शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

लोकचळवळीने ११४ गावे प्रगतीच्या वाटेवर

By admin | Updated: December 31, 2015 01:50 IST

तंटामुक्त मोहीमेला नक्षलवाद्यांनी टार्गेट केले आहे. परंतु नक्षलवाद्यांच्या धमक्यांना न जुमानता गोंदिया जिल्ह्यातील ११४ नक्षलग्रस्त अतिसंवेनशिल गावात लोकचळवळ उभी झाली आहे.

दहशत संपली : तंटामुक्त अध्यक्ष व सदस्यांचा हिरीरीने सहभागगोंदिया : तंटामुक्त मोहीमेला नक्षलवाद्यांनी टार्गेट केले आहे. परंतु नक्षलवाद्यांच्या धमक्यांना न जुमानता गोंदिया जिल्ह्यातील ११४ नक्षलग्रस्त अतिसंवेनशिल गावात लोकचळवळ उभी झाली आहे. शासनाने अमंलात आणलेल्या तंटामुक्त मोहिमने आदिवासी जनता व पोलीसांना जोडण्याची कामे केली. ज्या गावात शासनाच्या योजनांना थारा नव्हता त्या गावात तंटामुक्त मोहीमेला हिरहिरीने राबविले. यासाठी नक्षलवाद्यांनी तंटामुक्त गाव मोहीमेविरूध्द एल्गार पुकारून तंटामुक्त मोहीम राबविणाऱ्या गावकऱ्यांना समितीचे अध्यक्षपद व सदस्यता सोडण्याचे फर्मान नक्षलवाद्यांनी सोडले होते. महाराष्ट्र शासनाने १५ आॅगस्ट २००७ पासून राज्यात तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली. या मोहीमेमुळे गावागावात लोकचळवळ उभी झाली. ही मोहीम सुरू होण्यापुर्वी नक्षलग्रस्त गावात शासकीय योजनांना राबविण्यास नागरिकांमध्ये उदासिनता होती. मात्र तंटामुक्त मोहीमेत लोकसहभाग असल्याने गावातील नागरीक या मोहीमेशी जुळले. या मोहीमेला लोकचळवळीचा आधार मिळाला. नक्षलग्रस्त गावात पोलिसांशी बोलण्यास आदिवासी तयार नव्हते. त्या गावात या तंटामुक्त मोहीमेमुळे आदिवासी जनता व पोलीस यांच्यातील दुरावा कमी करून त्यांचे मने जोडली. नक्षल चळवळीची माहिती पोलिसांना मिळण्यास या मोहीमेची बरीच मदत झाली. आदिवासी जनता व पोलीस या मोहीमेने जवळील आल्याने नक्षलवाद्यांनी या तंटामुक्त मोहीमेला टार्गेट केले. पाच वर्षापुर्वी नक्षलवाद्यांनी पत्रके टाकून तंटामुक्त मोहीम बंद करा अन्यथा परिणाम भोगायला तयार रहा, अशी धमकी दिली होती. त्यामुळे ग्राम पंचायत निवडणुकीनंतर नक्षलवाद्यांनी सरपंच, ग्रा.पं. सदस्य, तंटामुक्त अध्यक्ष व सदस्यांनी राजीनामा द्यावा असे फर्मान सोडल्यामुळे गोंदिया, गडचिरोली, जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या लोकप्रतिनिधींनी राजीनामे दिले होते. सन २०१२ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या दबावामुळे ३ एप्रिल २०१२ पासून एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, कुरखेडा, अहेरी, कोरची अश्या अनेक ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थामधील ३३१ लोकप्रतिनिधींनी राजीनामे दिले होते.काही दिवस राजीनाम्याचा सूर चालल्यानंतर हा प्रकार थांबला. नक्षलवाद्यांची दहशत आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात होता त्यामुळे आपला जीव धोक्यात टाकून कोणतेही पद नको, अशी भूमिका तंटामुक्त अध्यक्ष व सदस्यांची होती. परंतु आता ती दहशत राहीली नसून तंटामुक्त मोहीमेच्या रूपाने पुन्हा लोकचळवळ उभी झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)