शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
5
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
6
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
7
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
8
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
9
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
10
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
11
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
12
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
13
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
14
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
15
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
16
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
17
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
18
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
19
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
20
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हलक्या धानाला बसला फटका

By admin | Updated: September 27, 2016 02:44 IST

परतीच्या पावसाने जिल्ह्यातील काही भागाला चांगले झोडपल्यामुळे दाणे भरत आलेल्या हलक्या धानाला फटका

शेतकरी पुन्हा हवालदिल : लवकर निघणाऱ्या वाणाचे उत्पन्न घटणार? देवानंद शहारे ल्ल गोंदिया परतीच्या पावसाने जिल्ह्यातील काही भागाला चांगले झोडपल्यामुळे दाणे भरत आलेल्या हलक्या धानाला फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हलक्या जातीच्या धानाला पाऊस नुकसानदायक असताना जिल्ह्यातील काही भागात दमदार पाऊस आला. त्यामुळे उताऱ्यात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. २० सप्टेंबरनंतर आलेल्या पावसामुळे हलक्या धानाला मोठे नुकसान होईल, असे शेतकरी सांगत आहेत. तर दुसरीकडे हलका धान भरलेला नसल्याने त्याचे काहीही नुकसान होणार नाही, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. यात प्रत्यक्ष शेतावर राबणारा शेतकरी व कार्यालयातून अंदाज बांधणारे अधिकारी यांच्या सांगण्यात मात्र मोठीच विसंगती दिसून येत आहे. पण भारी धानाला या पावसामुळे काहीही नुकसान नसून फायदाच होणार असल्यामुळे शेतकऱ्यांच्या एका डोळ्यात हसू, तर दुसऱ्या डोळ्यात आसू अशी स्थिती आहे. सध्याचे हवामान ढगाळ व थंड वातावरण असून समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यात १०० टक्के रोवणी पूर्ण झालेली आहे. जून, जुलै, आॅगस्ट व सप्टेंबर महिन्याचे सरासरी पर्जन्य १२७४.७ मिमी असून, २० सप्टेंबर २०१६ अखेर ९६२.७ मिमी पाऊस झालेला आहे. तो सरासरीच्या ७५.५ टक्के आहे. यावर्षी १७९४५.५ हेक्कर क्षेत्रावर भात नर्सरी टाकण्यात आली. त्यानुसार एकूण एक लाख ८८ हजार ६४२.६० हेक्टर क्षेत्रावर भातपिकाची लागवड झालेली आहे. ती सरासरीच्या १०६ टक्के आहे. भात पिकाची रोवणी पूर्ण झालेली आहे. मात्र धानपिकावरील रोग व किडी यामुळे शेतकरी वैतागून गेले आहे. २० सप्टेंबरपूर्वी धानपिकावर अनेक ठिकाणी कीड व अळी लागली होती. मात्र त्या कालावधीत हलक्या धानाला एका पावसाची गरज होती व पाऊसही आले. त्यामुळे कीड व अळ्या धुवून निघाल्याने त्यांचे प्रमाण घटले होते व शेतकरी सुखावले होते. मात्र आताच्या पावसाने मोठे नुकसान होण्याची शक्यता शेतकरी बोलून दाखवित आहेत. ८० टक्के या प्रमाणात भातपिकावर किडी व ०.०९ टक्के या अत्यल्प प्रमाणात पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव सध्या दिसून येत असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी) पीक विम्याच्या लाभासाठी त्वरित कळवा ४ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे, त्यांच्या पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यास तशी माहिती त्वरित कृषी किंवा महसूल विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना द्यावी. त्यांच्याकडून त्वरित पंचनामा करून वरिष्ठांना सादर करण्यात यावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे. जिल्ह्यात नापेर राहिलेले क्षेत्र ४कृषी विभागाच्या माहितीनुसार, अर्जुनी-मोरगाव तालुक्यामधील १६ गावांतील ५८.३८ हेक्टर (शेतकरी संख्या १२१) व तिरोडा तालुक्यात ३० गावांचे ७०८.३३ हेक्टर क्षेत्र नापेर राहिलेले आहे. जिल्ह्याच्या एकूण ४६ गावांचे ७६६.७१ हेक्टर क्षेत्र नापेर राहिलेले आहे. लवकर निघणारे वाण गर्भ व लोंबी निघण्याच्या अवस्थेत असून मध्यम व उशिरा येणारे वाण फुटवे व वाढीच्या अवस्थेत आहेत. नत्राचा दुसरा हप्ता देणे सुरू असून बांधीतील पाण्याची पातळी २.५ सेंमी इतकी ठेवून निंदणाचे काम सुरू आहे. तूर वाढीच्या तर तीळ फुले धरण्याच्या अवस्थेत ४ तूर : बंधाऱ्याच्याच्या तूर पिकाची ६९५४.१ हेक्टर क्षेत्रावर लागवड पूर्ण झालेली आहे. ती सर्वसाधारण क्षेत्राच्या ११५ टक्के झालेली आहे. सध्या तूरपीक वाढीच्या अवस्थेत आहे. ४तीळ : तिळाचे सर्वसाधारण क्षेत्र १२७६ हेक्टर असून८५३.६ हेक्टर क्षेत्रावर लागवड पूर्ण झालेली आहे. ती सर्वसाधारण क्षेत्राच्या ६७ टक्के आहे. सध्या तीळ फुले धरण्याच्या अवस्थेत आहे. १६७५ किलो उताऱ्याचा अंदाज ४जिल्ह्यात बागायती व जिरायती मिळून सरासरी १६७५ किलो प्रतिहेक्टर धानाचा उतारा होईल, असा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने कृषी आयुक्तालयास मागील महिन्यात पाठविले होते. मात्र २४, २५ व २६ सप्टेंबर रोजी आलेल्या पावसाने हलक्या जातीचे उत्पन्न कमी होणार असल्याने सदर उताऱ्यात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक ठिकाणी अतिवृष्टी व दमदार पावसाने पिकांना झोपवून टाकले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडून पुन्हा नाराजीचे सूर ऐकू येत आहेत.