शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
2
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
3
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
4
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
5
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
6
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
7
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
8
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
9
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
10
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
11
'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो
12
"मराठी मुलांनी आता उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या करायच्या का?"; शरद पवार गटाचा संतप्त सवाल
13
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
14
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?
15
दिलजीत दोसांझची 'नो एन्ट्री २' मधून एक्झिट! 'या' कारणामुळे दिला नकार; नेटकरी खूश
16
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
17
मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सम-विषम योजना लागू करा : वॉचडॉग फाउंडेशन
18
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
19
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
20
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"

कमी वीज दाबाने केला घात

By admin | Updated: April 12, 2017 01:17 IST

शेतकऱ्यांचे पुढारी आम्हीच म्हणणारे राजकीय नेते दिसेनासे झाले आहेत. १५ ते २० दिवसांपासून विजेचा लंपडाव व कमी दाब निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांचे पीक करपत आहे.

शेतातील पीक करपले : शेतकऱ्यांचे अश्रू कुणीच पुसेनाअर्जुनी मोरगाव : शेतकऱ्यांचे पुढारी आम्हीच म्हणणारे राजकीय नेते दिसेनासे झाले आहेत. १५ ते २० दिवसांपासून विजेचा लंपडाव व कमी दाब निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांचे पीक करपत आहे. पण ही बाब लक्षात न घेता वीज वितरण कंपनी सुध्दा डोळेझाक करीत असून अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने त्यांच्यावर कोणाचे ही वचप दिसून येत नाही. वीजेच्या या समस्येमुळे मात्र आपले करपत असलेले पीक बघून शेतकऱ्यांच्या डोळ््यात अश्रू येत आहेत. परिसरातील शेतशिवाराची झळा परिस्थिती खूप गंभीर आहे. विजेचा लंपडाव व कमी दाब निर्माण झाल्यामुळे पीक डोळयासमोर मरताना बघून शेतकरी रडू लागला आहे. देशाचा अन्नदाता म्हणून ओळखला जाणारा हा शेतकरी शासन व प्रशासनाला ‘असं अर्धमेलं जगण्यापेक्षा साहेब! एकदा कायमचे मारून तरी टाका, आमचे वीज कनेक्शन कापून टाका!’ असे सांगत आहे. कारण कमी दाबामुळे येथील शेतकऱ्यांचे वीज उपकरण जळाले असून त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. ही आर्थिक नुकसान भरपाई मागण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची ताकत त्यांच्या अंगात राहीली नसून तो हवालदिल दिसत आहे. शासन शेतकऱ्यांना सतत १६ तास विज देण्यास असमर्थ ठरले आहे असे दिसून येत आहे. अनेक तांत्रीक कामाने दिवसभऱ्यातून ७-८ वेळा विज पुरवठा खंडीत केला जातो. त्यामुळे शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी भर उन्हात शेतकऱ्याला पायपीट करावी लागत असल्याचे दिसून येत आहे. शेतीला पाहिजे तेवढे सिंचन होत नसल्याने पिके करपत आहे. त्याचप्रमाणे विहीरी व बोरवेलच्या पाण्याची पातळी खोल गेली आहे. पाण्याच्या उपसा कमी होतो व त्यातच विजेचा लंपडाव सुरू असतो त्यामुळे पिकांसाठी पूर्ण जमीन ओली होत नाही. परिणामी पीक करपत आहे, व काही शेतकऱ्यांना अर्धेच पीक होत आहे. त्यामुळे अर्ध्या पिकाची आशा शेतकऱ्यांनी सोडून दिली आहे. उत्पन्न घेण्यासाठी आलेला खर्चही त्यांना परतफेडीसाठी अडसर ठरत आहे. यातच अर्ध्या जमिनीचे येणारे पिकही सिंचनाअभावी पूर्णपणे कोमेजले आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाल्याचे दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)पुढारी फक्त निवडणुकीपुरतेचविविध क्षेत्रातील शासकीय कर्मचारी वेतनाचा लाभ घेत असतानासुध्दा संपावर जाण्याचे चित्र आपल्याला वेळोवेळी पहायला मिळते. परंतु शेतकरी संपावर गेला अशी परिस्थिती कधी पहायला मिळत नाही. आजची स्थिती शेतीसाठी पूरक नाही. अन्नदात्याला फाशी लागण्याची वेळ ओढवली असून यामध्ये शेतकरी पार होरपळून निघाला आहे. शेतकऱ्यांचे कैवारी आम्हीच म्हणणारे पुढारी गाजावाजा करून आपले नाव करून घेतात. मात्र शेतकऱ्यांची ही स्थिती बघूनही आता कुणीच पुढे येत नाही. त्यामुळे पुढारी फक्त निवडणुकीतच दिसतात असे येथील शेतकरी बोलत आहेत.