शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

‘नेट’मुळे लागणार लाखोंचा चुना

By admin | Updated: May 10, 2015 00:01 IST

गतवर्षी डिसेंबर महिन्यात राष्ट्रीय पात्रता, अर्थात नेट परीक्षा घेण्यात आली. त्या परीक्षेचा निकाल अद्यापपर्यंत जाहीर ....

मागील परीक्षेचा निकाल गुलदस्त्यात : पुढील परीक्षेची अधिसूचना जारीगोंदिया : गतवर्षी डिसेंबर महिन्यात राष्ट्रीय पात्रता, अर्थात नेट परीक्षा घेण्यात आली. त्या परीक्षेचा निकाल अद्यापपर्यंत जाहीर करण्यात आलेला नाही. त्यातच पुन्हा जूनमध्ये होणाऱ्या परीक्षेची आॅनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत येत्या १५ मेपर्यंत आहे. मागील परीक्षेचा निकाल अद्याप लागलेला नाही. या परीक्षेत उत्तीर्ण होण्याची खात्री असणाऱ्यांनाही यामुळे नव्याने अर्ज भरून शुल्क भरावे लागत आहे. अशा प्रकारे विद्यार्थ्यांकडून वसुलीच केली जात आहे. ‘यूजीसी’प्रमाणेच ‘सीबीएसई’देखील निकाल जाहीर करण्यात दिरंगाई करीत असल्याने विद्यार्थ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. देशपातळीवर नेट परीक्षा घेतली जाते. गत परीक्षेपासून ‘सीबीएसई’ ही परीक्षा घेत आहे. त्यामुळे पॅटर्नही बदलण्यात आला आहे. ‘सीबीएसई’कडून विद्यार्थ्यांना वेळेत निकाल जाहीर होण्याची आशा होती, परंतु त्यांच्याकडूनही ‘यूजीसी’सारखीच दिरंगाई होत आहे. गतवर्षातील डिसेंबर महिन्यात नेट परीक्षा झालेली आहे. तिचा निकाल अद्यापपर्यंत घोषित झाला नाही. अनेक विद्यार्थ्यांचे पेपर चांगले गेले आहेत. त्यामुळे उत्तीर्ण होण्याची त्यांना पूर्ण खात्री आहे, त्यातच जूनमध्ये होणाऱ्या नेट परीक्षेचे अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. अगोदरच्या परीक्षेतील निकाल पेपर चांगला जाऊनही निकाल कळू शकला नाही. त्यामुळे पैशाची चिंता न करता नुकसान नको म्हणून विद्यार्थी पुन्हा अर्ज करण्यासाठी गर्दी करीत आहे. ‘यूजीसी’कडून निकाल जाहीर करण्यात नेहमीच दिरंगाई होत होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना कायम त्याचा फटका बसत होता. परीक्षेचा निकाल आल्यानंतर पुन्हा नव्याने परीक्षा देण्याची आवश्यकता पडत नाही. त्यामुळे विद्यार्थी दुसऱ्या अभ्यासाक डे वळतात; परंतु गत परीक्षेचा निकालच न आल्याने ते कचाट्यात सापडले आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)शुल्कातही वाढयंदा नेट परीक्षेच्या शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. पूर्वी सर्वसाधारण प्रवर्गासाठी ४५० शुल्क होते. ते आता ६०० रुपये करण्यात आले आहे. ‘ओबीसी’चे शुल्क २२५ वरून ३०० रुपये, तर अनुसूचित जाती-जमातीचे शुल्क ११० वरून १५० रुपये करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो आहे. गेल्या परीक्षेचा निकाल जाहीर न केल्याने बहुतांश विद्यार्थ्यांना हा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.