शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
3
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
4
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
5
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
6
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
7
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
8
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
9
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
10
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
11
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
12
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
13
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
14
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
15
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
16
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
17
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
18
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
19
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
20
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार

टाळेबंदीच्या कालावधीत होणाऱ्या बालविवाहांवर नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:30 IST

गोंदिया : काही जिल्ह्यांत टाळेबंदीच्या काळात बालविवाहाचे प्रकार उघडकीस आले आहेत. बालविवाह करणे हा कायद्यानुसार गुन्हा असून, यावर कारवाई ...

गोंदिया : काही जिल्ह्यांत टाळेबंदीच्या काळात बालविवाहाचे प्रकार उघडकीस आले आहेत. बालविवाह करणे हा कायद्यानुसार गुन्हा असून, यावर कारवाई करण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलली आहेत. यासाठीच जिल्हास्तरावर विशेष पथक गठित करून नजर ठेवली जात आहे.

कोरोना महामारीच्या काळात समाजात अल्पवयीन बालकांच्या समस्या अधिक गुंतागुंतीच्या बनत आहेत. कोरोना कालावधीत इतर समस्यांसोबत भेडसावणारी महत्त्वपूर्ण समस्या बालविवाह. लॉकडाऊन, ऑनलाईन शाळा, बेरोजगारी यामुळे बालविवाहाचे प्रमाण वाढत आहे. एप्रिल २०२० ते एप्रिल २०२१ या संकटातील एक वर्षाच्या काळात राज्यातील वेगवेगळ्या भागांत एकूण ५६० बालविवाह रोखण्यात शासनास यश आलेले आहे. भारतीय संस्कृतीत विवाह ही समाजातील महत्त्वाची आणि सार्वत्रिक क्रिया आहे. साहजिकच शुभमुहूर्तावर विवाह विधी केले जातात. अक्षयतृतीया हा महत्त्वाचा मुहूर्त असल्यामुळे या शुभमुहूर्तावर सामुदायिक तसेच एकल विवाह समारंभ आयोजित केले जातात. यामध्ये बालविवाहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावर होणाऱ्या विवाहात गोंदिया जिल्ह्यात बालविवाह होण्याची शक्यता

नाकारता येत नाही. ३ जून २०१३ च्या अधिसूचनेनुसार तसेच बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ (२००७ चा ६) कलम १६ ची पोटकलमे (१) व (३) नुसार बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) आणि प्रकल्पांतर्गत नेमलेल्या अंगणवाडी पर्यवेक्षिका व ग्रामपंचायत स्तरावर संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे बालविवाह रोखणे आणि बाल हक्कांच्या संरक्षणासाठी अधिक सक्षमपणे प्रयत्न होणे आवश्यक आहे. बालविवाह आपल्या गावात होत असल्यास तसेच बालविवाहाबाबत माहिती प्राप्त होताच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाचे जिल्हा बालसंरक्षण अधिकारी गजानन गोबाडे तसेच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तुषार पौनीकर यांनी कळविले आहे.

........

ग्राम बालसंरक्षण समित्या स्थापन

गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येक गावात ग्राम बालसंरक्षण समित्या स्थापन करण्यात आलेल्या असून, संबंधित गावचे सरपंच हे समितीचे अध्यक्ष आहेत. तसेच पोलीस पाटील हे सदस्य आहेत, तर संबंधित अंगणवाडी केंद्राची अंगणवाडी सेविका या सदस्य सचिव आहेत. मार्च २०२१ मध्ये संबंधित सदस्यांचे प्रशिक्षणसुद्धा पूर्ण करण्यात आले आहेत.

........

१ लाख रुपयांच्या दंडाची तरतूद

टाळेबंदीच्या कालावधीत व अक्षयतृतीयाच्या शुभमुहूर्तावर किंवा इतर वेळेस होत असलेल्या विवाह समारंभात बालविवाह होणार नाहीत, याकरिता प्रत्येक सुजाण नागरिकांनी याची खबरदारी घेतली पाहिजे. १८ वर्षांच्या आत

मुलीचे लग्न व २१ वर्षांच्या आत मुलाचे लग्न लावणे कायद्याने गुन्हा आहे. बालविवाह करणे कायद्याने गुन्हा असून, बालकाशी विवाह करणाऱ्याला व करून देणाऱ्याला दोन वर्षांपर्यंत सक्तमजुरीची कैद व १ लाख रुपये दंड किंवा

दोन्ही होऊ शकते.

.......