शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

खतावरील लिंकिंग सुरूच, कृषी विभागाची डोळेझाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:32 IST

गोंदिया : केंद्र सरकारने खतावरील लिंकिंग पूर्णपणे बंद करण्याचे निर्देश सर्व खत विक्रेत्या कंपन्यांना दिले आहे. ज्या कंपन्या लिंकिंग ...

गोंदिया : केंद्र सरकारने खतावरील लिंकिंग पूर्णपणे बंद करण्याचे निर्देश सर्व खत विक्रेत्या कंपन्यांना दिले आहे. ज्या कंपन्या लिंकिंग करतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. मात्र जिल्ह्यात नव्हे, तर संपूर्ण विदर्भात खत विक्रेत्या कंपन्यांकडून लिंकिंग केले जात आहे. पण या सर्व प्रकाराकडे कृषी विभागाने दुर्लक्ष केल्याने शेतकरी आणि विक्रेते या दोघांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

खरीप हंगामात खताची मागणी मोठ्या प्रमाणात असते. शेतकरी युरिया आणि डीएपी खताची सर्वाधिक मागणी करतात. नेमका याच गोष्टीचा फायदा घेत काही खत विक्रेत्या कंपन्या लिंकिंग सुरु करतात. १०० बॅग युरियासाठी २० बॅगा दुसरे खत घेण्यास भाग पाडतात. आरसीएफ आणि नर्मदा या कंपन्यांकडून कृषी केंद्र संचालकांना युरिया घेण्यासाठी संयुक्त खते घेण्याची सक्ती केली जात आहे. युरियाच्या एका बॅगेची किमत २६६ रुपये असून, त्यावर ८५० रुपयांची संयुक्त खताची बॅग घेण्याची सक्ती केली जात आहे. या कंपन्यांकडून विक्रेत्यांवर खत थोपविले जात असल्याने विक्रेते शेतकऱ्यांना हे खत देत आहे. खताच्या लिंकिंगची तक्रार विक्रेत्यांसह शेतकऱ्यांनीसुध्दा कृषी विभागाकडे केली. मात्र कृषी विभाग कंपन्यांवर कारवाई करणे टाळत त्यांना अभय देण्याचा प्रयत्न करीत आहे. आधीच नापिकी आणि नैसर्गिक संकट आणि शेतीच्या वाढत्या लागवड खर्चामुळे शेतकरी हैराण आहे. त्यातच आता खतावरील लिंकिंगमुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. मागील महिनाभरापासून हा प्रकार सर्रासपणे सुरू असून, लिंकिंग करणाऱ्या खत विक्रेत्या कंपन्यांवर कारवाईबाबत टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे शेतकरी आणि विक्रेतेसुध्दा हैराण आहेत.

.......

तक्रारीनंतर कारवाईची टाळाटाळ का?

युरिया खत घेण्यासाठी संयुक्त खते घेण्याची सक्ती केली जात आहे. याची लेखी तक्रार कृषी विभागाकडे शेतकरी आणि कृषी केंद्र संचालकांनी केली होती. मात्र यानंतरही कारवाई न करण्याचे कृषी विभागाच्या भूमिकेने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.