शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
3
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
4
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
5
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
6
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
7
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
8
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
9
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
10
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
11
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
12
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
13
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
14
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
15
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
16
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
17
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
18
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
19
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
20
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
Daily Top 2Weekly Top 5

आंभोऱ्याजवळ कालवा झाला लिकेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 21:29 IST

शहरातील पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी पुजारीटोला धरणाचे पाणी कालव्याद्वारे डांर्गोली पाणी पुरवठा योजनेपर्यंत पोहचविले जात आहे. मात्र सालेकसा तालुक्यातील आंभोरा गावाजवळ कालवा लिक झाल्याने पुजारीटोला धरणाचे गेट गुरूवारी बंद करण्यात आले.

ठळक मुद्देपाणीटंचाईची समस्या तीव्र : शहरवासीयांच्या वाट्याला आठ दिवसांची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी पुजारीटोला धरणाचे पाणी कालव्याद्वारे डांर्गोली पाणी पुरवठा योजनेपर्यंत पोहचविले जात आहे. मात्र सालेकसा तालुक्यातील आंभोरा गावाजवळ कालवा लिक झाल्याने पुजारीटोला धरणाचे गेट गुरूवारी बंद करण्यात आले. त्यामुळे शहवासीयांना पुन्हा आठ दिवस पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातंर्गत डांर्गोली येथे वैनगंगा नदीच्या पात्रालगत उभारलेल्या पाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा केला जातो. मात्र यावर्षी वैनगंगा नदीचे पात्र मार्च महिन्यातच कोरडे पडल्याने त्याचा पाणीपुरवठा योजनेवर परिणाम झाला. मागील महिनाभरापासून शहरवासीयांना केवळ दिवसातून एकच वेळ पाणी पुरवठा केला जातो. मात्र मागील तीन चार दिवसांपासून तो देखील बंद झाला. त्यामुळे शहरात पाणीटंचाईची समस्या गंभीर झाली आहे. पाणी टंचाईच्या समस्येवर उशिरा जागे झालेल्या जिल्हा प्रशासन आणि मजीप्राने पुजारीटोला धरणातून पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला.यासाठी पुजारीटोला धरणाचे पाणी कालव्याव्दारे डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत पोहचविण्याचे काम सुरू केले. मंगळवारी (दि.१०) पुजारीटोला धरणाचे पाणी सोडण्यात आले. मात्र हे पाणी धरणापासून ४० कि.मी.अंतरावर असलेल्या आंभोरा गावाजवळ पोहचल्यानंतर कालवा लिकेज झाल्यामुळे दुसरीकडे वळले. तसेच पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय झाला. त्यामुळे गुरूवारी (दि.१२) पुजारीटोला धरणाचे गेट बंद करुन कालवा दुरूस्तीचे काम सिंचन विभागाने सुरू केले.कालव्याला चांगले मोठे भगदाड पडले असून दुरूस्तीचे काम दोन तीन दिवस चालण्याची शक्यता आहे. त्यामुळे डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत पाणी पोहचण्यास किमान आठ दहा दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. परिणामी शहरवासीयांना पुन्हा आठ ते दहा दिवस पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.सिंचन विभागाकडे बोटआंभोरा गावाजवळ कालवा लिकेज झाल्यानंतर दुरूस्तीची जबाबदारी सिंचन विभागाकडे सोपविण्यात आली. कालव्याची दुरूस्ती किती दिवसात होईल आणि पाणी सोडण्यात येईल अशी विचारणा मजीप्राच्या अधिकाºयांना केली असता त्यांनी सिंचन विभागाकडे बोट दाखविले. तर सिंचन विभागाच्या अभियंत्याला यासंदर्भात विचारले असता त्यांनी यावर बोलणे टाळले. त्यामुळे कालवा लिकेजची समस्या गंभीर असल्याची माहिती आहे.ढिसाळ नियोजनाचा फटकाशहरात यंदा पाणी टंचाई निर्माण होणार ही बाब महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा प्रशासनाला चांगलीच ठाऊक होती. मात्र जेव्हा शहराचा पाणी पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला तेव्हाच या दोन्ही विभागाने पुजारीटोला धरणातून पाणी आणण्यासाठी धडपड सुरू केली. पुजारीटोला धरण ते डांगोर्ली पाणी पुरवठा योजना हे ९० कि.मी.चे अंतर असून ज्या कालव्याव्दारे हे पाणी आणले जाणार होते त्या कालव्यांची स्थिती योग्य आहे का? याची सुध्दा पाहणी करणे या दोन्ही विभागांना गरजचे वाटले नाही. आंभोरा गावाजवळ कालवा लिक झाल्यानंतर या विभागाला पाहणी करण्याची जाग आली. एकंदरीत या दोन्ही विभागांच्या ढिसाळ नियोजनाचा फटका शहरवासीयांना बसत आहे.मजीप्रा म्हणते शहरात पाणीटंचाई नाहीशहरातील जवळपास सर्वच भागात पाणी पुरवठा होत नसल्याची नागरिकांची ओरड आहे. तसेच सकाळच्या सुमारास सार्वजनिक विहिरी आणि बोअरवेलवर पाणी भरण्यासाठी महिलांची गर्दी पाहल्यानंतर शहरातील पाणी टंचाईची तीव्रता जाणविते. मात्र यासंदर्भात मजीप्राचे उपविभागीय अभियंता राजेंद्र मडके यांच्याशी संपर्क साधला असता शहरातील सर्वच भागात सुरळीतपणे पाणी पुरवठा होत असल्याचा दावा केला.