शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

रोजगार मेळाव्यात ६०० युवकांना नियुक्ती पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 22:06 IST

आ.गोपालदास अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात प्रताप मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रफुल्ल अग्रवाल यांच्यातर्फे रेलटोली येथे शनिवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : विविध कंपन्यांचा सहभाग, पाच हजार युवकांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आ.गोपालदास अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात प्रताप मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रफुल्ल अग्रवाल यांच्यातर्फे रेलटोली येथे शनिवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात राष्ट्रीय स्तरावरील ३७ कंपन्यांनी सहभाग घेवून युवकांच्या मुलाखती घेवून तब्बल ६०० युवकांना नियुक्ती पत्र देऊन रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली. या रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील पाच हजारांवर सुशिक्षित बेरोजगारांनी हजेरी लावली होती.जिल्ह्यात रोजगाराचा अभाव असल्याने सुशिक्षित बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.जिल्ह्यातील युवकांना रोजगार भिमुख शिक्षणाची संधी प्राप्त व्हावी यासाठी आ.गोपालदास अग्रवाल यांच्या पुढाकाराने तंत्रनिकेतन महाविद्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. अनेक युवकांमध्ये कौशल्य व शैक्षणिक पात्रता असताना सुध्दा त्यांना रोजगार मिळण्यापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या हाताला रोजगार कसा उपलब्ध होईल या दृष्टीने प्रताप मेमोरियल ट्रस्टतर्फे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता.या मेळाव्यात राष्ट्रीय स्तरावरील ३७ कंपन्यानी सहभागी होवून युवकांच्या मुलाखती घेवून ६०० युवकांची विविध कंपन्यामध्ये निवड केली. तसेच निवडीचे पत्र सुध्दा युवकांना मेळाव्याच्या ठिकाणी देण्यात आले.विशेष म्हणजे या मेळाव्यात जिल्ह्यातील पाच हजारावर युवक सहभागी झाले होते. अनेक बेरोजगार युवकांना रोजगार मिळाल्याने या रोजगार मेळाव्यासाठी आल्याचा लाभ झाल्याचे सांगितले.युवकांनो खचून जाऊन नका, संधी येतीलप्रताप मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट व प्रफुल अग्रवाल यांच्या पुढाकाराने आयोजित रोजगार मेळाव्यामुळे युवकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.अनेक युवकांना रोजगाराची संधी मिळाली. मात्र ज्यांना संधी मिळाली नाही त्यांनी खचून जाऊ नये, या मेळाव्यात अनेक राष्ट्रीय स्तरावरील आणि नामाकिंत कंपन्यांनी त्यांची मुलाखत घेतली. त्यामुळे युवकांचा अनुभव दुप्पट वाढला आहे. त्यामुळे आपली निवड झाली नाही म्हणून खचून न जाता आयुष्यात पुन्हा संधी येतील त्या दृष्टीने तयार करण्याचे आवाहन आ.गोपालदास अग्रवाल यांनी रोजगार मेळाव्यात युवकांना मार्गदर्शन करताना केले.जिल्ह्यातील युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी कशा प्राप्त होईल यादृष्टीने आपले प्रयत्न सुरू असून बेरोजगार युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी आपण सदैव कटिबध्द असल्याचे आ.अग्रवाल यांनी सांगितले.तसेच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात रोजगार मेळाव्याचे आयोजन केले जाईल,अशी ग्वाही युवकांना दिली.या मान्यवरांची उपस्थितीरोजगार मेळाव्याप्रसंगी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कटरे, जि.प.अध्यक्षा सीमा मडावी, जि.प.सभापती रमेश अंबुले, लता दोनोडे, पं.स.सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष उषा शहारे, शहरध्यक्ष अशोक चौधरी, नगरसेवक सुनील भालेराव,क्रांती जायस्वाल, पराग अग्रवाल, राकेश ठाकूर, व्यंकट पाथरु,देवा रूसे, डॉ.टी.पी.येडे, राजेश चौरसीया, विमल नागपूरे, निता पटले, संदीप रहांगडाले, विजय रहांगडाले, रोहन रंगारी, चेरीस खांडेकर उपस्थित होते.