शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
4
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
5
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
6
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
7
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
8
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
9
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
10
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
11
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
12
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
13
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
14
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
15
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
16
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
17
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
18
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
19
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
20
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो

लोकचळवळीने ११४ गावे प्रगतीच्या वाटेवर

By admin | Updated: December 31, 2015 01:50 IST

तंटामुक्त मोहीमेला नक्षलवाद्यांनी टार्गेट केले आहे. परंतु नक्षलवाद्यांच्या धमक्यांना न जुमानता गोंदिया जिल्ह्यातील ११४ नक्षलग्रस्त अतिसंवेनशिल गावात लोकचळवळ उभी झाली आहे.

दहशत संपली : तंटामुक्त अध्यक्ष व सदस्यांचा हिरीरीने सहभागगोंदिया : तंटामुक्त मोहीमेला नक्षलवाद्यांनी टार्गेट केले आहे. परंतु नक्षलवाद्यांच्या धमक्यांना न जुमानता गोंदिया जिल्ह्यातील ११४ नक्षलग्रस्त अतिसंवेनशिल गावात लोकचळवळ उभी झाली आहे. शासनाने अमंलात आणलेल्या तंटामुक्त मोहिमने आदिवासी जनता व पोलीसांना जोडण्याची कामे केली. ज्या गावात शासनाच्या योजनांना थारा नव्हता त्या गावात तंटामुक्त मोहीमेला हिरहिरीने राबविले. यासाठी नक्षलवाद्यांनी तंटामुक्त गाव मोहीमेविरूध्द एल्गार पुकारून तंटामुक्त मोहीम राबविणाऱ्या गावकऱ्यांना समितीचे अध्यक्षपद व सदस्यता सोडण्याचे फर्मान नक्षलवाद्यांनी सोडले होते. महाराष्ट्र शासनाने १५ आॅगस्ट २००७ पासून राज्यात तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली. या मोहीमेमुळे गावागावात लोकचळवळ उभी झाली. ही मोहीम सुरू होण्यापुर्वी नक्षलग्रस्त गावात शासकीय योजनांना राबविण्यास नागरिकांमध्ये उदासिनता होती. मात्र तंटामुक्त मोहीमेत लोकसहभाग असल्याने गावातील नागरीक या मोहीमेशी जुळले. या मोहीमेला लोकचळवळीचा आधार मिळाला. नक्षलग्रस्त गावात पोलिसांशी बोलण्यास आदिवासी तयार नव्हते. त्या गावात या तंटामुक्त मोहीमेमुळे आदिवासी जनता व पोलीस यांच्यातील दुरावा कमी करून त्यांचे मने जोडली. नक्षल चळवळीची माहिती पोलिसांना मिळण्यास या मोहीमेची बरीच मदत झाली. आदिवासी जनता व पोलीस या मोहीमेने जवळील आल्याने नक्षलवाद्यांनी या तंटामुक्त मोहीमेला टार्गेट केले. पाच वर्षापुर्वी नक्षलवाद्यांनी पत्रके टाकून तंटामुक्त मोहीम बंद करा अन्यथा परिणाम भोगायला तयार रहा, अशी धमकी दिली होती. त्यामुळे ग्राम पंचायत निवडणुकीनंतर नक्षलवाद्यांनी सरपंच, ग्रा.पं. सदस्य, तंटामुक्त अध्यक्ष व सदस्यांनी राजीनामा द्यावा असे फर्मान सोडल्यामुळे गोंदिया, गडचिरोली, जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या लोकप्रतिनिधींनी राजीनामे दिले होते. सन २०१२ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या दबावामुळे ३ एप्रिल २०१२ पासून एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, कुरखेडा, अहेरी, कोरची अश्या अनेक ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थामधील ३३१ लोकप्रतिनिधींनी राजीनामे दिले होते.काही दिवस राजीनाम्याचा सूर चालल्यानंतर हा प्रकार थांबला. नक्षलवाद्यांची दहशत आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात होता त्यामुळे आपला जीव धोक्यात टाकून कोणतेही पद नको, अशी भूमिका तंटामुक्त अध्यक्ष व सदस्यांची होती. परंतु आता ती दहशत राहीली नसून तंटामुक्त मोहीमेच्या रूपाने पुन्हा लोकचळवळ उभी झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)