शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

महामंडळाची बियाणे १२ रूपयांनी महाग

By admin | Updated: June 4, 2017 00:52 IST

महामंडळाकडून महाबीजचे देण्यात येणारे १००१ या धानाचे वाण ३२ रूपये किलो दराने विक्री केले जात आहे.

खासगी कंपन्यांकडून २० रूपये किलो : महागड्या बियाण्यांनी शेतकऱ्यांची पंचाईत लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महामंडळाकडून महाबीजचे देण्यात येणारे १००१ या धानाचे वाण ३२ रूपये किलो दराने विक्री केले जात आहे. तर हेच धान खासगी कंपन्यांकडून २० रूपये किलो दराने विक्री केले जात आहे. शासनाचे महामंडळ शेतकऱ्यांच्या मदतीसाठी की लुबाडण्यासाठी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. एकच धान खासगी कंपन्याकडून १२ रूपये कमी किंमतीत मिळत असल्याने महाबीजचे महागडे बियाणे कोण घेणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.गोंदिया जिल्ह्यासाठी विविध जातीचे १३ हजार ७७८ क्विंटल धान विक्रीसाठी आल्याची माहिती कृषी विभागाने दिली. यात पीकेव्ही एचएमटीचे एक हजार ६३५ क्विंटल, स्वर्णा ७५० क्विंटल, पीकेव्ही किसान १५५ क्विंटल, आयआर-६४ चे ३४८ क्विंटल, एमटीयू १०१० चे आठ हजार ७७ क्विंटल, एमटीयू १००१ चे एक हजार १४ क्विंटल, जेजीएल-१७९८ चे ६०० क्विंटल, श्रीराम ८३५ क्विंटल, डिआरके-२ चे १८५, सह्यांद्री १५ क्विंटल, सह्यांद्री ३ चे १० क्विंटल, सह्यांद्री ४ चे ५ क्विंटल, कर्जत-३चे ९० क्विंटल, आरटीएन-५चे ५९ क्विंटल असे एकूण १३ हजार ७७८ क्विंटल बियाणांचा जिल्ह्याला पुरवठा करण्यात आला. या बियाण्यांमध्ये १००१ हे बियाणे ३२ रूपये किलो दराने महामंडळाकडून विक्री केले जात आहे. खासगी कंपन्यांकडून कमी दरात विक्री होणारे वाण असताना महामंडळाचे महागडे वाण कोण घेईल असे शेतकऱ्यांना वाटत आहे.५० टक्के अनुदानासाठी ७१४ क्विंटल बियाणेखरीप हंगामासाठी ५० टक्के अनुदानावर एमटीयू १०१० हे धानाचे वाण जिल्हा निधी योजनेतून शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. गोंदिया जिल्ह्यातील आठ तालुक्यातील शेतकऱ्यांना ७१४ क्विंटल धानाची बियाणे ५० टक्के अनुदानावर दिले जाणार आहेत. यात गोंदिया तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी १२० क्विंटल, आमगाव ८० क्विंटल, तिरोडा १०० क्विंटल, गोरेगाव ८४ क्विंटल, सडक-अर्जुनी ९० क्विंटल, अर्जुनी-मोरगाव ९० क्विंटल, सालेकसा व देवरी प्रत्येकी ७५ क्विंटल बियाणे अनुदानावर द्यायचे आहेत. २८०० रूपये किंमतीचे असलेले धान्य ५० टक्के अनुदानावर म्हणजे १४०० रूपयात देण्यात येत आहेत. एमटीयू १०१० या धानाचे बियाणे २५ किलो पंचायत समितीमधून ३५० रूपये किमतीला मिळत आहे. परंतु हेच धान कृषी केंद्रांमधून ७०० रूपये किंमतीला विक्री करण्यास भाग पडत असल्याने शेतकऱ्यांच्या या अनुदानामुळे कृषी केंद्र चालक संतापले आहेत. त्यामुळे ही बियाणे परत करण्याचा नाद कृषी केंद्र चालकांचा आहे. १९ लाख ९९ हजार २०० रूपयांची बियाणे अनुदानावर या जिल्ह्यात दिली जाणार आहेत.