शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

मग्रारोहयोची विहीर झाली गायब

By admin | Updated: October 14, 2016 02:11 IST

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अर्जुनी मोरगाव तालुक्यातील निमगाव येथे सरपंचपुत्राच्या शेतात बांधलेली सिंचन विहीर गायब झाली आहे.

सरपंचपुत्राचा प्रताप : आयुक्तांच्या आदेशानंतरही कारवाई थंडबस्त्यातगोंदिया : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अर्जुनी मोरगाव तालुक्यातील निमगाव येथे सरपंचपुत्राच्या शेतात बांधलेली सिंचन विहीर गायब झाली आहे. या विहिरीच्या बांधकामासाठी झालेला खर्च १ लाख २४ हजार ९५३ शासकीय यंत्रणेने अदाही केला. मात्र आता ज्या गटात ती विहीर खोदली होती तेथून ती विहीरच गायब झाल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकारामुळे जिल्हा परिषदेच्या रोजगार हमीच्या यंत्रणेचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. शासनाची दिशाभूल करून फसवणूक करण्याच्या या प्रकाराबद्दल संबंधित लाभार्थ्यासह सर्व यंत्रणेवर कारवाई करण्याची मागणी गावातील काही सूज्ञ लोकांनी केली आहे. मात्र अद्याप कोणावरही कोणतीही कारवाई झालेली नाही.प्राप्त माहितीनुसार, निमगाव येथील सरपंच देवाजी डोंगरे यांचे पूत्र राजेश यांनी म.ग्रा.रो.ह.यो.अंतर्गत आपल्या शेतात (गट क्रमांक १४२ मध्ये ) सिंचन विहिर बांधण्यासाठी अर्ज केला होता. त्यानुसार सरपंचपदाच्या प्रभावाने २१ एप्रिल २०११ च्या ग्रामसभेत त्यांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. सदर सिंचन विहीरीचे बांधकाम २०१४-१५ मध्ये पूर्ण झाल्याचे दाखवून पैशाचीही उचल करण्यात आली. दरम्यान गावातील काही जागरूक नागरिकांनी शंका आल्यानंतर पाहणी केली असता ज्या गट क्रमांकात विहिरी मंजुर होती तिथे विहिरीचे बांधकामच केले नसल्याचे दिसून आले. त्यामुळे देवाजी महारू कोल्हे यांनी गटविकास अधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (मनरेगा) यांच्या पत्रानुसार अर्जुनी मोरगावचे गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी (पंचायत) यांनी चौकशी केली असता ज्या गटात (क्रमांक १४२) डोंगरे यांनी विहीर बांधल्याचे दर्शविले होते त्या घटात विहिरच नसल्याचे दिसून आले. वास्तविक जी सिंचन विहीर बांधली ती राजेश डोंगरे यांच्या नावे असलेल्या शेतात नसून त्यांच्या आई मनोरमा यांच्या नावाने असलेल्या गटात असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)