शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
3
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
4
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
5
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
6
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!
7
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
8
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
9
लस्सीवरून दुकानदारांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर लाठ्याकाठ्या, दगड विटांनी केला हल्ला
10
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?
11
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
12
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
13
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
14
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
15
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
16
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
17
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
18
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
19
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
20
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?

कमी वीज दाबाने केला घात

By admin | Updated: April 12, 2017 01:17 IST

शेतकऱ्यांचे पुढारी आम्हीच म्हणणारे राजकीय नेते दिसेनासे झाले आहेत. १५ ते २० दिवसांपासून विजेचा लंपडाव व कमी दाब निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांचे पीक करपत आहे.

शेतातील पीक करपले : शेतकऱ्यांचे अश्रू कुणीच पुसेनाअर्जुनी मोरगाव : शेतकऱ्यांचे पुढारी आम्हीच म्हणणारे राजकीय नेते दिसेनासे झाले आहेत. १५ ते २० दिवसांपासून विजेचा लंपडाव व कमी दाब निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांचे पीक करपत आहे. पण ही बाब लक्षात न घेता वीज वितरण कंपनी सुध्दा डोळेझाक करीत असून अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने त्यांच्यावर कोणाचे ही वचप दिसून येत नाही. वीजेच्या या समस्येमुळे मात्र आपले करपत असलेले पीक बघून शेतकऱ्यांच्या डोळ््यात अश्रू येत आहेत. परिसरातील शेतशिवाराची झळा परिस्थिती खूप गंभीर आहे. विजेचा लंपडाव व कमी दाब निर्माण झाल्यामुळे पीक डोळयासमोर मरताना बघून शेतकरी रडू लागला आहे. देशाचा अन्नदाता म्हणून ओळखला जाणारा हा शेतकरी शासन व प्रशासनाला ‘असं अर्धमेलं जगण्यापेक्षा साहेब! एकदा कायमचे मारून तरी टाका, आमचे वीज कनेक्शन कापून टाका!’ असे सांगत आहे. कारण कमी दाबामुळे येथील शेतकऱ्यांचे वीज उपकरण जळाले असून त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. ही आर्थिक नुकसान भरपाई मागण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची ताकत त्यांच्या अंगात राहीली नसून तो हवालदिल दिसत आहे. शासन शेतकऱ्यांना सतत १६ तास विज देण्यास असमर्थ ठरले आहे असे दिसून येत आहे. अनेक तांत्रीक कामाने दिवसभऱ्यातून ७-८ वेळा विज पुरवठा खंडीत केला जातो. त्यामुळे शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी भर उन्हात शेतकऱ्याला पायपीट करावी लागत असल्याचे दिसून येत आहे. शेतीला पाहिजे तेवढे सिंचन होत नसल्याने पिके करपत आहे. त्याचप्रमाणे विहीरी व बोरवेलच्या पाण्याची पातळी खोल गेली आहे. पाण्याच्या उपसा कमी होतो व त्यातच विजेचा लंपडाव सुरू असतो त्यामुळे पिकांसाठी पूर्ण जमीन ओली होत नाही. परिणामी पीक करपत आहे, व काही शेतकऱ्यांना अर्धेच पीक होत आहे. त्यामुळे अर्ध्या पिकाची आशा शेतकऱ्यांनी सोडून दिली आहे. उत्पन्न घेण्यासाठी आलेला खर्चही त्यांना परतफेडीसाठी अडसर ठरत आहे. यातच अर्ध्या जमिनीचे येणारे पिकही सिंचनाअभावी पूर्णपणे कोमेजले आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाल्याचे दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)पुढारी फक्त निवडणुकीपुरतेचविविध क्षेत्रातील शासकीय कर्मचारी वेतनाचा लाभ घेत असतानासुध्दा संपावर जाण्याचे चित्र आपल्याला वेळोवेळी पहायला मिळते. परंतु शेतकरी संपावर गेला अशी परिस्थिती कधी पहायला मिळत नाही. आजची स्थिती शेतीसाठी पूरक नाही. अन्नदात्याला फाशी लागण्याची वेळ ओढवली असून यामध्ये शेतकरी पार होरपळून निघाला आहे. शेतकऱ्यांचे कैवारी आम्हीच म्हणणारे पुढारी गाजावाजा करून आपले नाव करून घेतात. मात्र शेतकऱ्यांची ही स्थिती बघूनही आता कुणीच पुढे येत नाही. त्यामुळे पुढारी फक्त निवडणुकीतच दिसतात असे येथील शेतकरी बोलत आहेत.