शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

जीवन प्राधीकरण तोट्यात

By admin | Updated: February 26, 2017 00:28 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या (मजीप्रा) सध्याच्या सहा हजार ३५१ कर्मचाऱ्यांपैकी एक हजार ५५ कर्मचारी

भरपाईची आवश्यकता : वेतन व भत्त्याची समस्या गोंदिया : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या (मजीप्रा) सध्याच्या सहा हजार ३५१ कर्मचाऱ्यांपैकी एक हजार ५५ कर्मचारी स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रतिनियुक्तीवर आहेत. कर्मचारी व प्रतिनियुक्त कर्मचारी यांच्या समायोजनानंतर कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ता व सेवानिवृत्तीवर राज्यात प्रतिमहिना २९.५४ कोटी रूपये खर्च केले जातात. अशा स्थितीत मजीप्रा दरमहिना २०.५४ कोटी रूपये व वार्षिक २४६.४८ कोटी रूपयांच्या तोट्यात चालत आहे. हा तोटा दूर करण्यासाठी मजीप्राच्या अधिकाऱ्यांनी शासनासमोर जवळपास पाच हजार कोटी रूपये प्रतिवर्ष पेयजल व जल नि:सारण कार्यक्रम घेण्याची मागणी केली आहे. परंतु अनेक वर्षांपासून शासनाची दिशा प्राधिकरण व ग्राहकांच्या हिताच्या विपरित दिसून येत आहे. २२ नोव्हेंबर २०१२ रोजी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाची समिक्षा बैठक घेतली होती. त्यात मुख्यमंत्र्यांनी कृष्णा खोरे, विदर्भ, तापी, कोकण व गोदावरी-मराठवाडा महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते यांची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दाखविली होती. मजीप्राच्या कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्त्याची जबाबदारी शासनाने सांभाळावी, अशी मंत्रिमंडळ टिप्पणी सादर करण्याचे निर्देश मजीप्राचे सदस्य सचिव यांना दिले. अनेकदा मंत्रिमंडळ टिप्पणी सादर करण्यात आली, परंतु प्रत्येकवेळी त्रुट्या काढून टिप्पणी परत पाठविण्यात आली. केंद्र व राज्य शासनाच्या पाणी पुरवठा कार्यक्रमांना गती देण्यासाठी मजीप्रा लागून आहे. राज्य शासनाने ३१ आॅक्टोबर १९८१ पर्यंत मजीप्राच्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वेतन देण्याची जबाबदारी सांभाळली. यानंतर ही जबाबदारी मजीप्राकडे हस्तांतरीत करण्यात आली. मजीप्राच्या नितीनुसार, विविध योजनांवर प्रत्यक्ष खर्चाच्या हिशेबाने आस्थापना, यंत्र साहित्य यावर १७.५ टक्के ईएंडपी शुल्क वसूल करणे अनिवार्य आहे. ते मजीप्राच्या उत्पन्नाशी निगडीत बाब आहे. या शुल्कामुळे मजीप्राच्या कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्त्याचा खर्च काढला जात आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्त्याच्या खर्चासाठी शासनाकडून कसलेही अनुदान मिळत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते व सेवानिवृत्तीचा खर्च काढणे कठिण जात आहे. (प्रतिनिधी) कर्मचाऱ्यांचे ५ पासून आंदोलन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात कार्यरत विविध कामगार संघटनांनी एकजुट होवून शासनाविरूद्ध तीव्र संघर्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात १ ते ५ मार्चपर्यंत मजीप्राचे अधिकारी-कर्मचारी काळीफीत लावून काम करतील. ५ मार्चपासून बेमुदत राज्यस्तरीय आंदोलन सुरू करण्यात येईल. दरम्यान राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे-आंदोलन करण्यात येणार आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे गोंदिया, कामठी व इतर अनेक ठिकाणी पाणी पुरवठा बाधित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कर्मचारी संघटनेचे महासचिव निशिकांत ठोंबरे, मजीप्रा गोंदियाचे उपविभागीय अभियंता राजेंद्र मडके, प्रदीप वानखेडे, विकास दिवाळे, राजू खैरे, बंडू खापेकर व इतर पदाधिकाऱ्यांनी आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.