शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
2
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
3
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
4
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
5
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
6
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
7
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
8
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
9
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
10
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
11
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
12
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
13
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
14
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
15
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
16
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
17
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
18
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
19
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
20
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे आयोजित रक्तदान कार्यक्रमाने रचले २ विश्वविक्रम

Maharashtra Election 2019 ; घोषणाबाज सरकारला जनताच धडा शिकविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 06:00 IST

निवडणूक प्रचारार्थ अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महागाव, माहुरकुडा जि.प.क्षेत्रात बुधवारी आयोजित प्रचारसभेला संबोधित करताना ते बोलत होते. या वेळी प्रामुख्याने भागवत नाकाडे,आनंद जांभुळकर, गिरीश पालीवाल, यशवंत गणविर, आर.के.जांभुळकर, दीपक सोनवाने व काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

ठळक मुद्देमनोहर चंद्रिकापुरे : महागाव, माहुरकुडा जि.प.क्षेत्रात प्रचारसभा

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : खोटेही बोलायचे मात्र ते सुध्दा रेटून बोलायचे असेच धोरण भाजप सरकारचे आहे. पाच वर्षांपूर्वी सत्तेवर येण्यापूर्वी केंद्र आणि राज्य सरकारने आम्ही सत्तेवर आल्यास जनतेच्या मनातील भारत साकारु असे आश्वासन दिले होते. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करु, महागाई आटोक्यात आणू अशा मोठा मोठा घोषणा केल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात चित्र याविरुध्द चित्र आहे. मागील पाच वर्षांत केवळ घोषणांचाच पाऊस पडला बाकी काहीच झाले नाही. त्यामुळे घोषणाबाज सरकारला जनताच आता मतपेटीतून धडा शिकविणार असल्याचे प्रतिपादन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार मनोहर चंद्रिकापुरे यांनी केले.निवडणूक प्रचारार्थ अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महागाव, माहुरकुडा जि.प.क्षेत्रात बुधवारी आयोजित प्रचारसभेला संबोधित करताना ते बोलत होते. या वेळी प्रामुख्याने भागवत नाकाडे,आनंद जांभुळकर, गिरीश पालीवाल, यशवंत गणविर, आर.के.जांभुळकर, दीपक सोनवाने व काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. मनोहर चंद्रिकापुरे म्हणाले, विकासाच्या नावावर थापा मारणाऱ्या भाजप सरकारने मागील पाच वर्षांत अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात कोणती विकास कामे केली ते सांगावे.केवळ नाल्याबांधून विकास होत नाही. तीन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्जुनी येथे राईस पार्क स्थापन करण्याची घोषणा केली होती. मात्र ही घोषणा सुध्दा हवतेच विरली. सत्तेवर येण्यापूर्वी धानाला ३ हजार रुपये प्रती क्विंटल हमीभाव देऊ अशी घोषणा केली होती. मात्र सत्तेवर येताच या घोषणेचा सुध्दा भाजप सरकारला विसर पडला. तर लगतच्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस सरकार सत्तेवर येताच शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि धानाला प्रती क्विंटल २५०० रुपये हमीभाव दिला. यावरुन घोषणबाजी करणारे कोण आणि शेतकºयांचे हितेशी कोण हे जनतेने चांगले ओळखले आहे. तर कोट्यवधी रुपयांच्या महामार्ग तयार करण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.मात्र त्या कामांना सुध्दा अद्यापही सुरूवात झाली नाही.मागील दहा वर्षांत अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचा विकास पूर्णपणे खुंटला आहे.तर शेतकरी, शेतमजूर,कामगार आणि सर्वसामान्य नागरिक सुध्दा खूश नाही.या क्षेत्रात बेरोजगारांच्या हाताला काम मिळत नसल्याने त्यांना रोजगाराच्या शोधात भटकंती करावी लागत आहे.आरोग्य, शिक्षण या क्षेत्राची स्थिती सुध्दा जैसे थे आहे.भाजप लोकप्रतिनिधीच्या नेतृत्त्वात या विधानसभा क्षेत्रात एकही उल्लेखनिय काम झाले नसल्याचा आरोप चंद्रिकापूरे यांनी केला. या क्षेत्राचा कायापालट आणि विकास केवळ आघाडी सरकारच करु शकते असे सांगत यासाठी जनतेची साथ हवी असल्याचे सांगितले.