शहरं
Join us  
Trending Stories
1
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
2
कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
3
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले
4
Bogus Voter: 'त्या' घरात ८०० नव्हे, पाचच सदस्यांचे वास्तव्य; जयंत पाटील यांच्या आरोपात किती सत्यता? काय आढळलं?
5
RCB फॅन्स... सावधान!! विराट कोहली IPL मधून निवृत्त होणार? 'या' घटनेमुळे चर्चांना उधाण
6
खेडेगावातील लोकांसाठी परवडणाऱ्या बाईक्स, किंमत ५५ हजारांपासून सुरू; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
7
Gujarat Cabinet: मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळातील १६ मंत्र्यांनी दिला राजीनामा, गुजरातमध्ये मोठी राजकीय घडामोड
8
"मला सुटी नको, WFH द्या..."; आईच्या अपघातानंतर तरुणीची विनंती, कंपनीचा पुरावे मागत नकार
9
Laxmi Pujan 2025: दिवाळी उंबरठ्यावर, तरी लक्ष्मी पूजेच्या तारखेचा गोंधळ; पंचांग काय सांगतं?
10
अमेरिकेनंतर आता ब्रिटननं दिला भारताला झटका; तेल कंपनीवर लावले आर्थिक निर्बंध, काय होणार परिणाम?
11
Maithili Thakur News: मैथिली ठाकूर यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांचाच विरोध, अलीनगरमध्ये राजकारण का तापलं?
12
"ठाण्यात महापौर भाजपाचा बसेल, आम्ही गाफील नाही; स्वबळावर लढण्याची वेळ आली तर..."
13
बिरोबाचे दर्शन घेऊन निघाले, हल्लेखोरांनी पतीच्या पाठीत सत्तूरने केला वार; पत्नीचे मंगळसूत्र घेऊन पळाले
14
कष्टाचं फळ मिळालंच! स्मृती मानधनानं दुसऱ्यांदा जिंकला आयसीसीचा स्पेशल अवॉर्ड
15
बाजारात तेजीचा डबल धमाका! सेन्सेक्सची ८६२ अंकांची उडी; गुंतवणूकदारांनी कमावले २.०९ लाख कोटी
16
मोठा नफा कमावूनही कंपनीचा धक्कादायक निर्णय! तब्बल १६,००० कर्मचाऱ्यांना देणार नारळ
17
आशिया कप स्पर्धेत कार जिंकली; आता स्फोटक बॅटर अभिषेक शर्माला ICC कडून मिळालं मोठं बक्षीस
18
पवार कुटुंब यंदा दिवाळी साजरी करणार नाही; सुप्रिया ताईंची सोशल मीडियावर पोस्ट, कारण काय?
19
Diwali Rain Alert: यंदाच्या दिवाळीत गुलाबी थंडी नाही तर पाऊस बरसणार, मुंबईसह महाराष्ट्रात हवामान असं असणार
20
कष्टाचं फळ! ५० रुपये मजुरी, घरोघरी जाऊन विकली भाजी, शिक्षण सोडलं अन् आता RAS ऑफिसर

एकाच आठवड्यात पाईपलाईन झाली ‘लिक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 22:25 IST

चान्ना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाण्याची तीव्र समस्या भेडसावत होती. त्यामुळे बोअरवेलमधून पाईपलाईनच्या माध्यमातून पाणी समस्या सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र आठवडाभरातच पाईप लाईन लिक झाल्याने हा प्रयत्न फसला.

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : चान्ना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाण्याची तीव्र समस्या भेडसावत होती. त्यामुळे बोअरवेलमधून पाईपलाईनच्या माध्यमातून पाणी समस्या सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र आठवडाभरातच पाईप लाईन लिक झाल्याने हा प्रयत्न फसला.पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या लक्षात घेवून आरोग्य विभागाच्या वतीने लाखो रुपये मिळविण्यासाठी तालुक्यातील २ जि.प. सदस्यांनी शर्तीचे प्रयत्न केले. मोठ्या घाई गर्दीने गावातील अंगणवाडी केंद्राजवळच्या बोअरवेल मधून पाईप लाईनच्या माध्यमातून पीएचसीमधील विहिरीमध्ये पाणी टाकण्याचे युद्धस्तरावर काम करुन पाणी टंचाई दूर करण्याचा प्रयत्न केला गेला. वर्तमानपत्रात बातमी देऊन कामाचा श्रेय लाटण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र पाईप लाईन टाकून एक आठवडा होत नाही तर त्या पाईप लाईनला भगदाड पडून पाण्याचा अपव्यय होणे सुरु झाले. लाखो रुपयांचा निधी येवून एकाच आठवड्यात पाईप लाईन लीक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्ण कल्याण समितीच्या अध्यक्ष जि.प. सदस्य कमल पाऊलझगडे, सह अध्यक्ष जि.प. सदस्य किशोर तरोणे आहेत. मागील काही वर्षापासून प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टरांसह इतर कर्मचाऱ्यांनी वाणवा आहे. एका अस्थायी वैद्यकीय अधिकाºयांच्या भरवशावर प्राथमिक आरोग्य केंद्राचा डोलारा सुरु आहे. मागील काही दिवसांपूर्वी एक वैद्यकीय अधिकारी रूजू झाल्याचे सांगण्यात येत असले तरी मात्र त्यांनी कार्यभार सांभाळत रुग्णांना सेवा देण्याची जबाबदारी स्वीकारली नसल्याचे चित्र आहे.कर्मचाºयांची पूर्तता करण्यास दुय्यम स्थान देवून लाखोंचा निधी मिळविण्यात पदाधिकाºयांनी सरसी घेतली. गावातील अंगणवाडी क्रमांक २ मध्ये असलेल्या बोअरवेलमधून अंदाजे ७०० मीटर पाईप लाईन टाकून प्राथमिक आरोग्य केंद्रातील विहिरीमध्ये पाणी टाकण्याचे काम करुन संबंधित पदाधिकाऱ्यांनी पाणी टंचाई सोडविण्याचा प्रयत्न केला. पाणी पुरवठा होऊन आठवडा होत नाही तोच नव्या पाईप लाईनला भगदाड पडून पाण्याचा अपव्यय होत आहे.बिरसू पुराम यांच्या घरासमोरुन पाईप लाईन गेली आहे. त्याच ठिकाणी ती लीक झाली. विद्युत पुरवठा सुरु केल्यावर सर्व पाणी आतमधील पाईपमधून वर येवून रस्त्यावर पसरल्याचे चित्र दिसत आहे. एवढ्या लवकर पाईप लाईन ‘लिक’ झाली कशी, हा प्रश्न पुढे येत आहे. निधी खर्च करुन विहिरीमध्ये पाणी टाकण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरले. दरम्यान पाईपमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असल्याने पाणी टंचाईच्या समस्येत वाढ होण्याची शक्यता आहे.