शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

५६३७ लोकांना जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2017 00:16 IST

नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी यासाठी केंद्र सरकारतर्फे राजीव गांधी जीवनदायी योजना सुरु करण्यात आली.

 जीवन फुलले : राजीव गांधी जीवनदायी योजनेतून उपचार लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी यासाठी केंद्र सरकारतर्फे राजीव गांधी जीवनदायी योजना सुरु करण्यात आली. या योजनेला आता महात्मा ज्योतीबा फुले आरोग्य योजनेच्या नावाने चालविण्यात येत आहे. मागील साडे तीन वर्षात गोंदिया जिल्ह्यातील ५ हजार ६३७ लोकांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. गोंदिया जिल्ह्यात महात्मा ज्योतीबा फुले आरोग्य योजनेअंतर्गत ३१ नोव्हेंबर २०१३ ते ३१ मे २०१७ दरम्यान १५ हजार ५५८ कुटूंबाचे कार्ड तयार करण्यात आले. या अंतर्गत ४६ हजार ३४७ लाभार्थ्यांचा समावेश आहे. अंत्योदय कार्डामध्ये २२१, अन्नपूर्णा ८, केशरी रंगाचे ९ हजार ३९३ व पिवळ्या रंगाचे ५ हजार ९३६ कुटूंबाचा समावेश आहे. जिल्ह्याच्या ५हजार ६३७ लाभार्थी रेशन कार्डात ७ हजार ९०७ लोकांना जिल्हा व जिल्ह्याबाहेर आरोग्य सेवेचा लाभ घेण्यात येईल. या योजनेअंतर्गत गोंदिया जिल्हा व बाहेरील जिल्ह्यातील ज्या रुग्णालयामध्ये ही सेवा दिली जाते. त्या रुग्णालयांना आतापर्यंत १६ कोटी ७० लाख ५५ हजार ७७५ रुपये देण्यात आले आहे. हृदयरोग, मेंदूरोग, कर्करोग व इतर आजारावर उपचार केला जातो. गोंदिया जिल्ह्यातील ३ हजार १३९ लाभार्थ्यांचे ३ हजार ६८८ प्रकरण मंजूर करण्यात आले आहेत. गोंदिया जिल्ह्यात ज्या रुग्णालयांनी उपचार केला त्यांना ५ कोटी ४९ लाख ९३ हजार ९५० रुपये देण्यात आले आहे. जखमी, गर्भाशय, अपेडीक्स, अल्सर, पथरी, अशा आजारांचा उपचार करण्यात आला. ९७२ आजारांवर उपचार दारिद्रय रेषेखालील जीवन जगणाऱ्या गरीब कुटूंबाना सेंद्रीय कार्ड धारकांना राजीव गांधी जीवनदायी योजना (महात्मा ज्योतीबा फुले आरोग्य योजना) योजनेचा लाभ जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात, ग्रामीण रुग्णालयात, उपजिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय व महिला जिल्हा रुग्णालयात देण्यात येते. या योजनेअंतर्गत ९७२ उपचार, थेरेपी, २१२ शस्त्रक्रिया व ३० विशेष श्रेणीचा समावेश आहे. कुटूंब प्रमुखांच्या नावाने तयार करण्यात येणाऱ्या कार्डावर मोफत उपचार केला जातो. यासाठी रुग्णालयात टोल फ्री नंबर व आरोग्य मित्र ठेवण्यात आले आहेत. ग्रामीण भागात जनजागृती शासनातर्फे गरीब गरजूंना आरोग्याची सुविधा देण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली. परंतु ग्रामीण भागातील अनेक लोक या योजनेपासून अनभिज्ञ आहेत. माहिती अभावी खूप कमी लोकांनी आपले कार्ड तयार केले आहेत. गोंदिया जिल्हा आदिवासी व नक्षलग्रस्त असूनही गरीब गरजूंना याचा लाभ मिळावा यासाठी प्रचार प्रसार करणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत वर्षभरात कुटूंबातील कोणतेही सदस्यासाठी दिड लाख रुपयापर्यंतचा उपचार करण्याची मुभा आहे. नामवंत कंपन्यानी या योजनेत सहभाग घेतला आहे. किडणी प्रत्यारोपणासाठी अडीच लाखापर्यंत मर्यादा आहे. ही योजना मोफत आहे. उपचार व औषधी, भोजन व घरापासून रुग्णालयापर्यंत पोहचण्याची व्वयस्था तसेच उपचारानंतर १० दिवस मोफत औषधी देण्याचे प्रावधान आहे. डॉ. स्मीता घरडे, जिल्हा समन्वयक गोंदिया