शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

महावितरणला २५ लाखांचा ‘शॉक’

By admin | Updated: May 7, 2016 01:51 IST

अवकाळी व वादळी वाऱ्याने जिल्ह्यात चांगलाच कहर केला असून जनजीवन विस्कळीत केले आहे. नुकसानीच्या या फटक्यातून वीज वितरण कंपनीही सुटली नाही.

वादळाने दिला झटका : खांब व वाहिन्या तुटल्या गोंदिया : अवकाळी व वादळी वाऱ्याने जिल्ह्यात चांगलाच कहर केला असून जनजीवन विस्कळीत केले आहे. नुकसानीच्या या फटक्यातून वीज वितरण कंपनीही सुटली नाही. महावितरणला सुमारे २५ लाखांचा ‘शॉक’ बसला आहे.मागील १५ दिवसांपासून अवकाळी व वादळीवाऱ्याने जिल्ह्यातील वातावरण बदलून टाकले आहे. या पाऊस व तुफानामुळे मे महिन्यातच पावसाळा सुरू झाल्यासारखे चित्र बघावयास मिळत आहे. हा अवकाळी पाऊस जेवढा नुकसानकारक ठरत आहे तेवढेच नुकसान वादळीवाऱ्याने केले आहे. कुठे झाडे पडत आहेत तर कुठे घरांची पडझड होत आहे. पावसाने पिकांची नासाडी होत असून शेतकरी हतबल झाला आहे.या सर्व प्रकारांमुळे वीज वितरण कंपनीलाही आपल्या पाशात घेतले आहे. या अवकाळी व वादळी वाऱ्यामुळे वीज कंपनीचे सुमारे २५ लाख रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. यात कुठे वीजेचे खांब पडले आहेत तर कुठे वाहिन्या तुटल्या आहेत. विद्युत रोहित्रांतही बिघाड आला असून अवघा जिल्हा अस्तव्यस्त झाला आहे. दुरूस्तीसाठी वीज कंपनीची कसरत सुरू आहे. अनेक भागात यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे.गेल्या १५ दिवसात अनेक वेळा वादळी वाऱ्याने नुकसान केले. परिणामी वीज पुरवठा खंडीत होत आहे. निसर्गाच्या या लहरीपणाचा फटका वीज कंपनीसह सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. (शहर प्रतिनिधी)