शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

Lok Sabha Election 2019; शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या आश्वासनाचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 20:12 IST

जुमलेबाजीे करणाऱ्या मोदी सरकारने आधी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कधी करणार ते सांगा असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.

ठळक मुद्देगोरेगाव तालुक्यात ठिकठिकाणी प्रचारसभा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी देशातून भ्रष्टाचार दूर करु, विदेशातील काळा पैसा परत आणू, डिजीटल इंडियाचे स्वप्न साकारु आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र पाच वर्षांचा कालावधी लोटूनही मोदी सरकारने एकाही आश्वासनाची पुर्तता केली. जुमलेबाजीे करणाऱ्या मोदी सरकारने आधी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कधी करणार ते सांगा असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाआघाडीचे नाना पंचबुध्दे यांच्या निवडणूक प्रचारार्थ गोरेगाव येथे आयोजित प्रचार सभेला संबोधित करताना ते बोलत होते. जयंत पाटील म्हणाले, २०१४ च्या निवडणुकीत भाजप सरकारने विविध आश्वासने दिली होती. मात्र सत्तेवर येताच सरकारला या सर्व आश्वासनांचा विसर पडला आहे. सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखविणाऱ्या भाजप सरकारला आता अच्छे दिनचे काय झाले याचे असा सवाल जनतेनी करावा. केवळ निवडणुका आल्या की राम मंदिराचा मुद्दा पुढे करायचा आणि मतांचे राजकारण करायचे हेच काम मोदी सरकार करीत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे दूरच राहिले उलट जाहीर केलेल्या कर्जमाफीचा सुध्दा अद्यापही पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही. स्वत:ला देशाचा चौकीदार म्हणविणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर संविधानाच्या प्रतिकात्मक प्रती जाळण्यात आल्या तेव्हा देशाचा चौकीदार कुठे होता असा सवाल ही जयंत पाटील यांनी केला. त्यामुळे अशा विश्वासघाती आणि जुमलेबाज सरकारला धडा शिकविण्यासाठी नाना पंचबुध्दे यांचे हात बळकट करण्यास सांगितले. येत्या ११ एप्रिलला सजगपणे मतदान करण्याचे आवाहन केले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbhandara-gondiya-pcभंडारा-गोंदियाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019