शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
4
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
5
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
6
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
7
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
8
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
9
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
10
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
11
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
12
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
13
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
14
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
15
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
16
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
17
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
18
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
19
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
20
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?

महात्मा गांधी रोजगार हमीच्या कामात घोळ

By admin | Updated: October 17, 2015 02:30 IST

जवरी येथील बहुचर्चित रोजगार सेवक अशोक सिताराम गायधने याने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या ...

जवरी येथील प्रकरण : होमगार्डच्या चौकशीची मागणीआमगाव : जवरी येथील बहुचर्चित रोजगार सेवक अशोक सिताराम गायधने याने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामात भ्रष्टाचार केल्याचा आरोप होत आहे. नाला सरळीकरण, मामा तलाव खोलीकरण, गेट चौकी तलाव या कामात मजुरांची बोगस नोंद, तसेच लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची लेखी तक्रार करून चौकशीची मागणी करण्यात आली आहे. जवरी येथील धनराज हरी हटवार हा आमगाव पोलीस ठाण्यात गृहरक्षक म्हणून त्या काळात काम करीत होता. सदर व्यक्ती हजेरी क्रमांक ३७०४ वर २७ ते ३० जून पर्यंत मजूर म्हणून त्यांची नोंद करण्यात आली. या धनराज हटवारला चारशे पन्नास रुपये रोजी दाखविण्यात आली. त्यांच्या सोबत असलेल्या पंचेविस ते तिस लोकांना १३५ रुपये मजूरी मिळाली. काम एक मग सर्व मजुरांना सारखी मजूरी मिळने आवश्यक होते. मात्र ते या ठिकाणी झाले नाही. धनराज हरी हटवार होमगार्ड आहे. तो २७ ते ३० जून या कालखंडात करंजी येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या बंदोबस्ताकरिता कार्यरत होता. मात्र त्याच कालखंडातील त्याची हजेरीवर उपस्थिती दाखविण्यात आली. विशेष म्हणजे ३० जून रोजी सर्व मजुरांचे वेतन झाल्याचे दाखविण्यात आले. जवळपास २५० ते ३०० मजूर कामावर कार्यरत होते. त्या मजुरांकडून प्रत्येकी विस रुपये रोजगार सेवकांनी मजुरांकडून घेतले. शासनाकडून पैसे घेण्याचा कोणताच आदेश नसतानाही वसुली बेकायदेशिर असल्याचा आरोप जवरी ग्रामस्थांनी करुन चौकशीची मागणी केली आहे.हजेरी क्रमांक ३११५ च्या एम.बी. नंबर नाही. हजेरी पटावर विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, रोजगार सेवकाची याची स्वाक्षरी नाही. हजेरी पटावर दहा मजुरांचे खोटे नाव दाखविण्यात आले. गावकऱ्यांनी माहितीच्या अधिकारात जी माहिती मिळाली तेथे १० व्यक्तीचे नाव कमी करण्यात आले. त्या लोकांची १३५, १५५, १६५ या दराने रोजी काढण्यात आली. मात्र ते मजूर कामावर गेलेच नाहीत. यात मोहीनी अशोक गायधने, शकुंतला शामलाल मेंढे, वर्षा अशोक डोये (ही मुलगी शिक्षण घेत आहे), तसेच अमृत बकाराम गायधने, अमोल राधेशाम गायधने, राधेशाम बकाराम गायधने, आशा विजय दिवाडे, रंजना अजय दिवाडे एवढ्या मजुरांचे काम करण्यात आले. हे सत्य माहितीच्या अधिकारामार्फत समोर आले. मामा तलावावर मोहीनी अशोक गायधने, अमृत बकाराम गायधने, सरस्वता रमनलाल हत्तीमारे, आशा विजय दिवाळे, वर्षा अशोक डोये हे मजूर कधी गेले कधी गेले नाही. विशेष म्हणजे मामा तलाव कामावर वरील मजूर कार्यरत होते. चौकी तलावाच्या कामावर ईश्वरदास धानू गायधने, दुलीचंद नत्थू पाथोडे, अमोल राधेशाम गायधने, ज्योती प्रमोद तिरपुडे, मनिराम गणपत फुंडे हे मजूर कामावर गेले नाही. मात्र मजुरांची मजुरी उचलण्यात आली. या गावात सन २००८-०९ पासून मामातलाव खोलीकरण, नाला सरळीकरण, चौकीतलाव या कामावर जवळपास तिनशे मजूर कार्यरत होते. सदर तिन्ही कामे महात्मा गांधी रोजगार हमी योजना व जिल्हा परिषद गोंदियाअंतर्गत करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)