शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

Lok Sabha Election 2019; खासदारांच्या निवडणुकीवर आमदारांचे रिपोर्ट कार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 23:36 IST

लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्याने विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे. मात्र लोकसभा निवडणुकीतील उमेदवाराचे प्रगतीपत्रक आणि विजयावरुन विधानसभेचे तिकीट निश्चित होणार आहे. त्यामुळे जेवढी चिंता या निवडणुकीची उमेदवाराला नसेल त्यापेक्षा अधिक काळजी विद्यमान आमदारांना असल्याने ते प्रचारासाठी रात्रंदिवस एक करीत आहे.

ठळक मुद्देचांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्यासाठी प्रयत्न : गावात वाढला मुक्काम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्याने विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे. मात्र लोकसभा निवडणुकीतील उमेदवाराचे प्रगतीपत्रक आणि विजयावरुन विधानसभेचे तिकीट निश्चित होणार आहे. त्यामुळे जेवढी चिंता या निवडणुकीची उमेदवाराला नसेल त्यापेक्षा अधिक काळजी विद्यमान आमदारांना असल्याने ते प्रचारासाठी रात्रंदिवस एक करीत आहे. एकंदरीत निवडणूक खासदाराची असली तरी बिपी मात्र आमदारांचा वाढला आहे.भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात गोंदिया,अर्जुनी मोरगाव, तिरोडा, भंडारा, साकोली आणि तुमसर या सहा मतदार संघाचा समावेश आहे. मागील विधानसभा निवडणुकीत सहा पैकी पाच आमदार भाजपाचे निवडून आले तर गोंदिया विधानसभेत एकमेव काँग्रेसचा आमदार निवडून आला. मागील दोन दशकांपासून गोंदिया विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत सुध्दा आपली जागा कायम ठेवण्यासाठी सर्वाधिक टेशंन भाजपा आमदारांना आहे. अर्जुनी मोरगाव, तुमसर आणि साकोली मतदार संघात भाजपाचे दमदार आमदार असतांना सुध्दा भाजपाचा उमेदवार पराभूत झाल्याने या आमदारांना आत्मपरिक्षण करण्यास भाग पाडले.पोटनिवडणूक असल्याने पक्षांने सुध्दा ही बाब गांर्भियाने घेतली नाही. मात्र नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा देत भाजपाला रामराम ठोकल्यानंतर हा लोकसभा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यातून हिरावला गेला. त्यामुळे ही निवडणूक भाजपासाठी अधिक प्रतिष्ठेची आहे. तर राष्टÑवादी काँग्रेसचे या मतदारसंघावर वर्चस्व कायम ठेवण्याचे खा.प्रफुल्ल पटेल यांच्यासमोर सुध्दा आवाहन आहे. त्यासाठीच प्रफुल्ल पटेल व वर्षा पटेल मागील काही दिवसांपासून हा मतदारसंघ पूर्णपणे पिंजून काढत आहे. सहा महिन्याने विधानसभेची निवडणूक होणार असल्याने गोंदियाचे आ. गोपालदास अग्रवाल यांनी सुध्दा प्रचार दौरा सुरू केला असून आघाडीच्या उमेदवारासाठी मतांचा जोगावा मागत आहे. मात्र भाजपाच्या पाच आमदारांसाठी लोकसभेची ही निवडणूृक अतिशय महत्त्वपूर्ण असून या निवडणुकीतूनच विधानसभेची इंनिग खेळली जाणार आहे. त्यामुळे ते सुध्दा दिवसरात्र एक करुन मतदारसंघात प्रचारासाठी फिरत आहे.उमेदवार किंवा पक्षाकडून काही मदत मिळो अथवा न मिळो स्वत:ची पुंजी लावून पक्षाचा उमेदवाराचा प्रचार करताना सुध्दा काही आमदार दिसत आहे. त्यामुळे आमदारांनी ही निवडणूक चांगलीच मनावर घेतल्याचे चित्र आहे. या मागील कारण देखील तसेच लोकसभेच्या निवडणुकीवरच विधानसभेसाठी प्रगतीपत्रक ठरणार आहे. त्यामुळे गुणवत्ता यादीत उर्तीण होण्यासाठी आमदार जीवाचा आटापिटा करीत आहे. याच प्रगतीपत्रकावरुन त्यांचा मुंबईत पुन्हा जाण्याचा रस्ता मोकळा होणार आहे.पालकमंत्र्याच्या मतदारसंघातूनच राष्ट्रवादीला आघाडीसहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे हे ४२ हजार मतांनी निवडून आले. विशेष म्हणजे सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघावर भाजपाचे वर्चस्व असताना सुध्दा राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून आला. तर पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या मतदार संघातून कुकडे यांना आघाडी मिळाली होती. गोंदिया,तुमसर आणि साकोली मतदार संघातून सुध्दा कुकडे यांना आठ ते दहा हजार मतांची आघाडी मिळाली होती हे विशेष.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक