शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Lok Sabha Election 2019; शेतकऱ्यांची सोडून उद्योगपतींची कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 23:03 IST

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मोठ मोठी स्वप्न दाखविले. मात्र आज तेच मोदी पूर्णपणे बदलले असून ‘अच्छे दिन’च्या गोष्टीही ते करीत नाही. मागील वर्षांत वॅटच्या माध्यमातून सरकारला आठ लाख कोटींचा महसूल मिळत होता. आता मात्र यावर्षी जीएसटीमुळे १२ लाख कोटी रूपये सरकारला मिळाले असून ते सर्वसामान्यांच्या खिशातून काढलेले आहेत.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : महाआघाडीच्या शहर व ग्रामीण भागातील प्रचार सभा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मोठ मोठी स्वप्न दाखविले. मात्र आज तेच मोदी पूर्णपणे बदलले असून ‘अच्छे दिन’च्या गोष्टीही ते करीत नाही. मागील वर्षांत वॅटच्या माध्यमातून सरकारला आठ लाख कोटींचा महसूल मिळत होता. आता मात्र यावर्षी जीएसटीमुळे १२ लाख कोटी रूपये सरकारला मिळाले असून ते सर्वसामान्यांच्या खिशातून काढलेले आहेत. या रकमेचा लाभ देशातील जनतेला मिळाला नाही. सरकारने या पैशांतून शेतकऱ्यांची नव्हे तर चार उद्योगपतींची चार लाख कोटींची कर्जमाफी केल्याची टीका आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केली.राष्ट्रवादी कॉँग्रेस-कॉँग्रेस-आरपिआय, पिरिपा, खोरिपा महाआघाडीचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांच्या प्रचारार्थ गोंदिया शहरासह ग्रामीण भागात आयोजित प्रचार सभांना संबोधित करताना ते बोलत होते. पुढे बोलताना आमदार अग्रवाल यांनी, सन २००९ मध्ये सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात कॉँग्रेस सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली होती. मात्र भाजप सरकारची शेतकºयांप्रती कशाप्रकारचीही जबाबदारी व आत्मीयता नाही. यामुळेच आजही शेतकरी कर्जमाफीसाठी बँकांच्या चकरा मारत आहेत. प्रत्येकालाच या सरकारने कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्रासवून सोडले असल्याचा आरोपही केला.याप्रसंगी जिल्हा परिषद सभापती सीमा मडावी, प्रकाश रहमतकर, रमेश अंबुले, विमल नागपुरे, विजय लोणारे, विठोबा लिल्हारे, माधुरी हरिणखेडे, चमन बिसेन, ओमप्रकाश भक्तवर्ती, स्नेहा गौतम, प्रमिल करचाल, निता पटले, विनिता टेंभरे यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbhandara-gondiya-pcभंडारा-गोंदियाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019