शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

आंभोऱ्याजवळ कालवा झाला लिकेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 21:29 IST

शहरातील पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी पुजारीटोला धरणाचे पाणी कालव्याद्वारे डांर्गोली पाणी पुरवठा योजनेपर्यंत पोहचविले जात आहे. मात्र सालेकसा तालुक्यातील आंभोरा गावाजवळ कालवा लिक झाल्याने पुजारीटोला धरणाचे गेट गुरूवारी बंद करण्यात आले.

ठळक मुद्देपाणीटंचाईची समस्या तीव्र : शहरवासीयांच्या वाट्याला आठ दिवसांची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी पुजारीटोला धरणाचे पाणी कालव्याद्वारे डांर्गोली पाणी पुरवठा योजनेपर्यंत पोहचविले जात आहे. मात्र सालेकसा तालुक्यातील आंभोरा गावाजवळ कालवा लिक झाल्याने पुजारीटोला धरणाचे गेट गुरूवारी बंद करण्यात आले. त्यामुळे शहवासीयांना पुन्हा आठ दिवस पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातंर्गत डांर्गोली येथे वैनगंगा नदीच्या पात्रालगत उभारलेल्या पाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा केला जातो. मात्र यावर्षी वैनगंगा नदीचे पात्र मार्च महिन्यातच कोरडे पडल्याने त्याचा पाणीपुरवठा योजनेवर परिणाम झाला. मागील महिनाभरापासून शहरवासीयांना केवळ दिवसातून एकच वेळ पाणी पुरवठा केला जातो. मात्र मागील तीन चार दिवसांपासून तो देखील बंद झाला. त्यामुळे शहरात पाणीटंचाईची समस्या गंभीर झाली आहे. पाणी टंचाईच्या समस्येवर उशिरा जागे झालेल्या जिल्हा प्रशासन आणि मजीप्राने पुजारीटोला धरणातून पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला.यासाठी पुजारीटोला धरणाचे पाणी कालव्याव्दारे डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत पोहचविण्याचे काम सुरू केले. मंगळवारी (दि.१०) पुजारीटोला धरणाचे पाणी सोडण्यात आले. मात्र हे पाणी धरणापासून ४० कि.मी.अंतरावर असलेल्या आंभोरा गावाजवळ पोहचल्यानंतर कालवा लिकेज झाल्यामुळे दुसरीकडे वळले. तसेच पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय झाला. त्यामुळे गुरूवारी (दि.१२) पुजारीटोला धरणाचे गेट बंद करुन कालवा दुरूस्तीचे काम सिंचन विभागाने सुरू केले.कालव्याला चांगले मोठे भगदाड पडले असून दुरूस्तीचे काम दोन तीन दिवस चालण्याची शक्यता आहे. त्यामुळे डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत पाणी पोहचण्यास किमान आठ दहा दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. परिणामी शहरवासीयांना पुन्हा आठ ते दहा दिवस पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.सिंचन विभागाकडे बोटआंभोरा गावाजवळ कालवा लिकेज झाल्यानंतर दुरूस्तीची जबाबदारी सिंचन विभागाकडे सोपविण्यात आली. कालव्याची दुरूस्ती किती दिवसात होईल आणि पाणी सोडण्यात येईल अशी विचारणा मजीप्राच्या अधिकाºयांना केली असता त्यांनी सिंचन विभागाकडे बोट दाखविले. तर सिंचन विभागाच्या अभियंत्याला यासंदर्भात विचारले असता त्यांनी यावर बोलणे टाळले. त्यामुळे कालवा लिकेजची समस्या गंभीर असल्याची माहिती आहे.ढिसाळ नियोजनाचा फटकाशहरात यंदा पाणी टंचाई निर्माण होणार ही बाब महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा प्रशासनाला चांगलीच ठाऊक होती. मात्र जेव्हा शहराचा पाणी पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला तेव्हाच या दोन्ही विभागाने पुजारीटोला धरणातून पाणी आणण्यासाठी धडपड सुरू केली. पुजारीटोला धरण ते डांगोर्ली पाणी पुरवठा योजना हे ९० कि.मी.चे अंतर असून ज्या कालव्याव्दारे हे पाणी आणले जाणार होते त्या कालव्यांची स्थिती योग्य आहे का? याची सुध्दा पाहणी करणे या दोन्ही विभागांना गरजचे वाटले नाही. आंभोरा गावाजवळ कालवा लिक झाल्यानंतर या विभागाला पाहणी करण्याची जाग आली. एकंदरीत या दोन्ही विभागांच्या ढिसाळ नियोजनाचा फटका शहरवासीयांना बसत आहे.मजीप्रा म्हणते शहरात पाणीटंचाई नाहीशहरातील जवळपास सर्वच भागात पाणी पुरवठा होत नसल्याची नागरिकांची ओरड आहे. तसेच सकाळच्या सुमारास सार्वजनिक विहिरी आणि बोअरवेलवर पाणी भरण्यासाठी महिलांची गर्दी पाहल्यानंतर शहरातील पाणी टंचाईची तीव्रता जाणविते. मात्र यासंदर्भात मजीप्राचे उपविभागीय अभियंता राजेंद्र मडके यांच्याशी संपर्क साधला असता शहरातील सर्वच भागात सुरळीतपणे पाणी पुरवठा होत असल्याचा दावा केला.