शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं"
3
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन करणार नाही - उद्धव ठाकरे
4
जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
5
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
6
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
7
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
8
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
9
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
10
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
11
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
12
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
13
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
14
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
15
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
16
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
17
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
18
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
19
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
20
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे

रूपया न देता ‘सर्वोत्तम घर बांधकाम’ मोहिमेचे पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 06:00 IST

सर्वांना हक्काचे पक्के घर या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी देशात प्रधानमंत्री आवास योजना शहर व ग्रामीण राबविली जात आहे. शहरात नगर परिषदेच्या माध्यमातून ही योजना राबविली जात असून योजनेचा संपूर्ण कारभार नगर परिषद करीत आहे. चार घटकांतून राबविल्या जात असलेल्या या योजनेंतर्गत गोंदिया नगर परिषदेला सात हजार २२० आवासांचे टार्गेट देण्यात आले आहे.

ठळक मुद्देशासनाकडून पाठविण्यात आले पत्र : पत्रामुळे लाभार्थी संभ्रमात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : घरकुल बांधकामासाठी शासनाकडून एक रूपयाही मिळाला नसताना प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) विभागाकडून लाभार्थ्यांना ‘सर्वोत्तम घर बांधकाम’ मोहिमेचे पत्र पाठविले जात आहे. विशेष म्हणजे, घरकुल मंजूर झालेल्यांच्या यादीतील सर्वांनाच हे पत्र पाठविले जात असून यातून शासन लाभार्थ्यांची एकप्रकारे थट्टाच करीत असल्याच्या प्रतिक्रिया लाभार्थी व्यक्त करीत आहेत. शिवाय या पत्रामुळे लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.सर्वांना हक्काचे पक्के घर या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी देशात प्रधानमंत्री आवास योजना शहर व ग्रामीण राबविली जात आहे. शहरात नगर परिषदेच्या माध्यमातून ही योजना राबविली जात असून योजनेचा संपूर्ण कारभार नगर परिषद करीत आहे. चार घटकांतून राबविल्या जात असलेल्या या योजनेंतर्गत गोंदिया नगर परिषदेला सात हजार २२० आवासांचे टार्गेट देण्यात आले आहे. मात्र नगर परिषदेच्या माध्यमातून सध्या ‘आर्थिक दृष्टया दुर्बल घटकातील वैयक्तीक स्वरूपात घरकुल बांधकामासाठी अनुदान’ या घटक क्रमांक-४ अंतर्गत घरकुल बांधकामांना मंजुरी दिली जात आहे.या घटकांतर्गत नगर परिषदेच्या ५१५ व ५२० अशा दोन सविस्तर प्रकल्प अहवालांना मंजुरी मिळाली आहे. यातील पहिल्या ५१५ लाभार्थ्यांच्या प्रकल्प अहवालातील सुमारे ३६० लाभार्थ्यांना अनुदानाचा पहिला हप्ता, सुमारे ३०७ लाभार्थ्यांना दुसरा हप्ता देण्यात आला आहे. तर सुमारे १५५ लाभार्थ्यांना अद्याप एकही रूपया देण्यात आलेला नाही. असे असतानाही, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) विभागाकडून मात्र सर्वच लाभार्थ्यांचे घरकुल बांधकाम पूर्ण झाले असावे असे गृहीत धरून ‘सर्वोत्तम घर बांधकाम’ मोहिमेचे पत्र पाठविले जात आहे.एक रूपयाही मिळाला नसताना लाभार्थी घराचे बांधकाम कसे पूर्ण करू शकेल असा प्रश्न येथे उपस्थित होतो. वास्तविक, घरकुल मंजुरीच्या यादीत नाव आल्याने कित्येकांनी आता अनुदान मिळणार या आशेतून घर उघडून टाकले आहे. मात्र अनुदान मिळाले नसल्याने ते उघड्यावर आले आहेत. अशात मात्र यादीत घरकुल बांधकाम पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांची यादी न मागविता शासनाकडून थेट यादीतील सर्वांनाच पत्र पाठविले जात आहे. या प्रकारामुळे लाभार्थ्यांत चांगलाच रोष निर्माण झाला असून शासन आमची थट्टा करीत आहे अशा प्रतिक्रीया व्यक्त करीत आहेत.काय आहे ‘सर्वोत्तम घर बांधकाम’ योजनाप्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पीएमवाय (यू) अवॉर्ड -२०१९ योजनेंतर्गत ‘सर्वोत्तम घर बांधकाम’ शोधण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. यामध्ये संपूर्ण बांधकाम झालेल्या घरांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. याकरीता योजनाचा मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करून लाभार्थीला कुटुंबासह घराचे फोटे अपलोड करावयाचे आहे.अनुदानाला घेऊन लाभार्थी संभ्रमातविभागाकडून लाभार्थ्यांना ‘सर्वोत्तम घर बांधकाम’ मोहिमेबाबत पत्र पाठविण्यात आले आहे. अशात लाभार्थी मात्र संभ्रमात अडकले आहेत. शासनाने पत्र पाठवून घर बांधकाम झाल्याचे कळविले असे त्यांना वाटत आहे. अशात आता आम्हाला पैसे मिळणार की नाही असेही त्यांना वाटू लागले आहे. संबंधित विभागाकडून सर्वांनाच हे पत्र पाठविण्यात आले असल्याचे सांगूनही त्यांना मात्र धडकी भरली आहे.

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना