शहरं
Join us  
Trending Stories
1
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
2
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
3
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
4
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
5
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
6
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
7
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
8
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू
9
National Flag : केवळ भारतच नव्हे, जगातील 'या' देशांच्या झेंड्यावरही आहे केशरी, पांढरा अन् हिरवा रंग!
10
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
11
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
12
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
13
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
14
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
15
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
16
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
17
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
18
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
19
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
20
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी

कृषी संजीवनीकडे शेतकऱ्यांची पाठ

By admin | Updated: September 13, 2014 01:58 IST

थकीत बाकी असलेल्या वीज बिलांवर ५० टक्के माफी देणाऱ्या कृषी संजीवनी योजनेने राज्यभरात धूम माजविली आहे.

कपिल केकत गोंदियाथकीत बाकी असलेल्या वीज बिलांवर ५० टक्के माफी देणाऱ्या कृषी संजीवनी योजनेने राज्यभरात धूम माजविली आहे. जिल्ह्यात १२ हजार २५६ थकबाकीदार शेतक ऱ्यांच्या कृषी पंपांना ही योजना संजीवनी देणारी ठरणार आहे. मात्र जिल्ह्यात या योजनेला जिल्ह्यात पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांकडे थकून असलेल्या पाच कोटी २५ लाख ५२ हजार रूपयांपैकी अद्याप एक कोटी २० लाख ४८ हजार रूपयेच महावितरणला प्राप्त झाले आहेत. नियमीत वीज बिल भरणाऱ्या शेतकऱ्यांचा यात समावेश आहे. येत्या ३१ आॅक्टोबरनंतरच किती थकबाकीदार शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला हे स्पष्ट होणार आहे. कधी अतिवृष्टी तर कधी गारपिटीने झोडपून काढलेल्या शेतकऱ्यांना आधार देता यावा म्हणून राज्य शासनाने महावितरणला सोबत घेत कृषी संजीवनी योजना राज्यात सुरू केली आहे. १ आॅगस्ट २०१४ पासून राबविल्या जात असलेल्या या योजनेंतर्गत कृषी पंपधारकांना थकलेल्या वीज बिलावर ५० टक्के माफीसोबतच थकीत वीज बिलावरील व्याज व दंड पूर्णपणे माफ केले जाणार आहे. यासाठी अशा अनियमीत कृषी पंपधारक शेतकऱ्यांना त्यांच्याकडील थकीत रक्कम येत्या ३१ आॅक्टोबरपर्यंत एकरकमी किंवा तीन मासिक हप्तात भरावयाची आहे. जिल्ह्यात २१ हजार ३३१ कृषी पंपधारक असून यातील अनियमीत वीज बिल भरणा करणारे १२ हजार २५६ पंपधारक आहेत. यावरून या १२ हजार २५६ पंपधारकांसाठीच ही योजना संजीवनी बनून आल्याचे दिसून येते. कारण या योजनेच्या मुदतीत त्यांनी त्यांच्याकडील थकीत रक्कम न भरल्यास विद्युत कायदा २००३ नुसार वसुलीकरिता त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. मात्र असे असतानाही एवढ्या फायदेशीर योजनेला जिल्ह्यात अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यातील कृषी पंप धारकांवर महावितरणचे पाच कोटी २५ लाख ५२ हजार रूपये थकीत आहेत. शिवाय ९४ लाख ७८ हजार रूपयांचे व्याज व १० लाख ५१ हजार रूपये दंडाची रक्कम आहे. मात्र महावितरणच्या ३१ आॅगस्टपर्यंतच्या आकडेवारीनुसार, कृषी पंपधारकांकडून एक कोटी २० लाख ४८ हजार रूपये प्राप्त झाले असल्याचे महावितरणचे लेखाधिकारी वाघ यांनी सांगितले.