शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

‘नेट’मुळे लागणार लाखोंचा चुना

By admin | Updated: May 10, 2015 00:01 IST

गतवर्षी डिसेंबर महिन्यात राष्ट्रीय पात्रता, अर्थात नेट परीक्षा घेण्यात आली. त्या परीक्षेचा निकाल अद्यापपर्यंत जाहीर ....

मागील परीक्षेचा निकाल गुलदस्त्यात : पुढील परीक्षेची अधिसूचना जारीगोंदिया : गतवर्षी डिसेंबर महिन्यात राष्ट्रीय पात्रता, अर्थात नेट परीक्षा घेण्यात आली. त्या परीक्षेचा निकाल अद्यापपर्यंत जाहीर करण्यात आलेला नाही. त्यातच पुन्हा जूनमध्ये होणाऱ्या परीक्षेची आॅनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत येत्या १५ मेपर्यंत आहे. मागील परीक्षेचा निकाल अद्याप लागलेला नाही. या परीक्षेत उत्तीर्ण होण्याची खात्री असणाऱ्यांनाही यामुळे नव्याने अर्ज भरून शुल्क भरावे लागत आहे. अशा प्रकारे विद्यार्थ्यांकडून वसुलीच केली जात आहे. ‘यूजीसी’प्रमाणेच ‘सीबीएसई’देखील निकाल जाहीर करण्यात दिरंगाई करीत असल्याने विद्यार्थ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. देशपातळीवर नेट परीक्षा घेतली जाते. गत परीक्षेपासून ‘सीबीएसई’ ही परीक्षा घेत आहे. त्यामुळे पॅटर्नही बदलण्यात आला आहे. ‘सीबीएसई’कडून विद्यार्थ्यांना वेळेत निकाल जाहीर होण्याची आशा होती, परंतु त्यांच्याकडूनही ‘यूजीसी’सारखीच दिरंगाई होत आहे. गतवर्षातील डिसेंबर महिन्यात नेट परीक्षा झालेली आहे. तिचा निकाल अद्यापपर्यंत घोषित झाला नाही. अनेक विद्यार्थ्यांचे पेपर चांगले गेले आहेत. त्यामुळे उत्तीर्ण होण्याची त्यांना पूर्ण खात्री आहे, त्यातच जूनमध्ये होणाऱ्या नेट परीक्षेचे अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. अगोदरच्या परीक्षेतील निकाल पेपर चांगला जाऊनही निकाल कळू शकला नाही. त्यामुळे पैशाची चिंता न करता नुकसान नको म्हणून विद्यार्थी पुन्हा अर्ज करण्यासाठी गर्दी करीत आहे. ‘यूजीसी’कडून निकाल जाहीर करण्यात नेहमीच दिरंगाई होत होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना कायम त्याचा फटका बसत होता. परीक्षेचा निकाल आल्यानंतर पुन्हा नव्याने परीक्षा देण्याची आवश्यकता पडत नाही. त्यामुळे विद्यार्थी दुसऱ्या अभ्यासाक डे वळतात; परंतु गत परीक्षेचा निकालच न आल्याने ते कचाट्यात सापडले आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)शुल्कातही वाढयंदा नेट परीक्षेच्या शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. पूर्वी सर्वसाधारण प्रवर्गासाठी ४५० शुल्क होते. ते आता ६०० रुपये करण्यात आले आहे. ‘ओबीसी’चे शुल्क २२५ वरून ३०० रुपये, तर अनुसूचित जाती-जमातीचे शुल्क ११० वरून १५० रुपये करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो आहे. गेल्या परीक्षेचा निकाल जाहीर न केल्याने बहुतांश विद्यार्थ्यांना हा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.