शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

कृषी संजीवनीकडे शेतकऱ्यांची पाठ

By admin | Updated: September 13, 2014 01:58 IST

थकीत बाकी असलेल्या वीज बिलांवर ५० टक्के माफी देणाऱ्या कृषी संजीवनी योजनेने राज्यभरात धूम माजविली आहे.

कपिल केकत गोंदियाथकीत बाकी असलेल्या वीज बिलांवर ५० टक्के माफी देणाऱ्या कृषी संजीवनी योजनेने राज्यभरात धूम माजविली आहे. जिल्ह्यात १२ हजार २५६ थकबाकीदार शेतक ऱ्यांच्या कृषी पंपांना ही योजना संजीवनी देणारी ठरणार आहे. मात्र जिल्ह्यात या योजनेला जिल्ह्यात पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांकडे थकून असलेल्या पाच कोटी २५ लाख ५२ हजार रूपयांपैकी अद्याप एक कोटी २० लाख ४८ हजार रूपयेच महावितरणला प्राप्त झाले आहेत. नियमीत वीज बिल भरणाऱ्या शेतकऱ्यांचा यात समावेश आहे. येत्या ३१ आॅक्टोबरनंतरच किती थकबाकीदार शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला हे स्पष्ट होणार आहे. कधी अतिवृष्टी तर कधी गारपिटीने झोडपून काढलेल्या शेतकऱ्यांना आधार देता यावा म्हणून राज्य शासनाने महावितरणला सोबत घेत कृषी संजीवनी योजना राज्यात सुरू केली आहे. १ आॅगस्ट २०१४ पासून राबविल्या जात असलेल्या या योजनेंतर्गत कृषी पंपधारकांना थकलेल्या वीज बिलावर ५० टक्के माफीसोबतच थकीत वीज बिलावरील व्याज व दंड पूर्णपणे माफ केले जाणार आहे. यासाठी अशा अनियमीत कृषी पंपधारक शेतकऱ्यांना त्यांच्याकडील थकीत रक्कम येत्या ३१ आॅक्टोबरपर्यंत एकरकमी किंवा तीन मासिक हप्तात भरावयाची आहे. जिल्ह्यात २१ हजार ३३१ कृषी पंपधारक असून यातील अनियमीत वीज बिल भरणा करणारे १२ हजार २५६ पंपधारक आहेत. यावरून या १२ हजार २५६ पंपधारकांसाठीच ही योजना संजीवनी बनून आल्याचे दिसून येते. कारण या योजनेच्या मुदतीत त्यांनी त्यांच्याकडील थकीत रक्कम न भरल्यास विद्युत कायदा २००३ नुसार वसुलीकरिता त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. मात्र असे असतानाही एवढ्या फायदेशीर योजनेला जिल्ह्यात अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यातील कृषी पंप धारकांवर महावितरणचे पाच कोटी २५ लाख ५२ हजार रूपये थकीत आहेत. शिवाय ९४ लाख ७८ हजार रूपयांचे व्याज व १० लाख ५१ हजार रूपये दंडाची रक्कम आहे. मात्र महावितरणच्या ३१ आॅगस्टपर्यंतच्या आकडेवारीनुसार, कृषी पंपधारकांकडून एक कोटी २० लाख ४८ हजार रूपये प्राप्त झाले असल्याचे महावितरणचे लेखाधिकारी वाघ यांनी सांगितले.