शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये संशयित ४०० बँक खाती तपासली; जम्मू आणि काश्मीरमधील डॉक्टरांचे  लागेबांधे
2
गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पंकजा मुंडेचे PA अनंत गर्जे यांना अटक, आज कोर्टात हजर करणार !
3
Sangli Accident: नशेत राँग साईडने निघाला, ६ गाड्या उडवल्या, अनेक जखमी; संतप्त लोकांनी स्कोडा कार फोडली
4
"मुंबई महापालिकेची ही शेवटची निवडणूक असेल, त्यानंतर..."; राज ठाकरेंचा 'मराठी माणसा'ला सावध राहण्याचा इशारा
5
"उदयपूरमध्येच आमची लव्हस्टोरी...", रणवीर सिंहने दीपिकासोबतच्या आठवणींना दिला उजाळा
6
म्युच्युअल फंडावर टॅक्स कसा लागतो? इक्विटी आणि डेट फंडसाठीचे नियम काय, टॅक्स वाचवण्याचे मार्ग जाणून घ्या
7
कोण होणार नवीन पोलिस महासंचालक?; सदानंद दाते यांच्या नावाची चर्चा, केंद्राकडे नावे पाठवली
8
आजचे राशीभविष्य, २४ नोव्हेंबर २०२५: मन आनंदी राहील, आर्थिक लाभ होतील, नोकरीत लाभ होतील !
9
'बिग बॉस मराठी ६' लवकरच? कलर्स मराठीने शेअर केला 'धमाकेदार' प्रोमो, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
10
अनंतच्या अनैतिक संबंधाची खात्री झाल्याने ‘ती’  खचली; एकदा अचानक आई वडील घरी पोहचले, तेव्हा...
11
१५ दिवसांपूर्वी साखरपुडा झाला होता, २ डिसेंबरला लग्न पण त्याआधीच मयुरेशवर काळाने घाला घातला
12
वयाच्या ४१ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं लग्न, वृंदावन मंदिरात अभिनेत्यासोबत अडकली विवाहबंधनात
13
"टर्मिनेटरसारखी फिरतेय..." श्रद्धा कपूरच्या पायाला दुखापत, स्वत: व्हिडीओ शेअर करत दिली माहिती
14
‘टीईटी’चा पेपर ३ लाखांत, शिक्षकांची टोळीच जेरबंद; कोल्हापुरात शिक्षकी पेशाला काळीमा
15
बिना ड्रायव्हरच्या कारपेक्षा त्याची टेक्नॉलॉजी भारतासाठी महत्त्वाची; इस्रायली उद्योगपतींशी चर्चा
16
पाक खोटे बोलतोय...फ्रान्सने केला पर्दाफाश; जगाकडूनही खावी लागली चपराक, काय केला खोटा दावा?
17
कमळावर जाे उभा त्याला मतदान करा; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे स्वबळाचे संकेत?
18
मुंबईत तब्बल ११ लाख दुबार नावे आढळली; मतदार याद्यांमध्ये प्रचंड घाेळ, BMC कडे तक्रारींचा पाऊस
19
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
20
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; मतदारांचे मत अमूल्य,पण बोटावरची शाई कोट्यवधींची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 22:13 IST

केंद्रीय निवडणूक आयोग आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीत गुंतले असून निवडणुकीसाठी निवडणूक आयोग सज्ज झालेलं आहे. कोणत्याही निवडणुकीत महत्त्वाची असतं ती म्हणजे मतदान केल्यानंतर मतदारांच्या बोटावरची निळी शाई. तुम्हाला माहिती आहे का? या बोटावरच्या शाईची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये जाते.

ठळक मुद्देअसा आहे शाईचा इतिहास : किमतीत झाली वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्रीय निवडणूक आयोग आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीत गुंतले असून निवडणुकीसाठी निवडणूक आयोग सज्ज झालेलं आहे. कोणत्याही निवडणुकीत महत्त्वाची असतं ती म्हणजे मतदान केल्यानंतर मतदारांच्या बोटावरची निळी शाई. तुम्हाला माहिती आहे का? या बोटावरच्या शाईची किंमत कोट्यवधी रु पयांमध्ये जाते. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने शाईच्या २६ लाख बाटल्यांची आॅर्डर दिली आहे.देशभरात ९० कोटी मतदार संख्या असून त्यासाठी लागणाऱ्या निळ्या शाईच्या २६ लाख बाटल्या मागविण्यात आल्या आहेत. याची किंमत जवळपास ३३ कोटी रु पये आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याला ११ एप्रिलपासून सुरु वात होतेय, ७ टप्प्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक पार पडणार असून १९ मे रोजी अंतिम मतदानाचा टप्पा पार पडणार आहे. २३ मे रोजी मतदान मोजणी करण्यात येणार आहे. २००९ च्या निवडणुकीची तुलना करता यंदा निळ्या शाईच्या किंमतीत तीनपट वाढ झाली आहे. २००९ मध्ये निळ्या शाईची किंमत १२ कोटी रु पये होती. तर मागील २०१४ च्या निवडणुकीपेक्षा यंदा साडेचार लाख बाटल्या अधिक मागविण्यात आल्या आहेत.एका बाटलीमध्ये १० मिली निळी शाई असते. एका बाटलीमधून किमान ३५० मतदारांवर निळ्या शाईचं निशाण लावू शकतो. २००४ च्या निवडणुकीवेळी मतदान करणाऱ्या मतदाराच्या बोटावर केवळ एक ठिपका निळ्या शाईचा लावण्यात येत होता. मात्र २००६ रोजी निवडणूक आयोगाने ठिपक्याऐवजी सरळ रेषा आखण्याचे निर्देश दिले. त्यामुळे शाईचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला. प्रत्येक मतदान केंद्रावर दोन बाटल्या देण्यात येतात. सर्वांत जास्त बाटल्यांचा वापर उत्तर प्रदेशात केला जातो.याठिकाणी ३ लाख बाटल्यांचा वापर करण्यात येतो. तर सर्वांत कमी बाटल्या लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशात वापरण्यात येतात. याठिकाणी २०० बाटल्यांचा वापर होतो. मतदानापूर्वी मतदान केंद्रावर हाताच्या बोटावर लावली जाणारी शाई ही म्हैसूरवरून संपूर्ण देशात पाठवली जाते. सर्वप्रथम १९६२ मध्ये झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शाईचा वापर करण्यात आला. यानंतर देशात होणाºया प्रत्येक निवडणुकीत शाईचा वापर होऊ लागला.म्हैसूरवरून येणार शाईया वेळी देशातील काही भागात बोगस मतदान होत असल्याच्या घटना घडत होत्या. या घटना थांबवण्यासाठी या पद्धतीचा उपयोग करण्यात आला. म्हैसूरची शाई ही निळी शाई बोटावर लावल्यानंतर अजिबात पुसता येत नाही. ही शाई म्हैसूर येथील एका वॉर्निश कंपनीमध्ये तयार होते.या कंपनीकडून जगातील २५ देशांना निवडणुकीची शाई दिली जाते. आपल्या देशालाही निवडणुकीसाठी शाईचा पुरवठा करण्याचे कंत्राट याच कंपनीला देण्यात येते. म्हणूनच निवडणुकीत वापरल्या जाणाºया या शाईला ‘म्हैसूरची शाई’ म्हणून ओळखली जाते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक