शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
3
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
4
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
5
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
6
रक्षा बंधन २०२५: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
7
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
8
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
9
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
10
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
11
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
12
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
13
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
14
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
15
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
16
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
18
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
19
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
20
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान

आंभोऱ्याजवळ कालवा झाला लिकेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 21:29 IST

शहरातील पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी पुजारीटोला धरणाचे पाणी कालव्याद्वारे डांर्गोली पाणी पुरवठा योजनेपर्यंत पोहचविले जात आहे. मात्र सालेकसा तालुक्यातील आंभोरा गावाजवळ कालवा लिक झाल्याने पुजारीटोला धरणाचे गेट गुरूवारी बंद करण्यात आले.

ठळक मुद्देपाणीटंचाईची समस्या तीव्र : शहरवासीयांच्या वाट्याला आठ दिवसांची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी पुजारीटोला धरणाचे पाणी कालव्याद्वारे डांर्गोली पाणी पुरवठा योजनेपर्यंत पोहचविले जात आहे. मात्र सालेकसा तालुक्यातील आंभोरा गावाजवळ कालवा लिक झाल्याने पुजारीटोला धरणाचे गेट गुरूवारी बंद करण्यात आले. त्यामुळे शहवासीयांना पुन्हा आठ दिवस पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातंर्गत डांर्गोली येथे वैनगंगा नदीच्या पात्रालगत उभारलेल्या पाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा केला जातो. मात्र यावर्षी वैनगंगा नदीचे पात्र मार्च महिन्यातच कोरडे पडल्याने त्याचा पाणीपुरवठा योजनेवर परिणाम झाला. मागील महिनाभरापासून शहरवासीयांना केवळ दिवसातून एकच वेळ पाणी पुरवठा केला जातो. मात्र मागील तीन चार दिवसांपासून तो देखील बंद झाला. त्यामुळे शहरात पाणीटंचाईची समस्या गंभीर झाली आहे. पाणी टंचाईच्या समस्येवर उशिरा जागे झालेल्या जिल्हा प्रशासन आणि मजीप्राने पुजारीटोला धरणातून पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला.यासाठी पुजारीटोला धरणाचे पाणी कालव्याव्दारे डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत पोहचविण्याचे काम सुरू केले. मंगळवारी (दि.१०) पुजारीटोला धरणाचे पाणी सोडण्यात आले. मात्र हे पाणी धरणापासून ४० कि.मी.अंतरावर असलेल्या आंभोरा गावाजवळ पोहचल्यानंतर कालवा लिकेज झाल्यामुळे दुसरीकडे वळले. तसेच पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय झाला. त्यामुळे गुरूवारी (दि.१२) पुजारीटोला धरणाचे गेट बंद करुन कालवा दुरूस्तीचे काम सिंचन विभागाने सुरू केले.कालव्याला चांगले मोठे भगदाड पडले असून दुरूस्तीचे काम दोन तीन दिवस चालण्याची शक्यता आहे. त्यामुळे डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत पाणी पोहचण्यास किमान आठ दहा दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. परिणामी शहरवासीयांना पुन्हा आठ ते दहा दिवस पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.सिंचन विभागाकडे बोटआंभोरा गावाजवळ कालवा लिकेज झाल्यानंतर दुरूस्तीची जबाबदारी सिंचन विभागाकडे सोपविण्यात आली. कालव्याची दुरूस्ती किती दिवसात होईल आणि पाणी सोडण्यात येईल अशी विचारणा मजीप्राच्या अधिकाºयांना केली असता त्यांनी सिंचन विभागाकडे बोट दाखविले. तर सिंचन विभागाच्या अभियंत्याला यासंदर्भात विचारले असता त्यांनी यावर बोलणे टाळले. त्यामुळे कालवा लिकेजची समस्या गंभीर असल्याची माहिती आहे.ढिसाळ नियोजनाचा फटकाशहरात यंदा पाणी टंचाई निर्माण होणार ही बाब महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा प्रशासनाला चांगलीच ठाऊक होती. मात्र जेव्हा शहराचा पाणी पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला तेव्हाच या दोन्ही विभागाने पुजारीटोला धरणातून पाणी आणण्यासाठी धडपड सुरू केली. पुजारीटोला धरण ते डांगोर्ली पाणी पुरवठा योजना हे ९० कि.मी.चे अंतर असून ज्या कालव्याव्दारे हे पाणी आणले जाणार होते त्या कालव्यांची स्थिती योग्य आहे का? याची सुध्दा पाहणी करणे या दोन्ही विभागांना गरजचे वाटले नाही. आंभोरा गावाजवळ कालवा लिक झाल्यानंतर या विभागाला पाहणी करण्याची जाग आली. एकंदरीत या दोन्ही विभागांच्या ढिसाळ नियोजनाचा फटका शहरवासीयांना बसत आहे.मजीप्रा म्हणते शहरात पाणीटंचाई नाहीशहरातील जवळपास सर्वच भागात पाणी पुरवठा होत नसल्याची नागरिकांची ओरड आहे. तसेच सकाळच्या सुमारास सार्वजनिक विहिरी आणि बोअरवेलवर पाणी भरण्यासाठी महिलांची गर्दी पाहल्यानंतर शहरातील पाणी टंचाईची तीव्रता जाणविते. मात्र यासंदर्भात मजीप्राचे उपविभागीय अभियंता राजेंद्र मडके यांच्याशी संपर्क साधला असता शहरातील सर्वच भागात सुरळीतपणे पाणी पुरवठा होत असल्याचा दावा केला.