शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

Lok Sabha Election 2019; भाजप सरकारच्या काळातच सर्वाधिक जनहितार्थ निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 21:15 IST

केंद्र आणि राज्यात भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी, चौवीस तास वीज, मजुरांना कामगारांचा दर्जा देण्याचे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प सुध्दा मार्गी लावण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देचंद्रशेखर बावनकुळे : गोंदिया येथे प्रचारसभा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र आणि राज्यात भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी, चौवीस तास वीज, मजुरांना कामगारांचा दर्जा देण्याचे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प सुध्दा मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. तर बेघरांना घरकुल उपलब्ध करुन देण्याचे काम केले. भाजप सरकारच्या काळातच सर्वाधिक जनहितार्थ निर्णय घेण्यात आल्याचा दावा ऊर्जा मंत्री व भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.भाजप सेना युतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या निवडणूक प्रचारार्थ बुधवारी (दि.३) पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांची गोंदिया येथे आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना ते बोलत होते.या वेळी प्रामुख्याने पालकमंत्री राजकुमार बडोले, शिवसेनेचे नेते डॉ. दीपक सावंत, खा.डॉ.विकास महात्मे, आ.डॉ.परिणय फुके, अनिल सोले, विजय रहांगडाले, बाळा काशिवार, संजय पुराम, नगराध्यक्ष अशोक इंगळे, उपेंद्र कोठेकर, माजी. खा.खुशाल बोपचे, भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश शिवहरे उपस्थित होते. राजकुमार बडोले म्हणाले, युती सरकारच्या काळातच या दोन्ही जिल्हाचा खऱ्या अर्थाने सर्वांगिन विकास झाला. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करणे सुरूवात केल्याने यातील गैरप्रकाराला आळा बसला. तर झाशीनगर उपसा सिंचन प्रकल्प सुध्दा आता मार्गी लावला जात असल्याचे सांगितले. परिणय फुके म्हणाले, काँग्रेसला जे काम मागील ७० वर्षांत करता आले नाही ते काम भाजप सरकाने केवळ ७० दिवसात पूर्ण केले. नझुल पट्टेधारकांना मालकीे हक्क पट्टे मिळवून देण्याचे व भूमीधारीचे भूमीस्वामी करुन सातबारा उपलब्ध करुन देण्याचे महत्त्वपूर्ण भाजप सरकारने केल्याचे सांगितले.विजय रहांगडाले म्हणाले, धापेवाडा, पिंडकेपार हे प्रकल्प मार्गी लावून शेतकऱ्यांना सिंचनात समृध्द करण्याचे काम केल्याचे सांगितले. भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी सुनील मेंढे यांचे हात बळकट करण्यास सांगितले. या वेळी उपस्थित अन्य मान्यवरांनी सुध्दा मार्गदर्शन केले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक