शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
2
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
3
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
4
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
5
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
6
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
7
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
8
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
9
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
10
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
11
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
12
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
13
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
14
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
15
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
16
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
18
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
19
आर्यनच्या सीरिजमध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता कोण? समीर वानखेडेंच्या वादावर म्हणाला..
20
अमानवीय! तुमच्या म्हशी आमच्या शेतात चरायला येतात; शेतकऱ्याचा १२ म्हशींवर कुऱ्हाडीने वार...

कृषी संजीवनीकडे शेतकऱ्यांची पाठ

By admin | Updated: September 13, 2014 01:58 IST

थकीत बाकी असलेल्या वीज बिलांवर ५० टक्के माफी देणाऱ्या कृषी संजीवनी योजनेने राज्यभरात धूम माजविली आहे.

कपिल केकत गोंदियाथकीत बाकी असलेल्या वीज बिलांवर ५० टक्के माफी देणाऱ्या कृषी संजीवनी योजनेने राज्यभरात धूम माजविली आहे. जिल्ह्यात १२ हजार २५६ थकबाकीदार शेतक ऱ्यांच्या कृषी पंपांना ही योजना संजीवनी देणारी ठरणार आहे. मात्र जिल्ह्यात या योजनेला जिल्ह्यात पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांकडे थकून असलेल्या पाच कोटी २५ लाख ५२ हजार रूपयांपैकी अद्याप एक कोटी २० लाख ४८ हजार रूपयेच महावितरणला प्राप्त झाले आहेत. नियमीत वीज बिल भरणाऱ्या शेतकऱ्यांचा यात समावेश आहे. येत्या ३१ आॅक्टोबरनंतरच किती थकबाकीदार शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला हे स्पष्ट होणार आहे. कधी अतिवृष्टी तर कधी गारपिटीने झोडपून काढलेल्या शेतकऱ्यांना आधार देता यावा म्हणून राज्य शासनाने महावितरणला सोबत घेत कृषी संजीवनी योजना राज्यात सुरू केली आहे. १ आॅगस्ट २०१४ पासून राबविल्या जात असलेल्या या योजनेंतर्गत कृषी पंपधारकांना थकलेल्या वीज बिलावर ५० टक्के माफीसोबतच थकीत वीज बिलावरील व्याज व दंड पूर्णपणे माफ केले जाणार आहे. यासाठी अशा अनियमीत कृषी पंपधारक शेतकऱ्यांना त्यांच्याकडील थकीत रक्कम येत्या ३१ आॅक्टोबरपर्यंत एकरकमी किंवा तीन मासिक हप्तात भरावयाची आहे. जिल्ह्यात २१ हजार ३३१ कृषी पंपधारक असून यातील अनियमीत वीज बिल भरणा करणारे १२ हजार २५६ पंपधारक आहेत. यावरून या १२ हजार २५६ पंपधारकांसाठीच ही योजना संजीवनी बनून आल्याचे दिसून येते. कारण या योजनेच्या मुदतीत त्यांनी त्यांच्याकडील थकीत रक्कम न भरल्यास विद्युत कायदा २००३ नुसार वसुलीकरिता त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. मात्र असे असतानाही एवढ्या फायदेशीर योजनेला जिल्ह्यात अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यातील कृषी पंप धारकांवर महावितरणचे पाच कोटी २५ लाख ५२ हजार रूपये थकीत आहेत. शिवाय ९४ लाख ७८ हजार रूपयांचे व्याज व १० लाख ५१ हजार रूपये दंडाची रक्कम आहे. मात्र महावितरणच्या ३१ आॅगस्टपर्यंतच्या आकडेवारीनुसार, कृषी पंपधारकांकडून एक कोटी २० लाख ४८ हजार रूपये प्राप्त झाले असल्याचे महावितरणचे लेखाधिकारी वाघ यांनी सांगितले.