शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Lok Sabha Election 2019; मिसपिर्रीवासीयांचा निवडणुकीवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 22:23 IST

तालुक्यातील मिसपिर्री गट ग्रामपंचायत ३ नोव्हेंबर २०११ ला नक्षलवाद्यांनी जाळून टाकली. यात नागरिकांच्या नेहमी उपयोगात येणारे जन्म, मृत्यूचे दस्ताऐवज जळून नष्ट झाले. त्यामुळे हे दाखल पुन्हा तयार करुन देण्यात यावी, या मागणीचा प्रस्ताव ग्रामपंचयातने शासनाकडे पाठविला.

ठळक मुद्देग्रामसभेत घेतला निर्णय : आठ वर्षांपासून मागणीकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : तालुक्यातील मिसपिर्री गट ग्रामपंचायत ३ नोव्हेंबर २०११ ला नक्षलवाद्यांनी जाळून टाकली. यात नागरिकांच्या नेहमी उपयोगात येणारे जन्म, मृत्यूचे दस्ताऐवज जळून नष्ट झाले. त्यामुळे हे दाखल पुन्हा तयार करुन देण्यात यावी, या मागणीचा प्रस्ताव ग्रामपंचयातने शासनाकडे पाठविला. मात्र याला आठ वर्षांचा कालावधी लोटूनही शासनाने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे मिसीपिर्रीवासीयांनी लोकसभा निवडणुकीसह सर्वच निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा ठराव ग्रामसभेत घेतला आहे.देवरी तालुक्यातील अतिदुर्गम, आदिवासी व नक्षलग्रस्त गट ग्रामपंचायत मिसपिर्री येथील ग्रामपंचायत कार्यालय नक्षलवाद्यांनी ३ नोव्हेंबर २०११ ला पूर्णपणे जाळून टाकली. यात नागरिकांचे नेहमी उपयोगात येणारे जन्म, मृत्यू दस्ताऐवज सुद्धा जळून नष्ट झाले. त्यामुळे येथील गावकऱ्यांच्या मागणीवरुन अंगणवाडी, शाळेचे दाखले खारीज व आरोग्य विभागाच्या रेकार्डनुसार जन्म-मृत्यूचे दस्ताऐवज तयार करुन ग्रामसभेची मंजुरी घेवून सदर प्रस्ताव २८ डिसेंबर २०१५ ला जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत पंचायत मंत्रालय मुंबईला पाठविले होते. परंतु या प्रस्तावाला अजूनपर्यंत मंजुरी न मिळाल्याने या प्रकाराला कंटाळून शासनाच्या प्रती रोष व्यक्त करीत मिसपिर्री येथील लोकांनी ३० आॅगस्ट २०१८ ला घेतलेल्या ग्रामसभेत जोपर्यंत त्यांची मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत सर्वच निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. गावातील एखाद्या व्यक्तीला जन्म किंवा मृत्यूचे प्रमाणपत्र लागत असेल तर सदर प्रमाणपत्राकरिता दिवानी न्यायाधीश यांच्या न्यायालयामध्ये अर्ज दाखल करावा लागतो. परंतु सदर प्रमाणपत्र प्राप्त करण्याकरिता ७ ते ८ हजार रुपयांचा खर्च सोसावा लागतो. यानंतरही प्रमाणपत्र मिळत नाही. त्यामुळे येथील गावकऱ्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंबधिचे निवेदन सुध्दा जिल्हाधिकारी व शासनाला पाठविले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक