सालेकसा : नवाटोला येथील शेतकरी गोविंदराव वरखडे यांची शेती कुआढास जांभळी नाल्याच्या किनाऱ्यावर आहे. अतिवृष्टीमुळे नाल्याला आलेल्या पुराचे पाणी धानपिकात गेल्याने सर्व धानपीक पुरात बुडाले व धानपीक खराब झाले. वरखडे यांनी तीन एकरपैकी एका एकरात हलक्या प्रजातीचे पाटरू धानपीक लावले होते. ते हलके धान लोंबा टाकत आहे. परंतु सर्व लोंबा पांढऱ्या रंगाचे तांदूळरहीत निघत आहे. त्यामुळे धान उत्पादकावर मोठा फटका बसत आहे. याचप्रकारे सालेकसा तालुक्यात वाघनदीच्या किनाऱ्यावरील तसेच कुआढास नाल्याचा किनाऱ्यालगत शेकडो हेक्टर शेतीला अतिवृष्टीचा आणि पुराचा फटका बसला आहे. परंतु शासनस्तरावर आतापर्यंत पिकांची पाहणी करुन नुकसानीचा आराखडा तयार करण्यात आला नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्गात असंतोषाचे वातावरण पसरले आहे. शासनस्तरावर धानपिकाची पाहणी करुन झालेल्या नुकसानीचा मोबदला देण्यात यावे, अशी मागणी शेतकरीवर्ग करीत आहेत. आधिच शेतकरी कर्ज बाजारी स्थितीत जगत आहेत. (तालुका प्रतिनिधी)
अतिवृष्टीमुळे धानपिकांचे नुकसान
By admin | Updated: September 26, 2016 01:56 IST