शहरं
Join us  
Trending Stories
1
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
2
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
3
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
4
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
5
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
6
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
7
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
8
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
9
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
10
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
11
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
12
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
13
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
14
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
15
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
16
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
17
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
18
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
19
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
20
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी

Lok Sabha Election 2019; भाजपाचे सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 20:49 IST

भाजपाने २०१४ च्या निवडणुकीत मोठमोठाली आश्वासने दिली होती. जनतेच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र पाच वर्षात सर्वच आघाड्यांवर भाजपा सरकार अपयशी झाले. बेरोजगारी, सिंचन, धान उत्पादकांच्या प्रश्नांसह विविध प्रश्न कायम आहेत.

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : बेरोजगारी, सिंचन आणि धान उत्पादकांचे प्रश्न कायम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भाजपाने २०१४ च्या निवडणुकीत मोठमोठाली आश्वासने दिली होती. जनतेच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र पाच वर्षात सर्वच आघाड्यांवर भाजपा सरकार अपयशी झाले. बेरोजगारी, सिंचन, धान उत्पादकांच्या प्रश्नांसह विविध प्रश्न कायम आहेत. त्यामुळे या निवडणुकीत जनता योग्य निर्णय घेईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.राष्ट्रवादी-काँग्रेसचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांनी नामांकन दाखल केल्यानंतर खासदार पटेल 'लोकमत'शी बोलत होते. बेरोजगारी ही मुख्य समस्या आहे. भंडारा जिल्ह्यात मंजुर झालेला भेल प्रकल्प अद्यापही सुरू झाला नाही. जीएसटी आणि नोटबंदीनंतर लहान व्यापार बंद पडले.भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द हा महत्वाकांक्षी प्रकल्प भाजपाच्या काळात निधी अभावी रखडला आहे. आमच्या काळात आम्ही या प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा देवून भरपूर निधी दिला. परंतु भाजपा सरकारने या प्रकल्पाकडे दुर्लक्ष केले. परिणामी सिंचनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, असे त्यांनी सांगितले.धान उत्पादक शेतकऱ्यांना आमच्या काळात तीन हजारापर्यंत भाव दिले. परंतु भाजपाचे सरकार आल्यानंतर धानाचे भाव दोन हजाराच्यावर गेले नाही. यंदा सरकारने ५०० रूपये बोनसची घोषणा केली. मात्र तिही उशिरा केली. त्यामुळे या बोनसचा फायदा शेतकऱ्यांना कमीच झाला असून अद्यापर्यंत बोनसचे पैसेही शेतकऱ्यांना मिळाले नाही, असे त्यांनी सांगितले.म्हणून आम्ही लोकसभेच्या रिंगणात उतरलो नाहीमी राज्यसभेचा सदस्य असून माझा कार्यकाळ आणखी सव्वा तीन वर्ष आहे. सध्या विधानसभेत आमच्याकडे हवे तेवढे संख्याबळ नाही. त्यामुळे राज्यसभेची जागा आम्हाला गमवावी लागली असती त्यामुळेच आम्ही उमेदवारी नाकारली. मात्र भंडारा आणि गोंदिया दोनही जिल्ह्यातील नागरिक आग्रही होते. उमेदवाराच्या नावाची आधी घोषणा केली असती तर जनतेने आम्हाला सळो की पळो करून सोडले असते आणि उमेदवारी दाखल करायला बाध्य केले असते. त्यामुळे ऐन वेळेवर उमेदवाराच्या नावाची घोषणा केली. नाना पंचबुद्धे हे सौम्य स्वभावाचे असून राज्याचे शिक्षण राज्यमंत्री होते. सर्वांना आपलेसे करण्याचे गुण त्यांच्यात असल्यानेच आपण त्यांना उमेदवारी दिल्याचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.बारा दिवसात जनतेपर्यंत पोहोचण्याचे दिव्यलोकसभा निवडणुकीत भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येक गावातील नागरिकांपर्यंत पोहचण्याचे दिव्य उमेदवारापुढे आहे. कोणताही उमेदवार प्रत्येक गावात जावू शकत नाही. मात्र विद्यमान सरकारबद्दल असलेला रोष यावेळी निश्चितच दिसून येईल. त्यामुळे आम्हाला प्रत्येक गावात पोहचता आले नाही तरी आम्ही जनतेपर्यंत अप्रत्यक्ष पोहचणार असल्याचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

टॅग्स :prafull patelप्रफुल्ल पटेलLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक