शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
6
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
7
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
8
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
9
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
10
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
11
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
12
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
13
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
14
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
15
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
16
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
17
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
18
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
19
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
20
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 

गद्य-पद्यातून अविष्कृत होणारे परमार्थप्रवण म्हणजे साहित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 23:32 IST

संत ही अध्यात्मक्षेत्रातील अत्यंत उच्च कोटीची अवस्था आहे. सर्व भूताहितरत ज्ञानी, प्रेमळ भक्त हा संत शब्दाचा अर्थ आहे. संत कोणत्या ना कोणत्या धर्मसंप्रदायाचे अनुगृहित होते.

ठळक मुद्देसातव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन

संतोष बुकावन ।ऑनलाईन लोकमतसंत चोखोबानगरी (अर्जुनी मोरगाव) : संत ही अध्यात्मक्षेत्रातील अत्यंत उच्च कोटीची अवस्था आहे. सर्व भूताहितरत ज्ञानी, प्रेमळ भक्त हा संत शब्दाचा अर्थ आहे. संत कोणत्या ना कोणत्या धर्मसंप्रदायाचे अनुगृहित होते. त्यांच्या धर्मसाधनेचा एक भाग म्हणून त्यांनी साहित्यनिर्मिती केली. या संत पुरुषाचे विविध गद्य-पद्य प्रकारातून अविष्कृत होणारे परमार्थप्रवण साहित्य म्हणजे संत साहित्य होय, असे उद्गार ७ व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ह.भ.प. डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर यांनी काढले.वारकरी साहित्य परिषद व डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक जि.प.कनिष्ठ महाविद्यालय संत चोखोबानगरी येथे आयोजित मराठी संत साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.या वेळी मंचावर ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, पुंडलिक फडाचे प्रमुख ह.भ.प. माधव महाराज शिवणकर, ह.भ.प. त्र्यंबकदादा गायकवाड, मंगळवेढेकर, संत कबीर मठाचे प्रमुख ह.भ.प. कबीरबुवा, ह.भ.प. नरहरीबुवा चौधरी, संत एकनाथ महाराजांचे वंशज ह.भ.प. प्रविण गोसावी, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, आयबीएन लोकमतचे राजेंद्र हुंजे, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष हभप विठ्ठल पाटील उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात राष्टÑसंत तुकडोजी महाराजांच्या ‘या भारतात बंधूभाव नित्य वसू दे’ या भजनाने झाली. पंढरपुरचे वारकरी संप्रदायाचे फडकरी सभास्थळी टाळ मृदंगाच्या वाद्यात त्यांचे आगमन होताच त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. याचवेळी अध्यात्माच्या रंगात संपूर्ण अर्जुनी-मोरगाव नगरी न्हावून निघाली. ग्रंथपूजन, दीपप्रज्वलन व विणा पूजनाने ७ व्या अ.भा. मराठी संत साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. लहवितकर महाराज म्हणाले, महाराष्टÑ ही संताची भूमि आहे. राष्ट्र योगदानात संताची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. संताचा परतत्वाचा ध्यास, भूतमात्रांच्या हिताशी असणारी बांधिलकी आणि स्वानुभावांना दिलेले महत्व, नैतिकतेचा आग्रह आणि जीवन सन्मुख वृत्ती या सर्व गोष्टी संत साहित्यात देहीभूत झालेल्या आहेत. प्राप्त युगात ज्या युगाला आपण कलियुग म्हणून संबोधतो अशा युगात भक्ती हा एकमेव सर्वांना सुलभ असा अध्यात्म साधना मार्ग होय. पूवर्ई सत्यनिष्ठा व निष्काम कर्मपरता या गोष्टी आचरणात होत्या.प्राप्त युगात या मुल्यांच्या थेट उलटच वर्तन घडताना दिसून येत आहे. विठ्ठल पाटील म्हणाले भारत ही संताची, शुरांची, विरांची भूमी आहे. त्या भूमितील संतांनी दिलेले विचार हे संपूर्ण विश्वातील मानवाच्या कल्याणासाठी आहेत. नितीमूल्ये व जीवनमूल्ये सर्वांनी जोपासली तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार नाही. तत्व व निती मूल्यांशिवाय देश सुरक्षित नाही. संतांचे विचार जुनाट नाही तर ते वर्तमान पिढीत पेरण्यासारखे आहेत. मनुष्यात सुखशांती नांदविण्याचे प्रतिक आहेत. विष हे विष नसते तर अतिविष असते हे समाजाला सांगण्याची गरज आहे. जिथे विज्ञान थांबतो तिथे अध्यात्माची सुरुवात होते. ही मानवतावादी विचार सांगणारी परिषद आहे. त्यांनी वर्तमान पिढीला लागलेले मोबाईल ज्वर व व्यसनाधिनतेवरही प्रहार केला. या कार्यक्रमातून हभप ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी हभप डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर यांचेकडे संमेलनाध्यक्षपदाचे सूत्रे सोपविली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठल पाटील यांनी केले. संचालन डॉ. दिलीप काकडे यांनी केले. पसायदानाने उद्घाटनीय कार्यक्रमाची सांगता झाली.