शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

एकाच आठवड्यात पाईपलाईन झाली ‘लिक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 22:25 IST

चान्ना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाण्याची तीव्र समस्या भेडसावत होती. त्यामुळे बोअरवेलमधून पाईपलाईनच्या माध्यमातून पाणी समस्या सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र आठवडाभरातच पाईप लाईन लिक झाल्याने हा प्रयत्न फसला.

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : चान्ना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाण्याची तीव्र समस्या भेडसावत होती. त्यामुळे बोअरवेलमधून पाईपलाईनच्या माध्यमातून पाणी समस्या सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र आठवडाभरातच पाईप लाईन लिक झाल्याने हा प्रयत्न फसला.पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या लक्षात घेवून आरोग्य विभागाच्या वतीने लाखो रुपये मिळविण्यासाठी तालुक्यातील २ जि.प. सदस्यांनी शर्तीचे प्रयत्न केले. मोठ्या घाई गर्दीने गावातील अंगणवाडी केंद्राजवळच्या बोअरवेल मधून पाईप लाईनच्या माध्यमातून पीएचसीमधील विहिरीमध्ये पाणी टाकण्याचे युद्धस्तरावर काम करुन पाणी टंचाई दूर करण्याचा प्रयत्न केला गेला. वर्तमानपत्रात बातमी देऊन कामाचा श्रेय लाटण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र पाईप लाईन टाकून एक आठवडा होत नाही तर त्या पाईप लाईनला भगदाड पडून पाण्याचा अपव्यय होणे सुरु झाले. लाखो रुपयांचा निधी येवून एकाच आठवड्यात पाईप लाईन लीक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्ण कल्याण समितीच्या अध्यक्ष जि.प. सदस्य कमल पाऊलझगडे, सह अध्यक्ष जि.प. सदस्य किशोर तरोणे आहेत. मागील काही वर्षापासून प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टरांसह इतर कर्मचाऱ्यांनी वाणवा आहे. एका अस्थायी वैद्यकीय अधिकाºयांच्या भरवशावर प्राथमिक आरोग्य केंद्राचा डोलारा सुरु आहे. मागील काही दिवसांपूर्वी एक वैद्यकीय अधिकारी रूजू झाल्याचे सांगण्यात येत असले तरी मात्र त्यांनी कार्यभार सांभाळत रुग्णांना सेवा देण्याची जबाबदारी स्वीकारली नसल्याचे चित्र आहे.कर्मचाºयांची पूर्तता करण्यास दुय्यम स्थान देवून लाखोंचा निधी मिळविण्यात पदाधिकाºयांनी सरसी घेतली. गावातील अंगणवाडी क्रमांक २ मध्ये असलेल्या बोअरवेलमधून अंदाजे ७०० मीटर पाईप लाईन टाकून प्राथमिक आरोग्य केंद्रातील विहिरीमध्ये पाणी टाकण्याचे काम करुन संबंधित पदाधिकाऱ्यांनी पाणी टंचाई सोडविण्याचा प्रयत्न केला. पाणी पुरवठा होऊन आठवडा होत नाही तोच नव्या पाईप लाईनला भगदाड पडून पाण्याचा अपव्यय होत आहे.बिरसू पुराम यांच्या घरासमोरुन पाईप लाईन गेली आहे. त्याच ठिकाणी ती लीक झाली. विद्युत पुरवठा सुरु केल्यावर सर्व पाणी आतमधील पाईपमधून वर येवून रस्त्यावर पसरल्याचे चित्र दिसत आहे. एवढ्या लवकर पाईप लाईन ‘लिक’ झाली कशी, हा प्रश्न पुढे येत आहे. निधी खर्च करुन विहिरीमध्ये पाणी टाकण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरले. दरम्यान पाईपमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असल्याने पाणी टंचाईच्या समस्येत वाढ होण्याची शक्यता आहे.