शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

कमी वीज दाबाने केला घात

By admin | Updated: April 12, 2017 01:17 IST

शेतकऱ्यांचे पुढारी आम्हीच म्हणणारे राजकीय नेते दिसेनासे झाले आहेत. १५ ते २० दिवसांपासून विजेचा लंपडाव व कमी दाब निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांचे पीक करपत आहे.

शेतातील पीक करपले : शेतकऱ्यांचे अश्रू कुणीच पुसेनाअर्जुनी मोरगाव : शेतकऱ्यांचे पुढारी आम्हीच म्हणणारे राजकीय नेते दिसेनासे झाले आहेत. १५ ते २० दिवसांपासून विजेचा लंपडाव व कमी दाब निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांचे पीक करपत आहे. पण ही बाब लक्षात न घेता वीज वितरण कंपनी सुध्दा डोळेझाक करीत असून अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने त्यांच्यावर कोणाचे ही वचप दिसून येत नाही. वीजेच्या या समस्येमुळे मात्र आपले करपत असलेले पीक बघून शेतकऱ्यांच्या डोळ््यात अश्रू येत आहेत. परिसरातील शेतशिवाराची झळा परिस्थिती खूप गंभीर आहे. विजेचा लंपडाव व कमी दाब निर्माण झाल्यामुळे पीक डोळयासमोर मरताना बघून शेतकरी रडू लागला आहे. देशाचा अन्नदाता म्हणून ओळखला जाणारा हा शेतकरी शासन व प्रशासनाला ‘असं अर्धमेलं जगण्यापेक्षा साहेब! एकदा कायमचे मारून तरी टाका, आमचे वीज कनेक्शन कापून टाका!’ असे सांगत आहे. कारण कमी दाबामुळे येथील शेतकऱ्यांचे वीज उपकरण जळाले असून त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. ही आर्थिक नुकसान भरपाई मागण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची ताकत त्यांच्या अंगात राहीली नसून तो हवालदिल दिसत आहे. शासन शेतकऱ्यांना सतत १६ तास विज देण्यास असमर्थ ठरले आहे असे दिसून येत आहे. अनेक तांत्रीक कामाने दिवसभऱ्यातून ७-८ वेळा विज पुरवठा खंडीत केला जातो. त्यामुळे शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी भर उन्हात शेतकऱ्याला पायपीट करावी लागत असल्याचे दिसून येत आहे. शेतीला पाहिजे तेवढे सिंचन होत नसल्याने पिके करपत आहे. त्याचप्रमाणे विहीरी व बोरवेलच्या पाण्याची पातळी खोल गेली आहे. पाण्याच्या उपसा कमी होतो व त्यातच विजेचा लंपडाव सुरू असतो त्यामुळे पिकांसाठी पूर्ण जमीन ओली होत नाही. परिणामी पीक करपत आहे, व काही शेतकऱ्यांना अर्धेच पीक होत आहे. त्यामुळे अर्ध्या पिकाची आशा शेतकऱ्यांनी सोडून दिली आहे. उत्पन्न घेण्यासाठी आलेला खर्चही त्यांना परतफेडीसाठी अडसर ठरत आहे. यातच अर्ध्या जमिनीचे येणारे पिकही सिंचनाअभावी पूर्णपणे कोमेजले आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाल्याचे दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)पुढारी फक्त निवडणुकीपुरतेचविविध क्षेत्रातील शासकीय कर्मचारी वेतनाचा लाभ घेत असतानासुध्दा संपावर जाण्याचे चित्र आपल्याला वेळोवेळी पहायला मिळते. परंतु शेतकरी संपावर गेला अशी परिस्थिती कधी पहायला मिळत नाही. आजची स्थिती शेतीसाठी पूरक नाही. अन्नदात्याला फाशी लागण्याची वेळ ओढवली असून यामध्ये शेतकरी पार होरपळून निघाला आहे. शेतकऱ्यांचे कैवारी आम्हीच म्हणणारे पुढारी गाजावाजा करून आपले नाव करून घेतात. मात्र शेतकऱ्यांची ही स्थिती बघूनही आता कुणीच पुढे येत नाही. त्यामुळे पुढारी फक्त निवडणुकीतच दिसतात असे येथील शेतकरी बोलत आहेत.