शहरं
Join us  
Trending Stories
1
'नोबेल समितीने शांती निवडण्याऐवजी राजकारण केलं', ट्रम्प यांना डावलताच 'व्हाईट हाऊस'चा थयथयाट
2
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
3
आशिया कपची ट्रॉफी भारताला मिळूच देणार नाही, मोहसीन नक्वींनी आता खेळली अशी चाल 
4
‘मला तुझ्याकडे बोलावून घे’, विरहाने व्याकूळ झालेल्या शेफाली जरीवालाच्या पतीची भावूक पोस्ट, चाहते चिंतित  
5
नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप
6
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
7
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
8
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
9
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
10
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
11
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?
12
आठ युद्धं थांबवली तरी पुरस्कार समितीने डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल का नाकारला? समोर येताहेत ही कारणं
13
"मुंबईतील भूखंड उद्योगपतींना कवडीमोल दराने देण्याचा महायुती सरकारचा सपाटा, तर सर्वसामन्यांच्या घरांकडे दुर्लक्ष’’, काँग्रेसचा आरोप
14
सात युद्धं थांबवल्याच्या 'बढाया' मारणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना ठेंगा; 'शांततेचं नोबेल' लोकशाहीवादी मारिया मचाडो यांना
15
IND vs WI 2nd Test Day 1 Stumps: 'ओपनिंग डे'ला टीम इंडियाचा 'यशस्वी' शो! साई सुदर्शनही चमकला; पण...
16
'बदला घेणारच'; भैय्या गायकवाडची शिवीगाळ करत धमकी, टोलनाक्यावर बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
17
Bobby Darling : "मी परत आलेय, मला एक चांगला रोल द्या", बॉबी डार्लिंगची विनंती, अवस्था पाहून बसेल मोठा धक्का
18
उल्हासनगरात धोबीघाट रस्त्यावर ६ महिन्यांपासून जलवाहिनी गळती; हजारो लिटर पाणी वाया!
19
Astro Tips: व्यवसायात भरभराट हवीय? फक्त तीन शनिवार करा पिवळ्या मोहरीचा प्रभावी उपाय!
20
शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? सलग दुसऱ्या महिन्यात म्युच्युअल फंडातील पैशांचा ओघ घटला

हलक्या धानाला बसला फटका

By admin | Updated: September 27, 2016 02:44 IST

परतीच्या पावसाने जिल्ह्यातील काही भागाला चांगले झोडपल्यामुळे दाणे भरत आलेल्या हलक्या धानाला फटका

शेतकरी पुन्हा हवालदिल : लवकर निघणाऱ्या वाणाचे उत्पन्न घटणार? देवानंद शहारे ल्ल गोंदिया परतीच्या पावसाने जिल्ह्यातील काही भागाला चांगले झोडपल्यामुळे दाणे भरत आलेल्या हलक्या धानाला फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हलक्या जातीच्या धानाला पाऊस नुकसानदायक असताना जिल्ह्यातील काही भागात दमदार पाऊस आला. त्यामुळे उताऱ्यात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. २० सप्टेंबरनंतर आलेल्या पावसामुळे हलक्या धानाला मोठे नुकसान होईल, असे शेतकरी सांगत आहेत. तर दुसरीकडे हलका धान भरलेला नसल्याने त्याचे काहीही नुकसान होणार नाही, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. यात प्रत्यक्ष शेतावर राबणारा शेतकरी व कार्यालयातून अंदाज बांधणारे अधिकारी यांच्या सांगण्यात मात्र मोठीच विसंगती दिसून येत आहे. पण भारी धानाला या पावसामुळे काहीही नुकसान नसून फायदाच होणार असल्यामुळे शेतकऱ्यांच्या एका डोळ्यात हसू, तर दुसऱ्या डोळ्यात आसू अशी स्थिती आहे. सध्याचे हवामान ढगाळ व थंड वातावरण असून समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यात १०० टक्के रोवणी पूर्ण झालेली आहे. जून, जुलै, आॅगस्ट व सप्टेंबर महिन्याचे सरासरी पर्जन्य १२७४.७ मिमी असून, २० सप्टेंबर २०१६ अखेर ९६२.७ मिमी पाऊस झालेला आहे. तो सरासरीच्या ७५.५ टक्के आहे. यावर्षी १७९४५.५ हेक्कर क्षेत्रावर भात नर्सरी टाकण्यात आली. त्यानुसार एकूण एक लाख ८८ हजार ६४२.६० हेक्टर क्षेत्रावर भातपिकाची लागवड झालेली आहे. ती सरासरीच्या १०६ टक्के आहे. भात पिकाची रोवणी पूर्ण झालेली आहे. मात्र धानपिकावरील रोग व किडी यामुळे शेतकरी वैतागून गेले आहे. २० सप्टेंबरपूर्वी धानपिकावर अनेक ठिकाणी कीड व अळी लागली होती. मात्र त्या कालावधीत हलक्या धानाला एका पावसाची गरज होती व पाऊसही आले. त्यामुळे कीड व अळ्या धुवून निघाल्याने त्यांचे प्रमाण घटले होते व शेतकरी सुखावले होते. मात्र आताच्या पावसाने मोठे नुकसान होण्याची शक्यता शेतकरी बोलून दाखवित आहेत. ८० टक्के या प्रमाणात भातपिकावर किडी व ०.०९ टक्के या अत्यल्प प्रमाणात पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव सध्या दिसून येत असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी) पीक विम्याच्या लाभासाठी त्वरित कळवा ४ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे, त्यांच्या पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यास तशी माहिती त्वरित कृषी किंवा महसूल विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना द्यावी. त्यांच्याकडून त्वरित पंचनामा करून वरिष्ठांना सादर करण्यात यावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे. जिल्ह्यात नापेर राहिलेले क्षेत्र ४कृषी विभागाच्या माहितीनुसार, अर्जुनी-मोरगाव तालुक्यामधील १६ गावांतील ५८.३८ हेक्टर (शेतकरी संख्या १२१) व तिरोडा तालुक्यात ३० गावांचे ७०८.३३ हेक्टर क्षेत्र नापेर राहिलेले आहे. जिल्ह्याच्या एकूण ४६ गावांचे ७६६.७१ हेक्टर क्षेत्र नापेर राहिलेले आहे. लवकर निघणारे वाण गर्भ व लोंबी निघण्याच्या अवस्थेत असून मध्यम व उशिरा येणारे वाण फुटवे व वाढीच्या अवस्थेत आहेत. नत्राचा दुसरा हप्ता देणे सुरू असून बांधीतील पाण्याची पातळी २.५ सेंमी इतकी ठेवून निंदणाचे काम सुरू आहे. तूर वाढीच्या तर तीळ फुले धरण्याच्या अवस्थेत ४ तूर : बंधाऱ्याच्याच्या तूर पिकाची ६९५४.१ हेक्टर क्षेत्रावर लागवड पूर्ण झालेली आहे. ती सर्वसाधारण क्षेत्राच्या ११५ टक्के झालेली आहे. सध्या तूरपीक वाढीच्या अवस्थेत आहे. ४तीळ : तिळाचे सर्वसाधारण क्षेत्र १२७६ हेक्टर असून८५३.६ हेक्टर क्षेत्रावर लागवड पूर्ण झालेली आहे. ती सर्वसाधारण क्षेत्राच्या ६७ टक्के आहे. सध्या तीळ फुले धरण्याच्या अवस्थेत आहे. १६७५ किलो उताऱ्याचा अंदाज ४जिल्ह्यात बागायती व जिरायती मिळून सरासरी १६७५ किलो प्रतिहेक्टर धानाचा उतारा होईल, असा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने कृषी आयुक्तालयास मागील महिन्यात पाठविले होते. मात्र २४, २५ व २६ सप्टेंबर रोजी आलेल्या पावसाने हलक्या जातीचे उत्पन्न कमी होणार असल्याने सदर उताऱ्यात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक ठिकाणी अतिवृष्टी व दमदार पावसाने पिकांना झोपवून टाकले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडून पुन्हा नाराजीचे सूर ऐकू येत आहेत.