शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
2
India Pakistan: पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मूमध्ये आयुक्तांचा मृत्यू, अब्दुल्ला म्हणाले, हादरवून टाकणारी बातमी
3
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉचिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
4
'बुनयान उल मरसूस', तीन एअरबेसवर झालेल्या स्फोटांनंतर पाकिस्तानने भारताविरुद्ध कारवाई सुरू करण्याची घोषणा केली
5
India Pakistan Tension Update: भारताने पाकिस्तानाच्या 'या' हवाई तळांवर डागल्या ६ बॅलेस्टिक मिसाईल्स, मोठे स्फोट
6
आजचे राशीभविष्य, १० मे २०२५: अनेक क्षेत्रात यश व कीर्ती लाभेल, आर्थिक लाभ होईल
7
१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
8
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
9
संपादकीय: बीसीसीआयचे चुकलेच! खेळाडूंना दंडांवर काळ्या फिती बांधायला लावली, स्पर्धा रेटली...
10
प्रवासी विमानांना ढाल बनवतोय पाक; कर्नल सोफियांनी पुढे आणला पाकचा चेहरा
11
आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप; पाकिस्तानी जागच्याजागी हादरले...
12
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
13
महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; प्रत्येक जिल्ह्यात ‘वॉररूम’
14
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
15
Operation Sindoor Live Updates: थोड्याच वेळात परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद; पहाटे ५:४५ वाजता ऑपरेशन सिंदूर बद्दल माहिती देणार
16
रक्तसाठा मुबलक ठेवा; आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर; तातडीची बैठक : सचिवांच्या आरोग्य विभागाला सूचना
17
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
19
आयपीएल आठवडाभर स्थगित; बीसीसीआय : राष्ट्रहित सर्वांत महत्त्वाचे, नवे वेळापत्रक योग्य वेळी देणार
20
‘हॅलो, मुरली तुमचा कोण? अन् आईला भोवळ; शहीद नाईक यांचा ‘तो’ व्हिडीओ कॉल अखेरचा

शेतकºयांच्या नावावर कर्जाची उचल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 22:03 IST

बिरसी (कामठा) येथील ११३ शेतकºयांना अंधारात ठेवून त्यांच्या नावावर तब्बल ५३ लाख रुपयांच्या कर्जाची उचल केल्याचा धक्कादायक प्रकार उघकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्दे५३ लाखांची उचल : ११३ शेतकºयांची फसवणूक, कर्जमाफीदरम्यान उघडकीस

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बिरसी (कामठा) येथील ११३ शेतकºयांना अंधारात ठेवून त्यांच्या नावावर तब्बल ५३ लाख रुपयांच्या कर्जाची उचल केल्याचा धक्कादायक प्रकार उघकीस आल्याने खळबळ उडाली आहे.शासनाने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर शेतकरी कर्जमाफीसाठी बँका आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांकडे त्यांच्याकडे असलेल्या कर्जाच्या चौकशीसाठी धाव घेत आहे. दरम्यान बिरसी (कामठा) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेतून ११३ शेतकºयांच्या नावावर ५३ लाख रुपयांच्या कर्जाची उचल करण्यात आली. मात्र आम्ही कर्जाची उचल केली नसल्याचा दावा या शेतकºयांनी शनिवारी (दि.२३) येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. तर काही शेतकºयांनी जेवढ्या कर्जाची उचल केली त्यापेक्षा अधिकचे कर्ज उचल केल्याची नोंद रेकार्डवर असल्याचा आरोप केला.बिरसीचे सरपंच रवींद्र तावाडे, रंजीतसिंह पंदेले, भैयासिंग कोहरे, निरंजनाबाई नैकाने, रुक्मिणी पंडले, रामप्रसाद रंजीतसिंह मंडेले, रामजी भेंडारकर, शिरजोरसिंह पंडेले, ज्ञानीराम शिंदे, रतनसिंह मंडेले, सत्यभामा वंजारी, जयसिंह पंडेले, ज्ञानीराम शिंदे, रतनसिंह मंडेले, सत्यभामा वंजारी,जयसिंह बनाफर यांच्यासह २० ते २५ शेतकºयांनी पत्रकार परिषद घेवून हा प्रकार उघडकीस आणला. यापैकी काही शेतकºयांनी कर्जाची उचल केली नाही.यानंतरही त्यांच्या नावावर ५३ लाख रुपयांच्या कर्जाची उचल केल्याचे दाखविले आहे. जेव्हा हे शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी आॅनलाईन अर्ज करण्यासाठी गेले. तेव्हा हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. त्यांच्यापैकी काही शेतकरी कर्जदार आहेत. मात्र जेवढ्या कर्जाची त्यांनी उचल केली त्यापेक्षा अधिक कर्जाची उचल केल्याचे दाखविण्यात आले असल्याचा आरोप त्यांनी पत्र परिषदेत केला. एकूण कर्जाची उचल केलेली रक्कम २५ लाख ४१५ रुपयांचे व्याज लावले असल्याचे दाखविण्यात आले आहे. २८ लाख ७६ हजार १२ रुपयांच्या कर्जावर २५ लाख रुपयांचे व्याज आकारण्यात आले आहे. याचाच अर्थ एकाच शेतकºयाने मोठ्या रकमेचे कर्ज उचलले नाही हे स्पष्ट होते.त्यामुळे या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी शेतकºयांनी केली. या संस्थेची आमसभा २५ सप्टेबर रोजी होणार आहे. त्यात यावरुन वाद होण्याची शक्यता आहे.गुजरात येथे राहणाºया व्यक्तीवर कर्जज्या शेतकºयांच्या नावावर कर्जाची उचल केल्याचे दाखविण्यात आले आहे. त्यातील रंजीतसिंह पंडेले यांनी २००८ मध्ये २० हजार रुपयांच्या कर्जाची उचल केली होती. त्यानंतर ते त्याचवर्षी परिवारासह गुजरात येथे राहण्यासाठी गेले. मात्र त्यांच्यावर नावावर २००९ मध्ये १२ हजार रुपयांच्या कर्जाची उचल केल्याची नोंद संस्थेच्या रेकॉर्डवर आहे. त्यांचा परिवार येथे नव्हताच तर त्यांच्या नावावर कर्जाची उचल कोणी केली असा सवाल रुक्मिनी पंडेले यांनी केला.थकबाकीदारांच्या यादीत नावजयसिंह बनाफर यांनी या संस्थेतून कर्जाची उचल करुन त्याची परतफेड केली. त्यानंतरही त्यांचे नाव कर्जदार शेतकºयांच्या यादीत दाखविण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्यांना याच संस्थेच्या अध्यक्षांनी त्यांच्यावर कुठलेही कर्ज नसल्याचे पत्र दिले आहे. मग त्यांचे नाव थकीत कर्जदारांच्या यादीत कसे असा सवाल उपस्थित केला जात आहे. बनाफर यांनी २००९ मध्ये २६ हजार ८०० रुपयांच्या कर्जाची उचल केली. या कर्जाची त्यांनी २६ सप्टेंबर २०१३ मध्ये परतफेड केली.मोठे प्रकरण उघडकीस येण्याची शक्यताबिरसी (कामठा) येथील शेतकºयांच्या नावावर कर्जाची उचल केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर चांगलीच खळबळ उडाली आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी केल्यास जिल्ह्यातील इतर ठिकाणची प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता आहे.