले जाणार आहे. सध्या जिल्ह्यातील प्रकल्पांत पुरेपूर पाणीसाठा असून रविवारची स्थिती पाहिल्यास इटियाडोह प्रकल्पात ६४.८२ टक्के, सिरपूर प्रकल्पात ७२.६७ टक्के, पुजारीटोला प्रकल्पात ५२.५९ टक्के तर कालीसरार प्रकल्पात २६.४० टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यात इटियाडोह व पुजारीटोला प्रकल्पातून पाणी दिले जाते.