शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

गद्य-पद्यातून अविष्कृत होणारे परमार्थप्रवण म्हणजे साहित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 23:32 IST

संत ही अध्यात्मक्षेत्रातील अत्यंत उच्च कोटीची अवस्था आहे. सर्व भूताहितरत ज्ञानी, प्रेमळ भक्त हा संत शब्दाचा अर्थ आहे. संत कोणत्या ना कोणत्या धर्मसंप्रदायाचे अनुगृहित होते.

ठळक मुद्देसातव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन

संतोष बुकावन ।ऑनलाईन लोकमतसंत चोखोबानगरी (अर्जुनी मोरगाव) : संत ही अध्यात्मक्षेत्रातील अत्यंत उच्च कोटीची अवस्था आहे. सर्व भूताहितरत ज्ञानी, प्रेमळ भक्त हा संत शब्दाचा अर्थ आहे. संत कोणत्या ना कोणत्या धर्मसंप्रदायाचे अनुगृहित होते. त्यांच्या धर्मसाधनेचा एक भाग म्हणून त्यांनी साहित्यनिर्मिती केली. या संत पुरुषाचे विविध गद्य-पद्य प्रकारातून अविष्कृत होणारे परमार्थप्रवण साहित्य म्हणजे संत साहित्य होय, असे उद्गार ७ व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ह.भ.प. डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर यांनी काढले.वारकरी साहित्य परिषद व डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक जि.प.कनिष्ठ महाविद्यालय संत चोखोबानगरी येथे आयोजित मराठी संत साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.या वेळी मंचावर ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, पुंडलिक फडाचे प्रमुख ह.भ.प. माधव महाराज शिवणकर, ह.भ.प. त्र्यंबकदादा गायकवाड, मंगळवेढेकर, संत कबीर मठाचे प्रमुख ह.भ.प. कबीरबुवा, ह.भ.प. नरहरीबुवा चौधरी, संत एकनाथ महाराजांचे वंशज ह.भ.प. प्रविण गोसावी, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, आयबीएन लोकमतचे राजेंद्र हुंजे, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष हभप विठ्ठल पाटील उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात राष्टÑसंत तुकडोजी महाराजांच्या ‘या भारतात बंधूभाव नित्य वसू दे’ या भजनाने झाली. पंढरपुरचे वारकरी संप्रदायाचे फडकरी सभास्थळी टाळ मृदंगाच्या वाद्यात त्यांचे आगमन होताच त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. याचवेळी अध्यात्माच्या रंगात संपूर्ण अर्जुनी-मोरगाव नगरी न्हावून निघाली. ग्रंथपूजन, दीपप्रज्वलन व विणा पूजनाने ७ व्या अ.भा. मराठी संत साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. लहवितकर महाराज म्हणाले, महाराष्टÑ ही संताची भूमि आहे. राष्ट्र योगदानात संताची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. संताचा परतत्वाचा ध्यास, भूतमात्रांच्या हिताशी असणारी बांधिलकी आणि स्वानुभावांना दिलेले महत्व, नैतिकतेचा आग्रह आणि जीवन सन्मुख वृत्ती या सर्व गोष्टी संत साहित्यात देहीभूत झालेल्या आहेत. प्राप्त युगात ज्या युगाला आपण कलियुग म्हणून संबोधतो अशा युगात भक्ती हा एकमेव सर्वांना सुलभ असा अध्यात्म साधना मार्ग होय. पूवर्ई सत्यनिष्ठा व निष्काम कर्मपरता या गोष्टी आचरणात होत्या.प्राप्त युगात या मुल्यांच्या थेट उलटच वर्तन घडताना दिसून येत आहे. विठ्ठल पाटील म्हणाले भारत ही संताची, शुरांची, विरांची भूमी आहे. त्या भूमितील संतांनी दिलेले विचार हे संपूर्ण विश्वातील मानवाच्या कल्याणासाठी आहेत. नितीमूल्ये व जीवनमूल्ये सर्वांनी जोपासली तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार नाही. तत्व व निती मूल्यांशिवाय देश सुरक्षित नाही. संतांचे विचार जुनाट नाही तर ते वर्तमान पिढीत पेरण्यासारखे आहेत. मनुष्यात सुखशांती नांदविण्याचे प्रतिक आहेत. विष हे विष नसते तर अतिविष असते हे समाजाला सांगण्याची गरज आहे. जिथे विज्ञान थांबतो तिथे अध्यात्माची सुरुवात होते. ही मानवतावादी विचार सांगणारी परिषद आहे. त्यांनी वर्तमान पिढीला लागलेले मोबाईल ज्वर व व्यसनाधिनतेवरही प्रहार केला. या कार्यक्रमातून हभप ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी हभप डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर यांचेकडे संमेलनाध्यक्षपदाचे सूत्रे सोपविली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठल पाटील यांनी केले. संचालन डॉ. दिलीप काकडे यांनी केले. पसायदानाने उद्घाटनीय कार्यक्रमाची सांगता झाली.