शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

Lok Sabha Election 2019; रॅली, प्रचार संभानी गाजला मंगळवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 22:48 IST

लोकसभा निवडणुकीच्या विदर्भातील पहिल्या टप्प्यातील निवडणुकांसाठी ११ एप्रिलला मतदान घेण्यात येणार आहे. मतदानाच्या दोन दिवस आधी जाहीर प्रचार बंद होते. त्यामुळे मंगळवारी (दि.९) सर्वच राजकीय पक्षांनी मोटारसायकल रॅली, पदयात्रा आणि प्रचारसभांचा धडका लावला होता.

ठळक मुद्देजाहीर प्रचार बंद : थेट मतदारांशी संपर्कावर उमेदवारांचा भर, आता लक्ष मतदान प्रक्रियेकडे

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : लोकसभा निवडणुकीच्या विदर्भातील पहिल्या टप्प्यातील निवडणुकांसाठी ११ एप्रिलला मतदान घेण्यात येणार आहे. मतदानाच्या दोन दिवस आधी जाहीर प्रचार बंद होते. त्यामुळे मंगळवारी (दि.९) सर्वच राजकीय पक्षांनी मोटारसायकल रॅली, पदयात्रा आणि प्रचारसभांचा धडका लावला होता. यासर्व माध्यमातून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची चढाओढ दिसून आली. एकंदरीत रॅली, प्रचार सभा आणि मोटारसायकल रॅलीने मंगळवार गाजल्याचे चित्र होते.लोकसभा निवडणुकीला घेवून मागील १३ दिवसांपासून भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. सकाळी ८ वाजतानंतर विविध पक्षांच्या उमेदवाराच्या निवडणूक प्रचारार्थ भोग्यांनी मतदारसंघातील वातावरण ढवळून निघाले होते.उमेदवारांनी आपल्या पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी प्रचारसभा, पदयात्रा आणि मोटारसायकल रॅलीचा आधार घेतला होता.प्रचारासाठी कमी कालावधी मिळाल्याने मागील दहा दिवस उमेदवारांचे संपूर्ण कुुटुंबीय सुध्दा प्रचारात उतरले होते. भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात एकूण १६०० गावे असून या गावांतील मतदारांपर्यंत पोहचण्याचा सर्वच राजकीय पक्षाच्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला. त्यामुळे मागील १२ दिवसांपासून ग्रामीण भागात निवडणुकीच्या निमित्ताने लोकशाहीचा उत्सव पाहयला मिळाला.निवडणूक आचारसंहितेनुसार मतदानाच्या दोन दिवस आधी जाहीर प्रचार बंद होत असल्याने मंगळवारी (दि.९) सकाळपासूनच सर्वच पक्षांनी रॅली, पदयात्रा आणि मोटारसायकल रॅली व प्रचारसभा घेवून मतदारांपर्यंत पोहचण्या प्रयत्न केला. त्यामुळे मागील बारा दिवस मतदार संघात जेवढी निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण पाहयला मिळाले नाही ते मंगळवारी पाहयला मिळाले.आता थेट संर्पकावर भरमंगळवारपासून जाहीर प्रचार बंद झाला असून आता उरलेल्या दोन दिवसात थेट मतदारांशीे संपर्क साधण्यावर उमेदवार आणि त्यांच्या पक्षाचा भर असणार आहे. तर मागील दहा दिवसांपासून सुरू असलेला भोग्यांचा आवाज सुध्दा आता पूर्णपणे बंद झाला आहे.बुथ कमिट्यांवर लक्षसर्वच राजकीय पक्षानी निवडणुकीचे योग्य व्यवस्थापन केले.तर अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी प्रत्येक गावात बुथ कमिट्या तयार केल्यात. या बुथ कमिट्यांवर विजयाचे समीकरण तयार करण्याकडे उमेदवार आणि नेत्यांचे लक्ष आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbhandara-gondiya-pcभंडारा-गोंदिया